शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

एसटीचे ब्रेक फेल, ३० प्रवासी बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 23:17 IST

चिखलदरा येथून ३० प्रवासी परतवाड्याला घेऊन येणाºया परिवहन मंडळाच्या एसटी बसचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाच्या प्रसंगावधानाने रविवारी सकाळी मोठा अपघात टळला.

ठळक मुद्देअनर्थ टळला : भंगार बसगाड्या धोकादायक

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : चिखलदरा येथून ३० प्रवासी परतवाड्याला घेऊन येणाºया परिवहन मंडळाच्या एसटी बसचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाच्या प्रसंगावधानाने रविवारी सकाळी मोठा अपघात टळला. शिवमंदिर घाटवळणावर सदर घटना घडल्याने प्रवाशांमध्ये भंगार गाड्यांबद्दल प्रचंड रोष निर्माण झाला आहे.परतवाडा आगाराची बस क्रमांक एमएच ४०-८८४६ क्रमांकाची बस धामणगाव गढी मार्गे चिखलदरा येथून परत येत असताना सदर अपघात घडला. यात कुणीच प्रवासी जखमी झाले नसल्याचे परिवहन विभागातर्फे सांगण्यात आले. चालक अतुल निराळे, तर वाहक मो. परवेज परतवाडा येथून रविवारी सकाळी ८.३० वाजता चिखलदरासाठी बसफेरी नेली होती.शिवमंदिरनजीकच्या घाटवळणावर बसचे ब्रेक न लागल्याने चालकाने प्रवाशांनी भरलेली बसगाडी पहाडाला लावली. त्यामुळे बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तर प्रवासी सुखरूप बचावले. चालकाच्या समयसुचकतेने उजव्या बाजूने असलेल्या दरीत बस कोसळण्यापासून बचावली, हे विशेष.परतवाडा भंगार गाड्यांचे आगारजिल्ह्यात अमरावतीनंतर ग्रामीण भागात सर्वात मोठे परतवाडा आगार असून सत्तर पेक्षा अधिक बसगाड्या असून तिनशेच्या जवळपास विविध ठिकाणी फेºया करतात. परतवाडा-चिखलदरा व मेळघाटात नेहमी नादुरूस्त आणि भंगार गाड्या पाठविल्या जात असल्याने परिवहन मंडळाने प्रवाशांच्या जिवाशी खेळ चालविला आहे.

बसला धामणगाव गढी शिव मंदिरानजीक अपघात झाला. बस नादुरूस्त आहे किंवा कशामुळे यांत्रिक बिघाड झाला याची तपासणी करण्यात येईल.- नीलेश मोकळकर,सहायक वाहतूक नियंत्रक, परतवाडा आगार