शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

श्रनिवास रेड्डींचा अखेर तात्पुरत्या कारागृहात १४ दिवस मुक्काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:08 IST

१४ दिवस राहावे लागेल क्वारंटाईन, व्हीआयपी लवाजामा संपला, सामान्य कैद्यासारखी वागणूक अमरावती : बहुचर्चित दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी अटकेतील आरोपी ...

१४ दिवस राहावे लागेल क्वारंटाईन, व्हीआयपी लवाजामा संपला, सामान्य कैद्यासारखी वागणूक

अमरावती : बहुचर्चित दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी अटकेतील आरोपी निलंबित अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांना अखेर १४ दिवस तात्पुरत्या कारागृहात मुक्काम करावा लागणार आहे. धारणी येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी मुकुंद गाडे यांच्या नायालयाने १ मे रोजी रेड्डींना १४ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे पुढील आदेशापर्यंत रेड्डी हे मध्यवर्ती कारागृहाच्या नियंत्रणात राहणार आहेत.

न्यायालयाच्या आदेशानुसार श्रीनिवास रेड्डी यांना शनिवार, १ मे रोजी उशिरा सायंकाळी येथील कारागृहात आणण्यात आले. तत्पूर्वी त्यांची कोविड चाचणी करून निगेटिव्ह अहवाल असल्याबाबतचे प्रमाणपत्र पोलिसांनी कारागृह प्रशासनाला दिले. कोविड नियमांनुसार कारागृहात येणाऱ्या प्रत्येक बंदीजनांना किमान १४ दिवस तात्पुरत्या कारागृहात क्वारंटाईन ठेवावे लागते. त्यानुसार रेड्डी यांना येथील अंध विद्यालयात क्वारंटाईन ठेवण्यात आले आहे. तात्पुरत्या कारागृहात १४ दिवसांचा कालावधी झाल्यानंतर पुन्हा कोविड चाचणी करून मध्यवर्ती कारागृहात पाठविण्याची नियमावली आहे. परंतु, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालकपदी कार्यरत असताना रेड्डी यांचा रूतबा, दरारा काही औरच होता. त्यांचा आदेश हा वनाधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी शिरसावध असायचा. मात्र, दीपाली प्रकरणात रेड्डी यांना २९ एप्रिल रोजी पहाटे ६ वाजता अटक करून धारणी पोलीस ठाण्यात जेरबंद करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यानुसार रेड्डी यांचे दोन दिवस धारणी पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्येच गेले. मात्र, पोलीस कोठडी संपताच न्यायालयाने १४ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली आणि रेड्डी यांची थेट कारागृहात रवानगी झाली. येथील अंध विद्यालयात साकारण्यात आलेल्या तात्पुरत्या कारागृहात शनिवारी सायंकाळच्या सुमारास रेड्डींना आणण्यात आले. आता रेड्डींना येथे सामान्य कैद्यासारखे राहावे लागणार आहे. जेवण, पाणी हे स्वत:च्या हाताने घ्यावे लागेल. आता ‘ना नाेकर, ना चाकर’ केवळ कैदी म्हणून येथे बंदिस्त आहेत. सूर्योदय ते सूर्यास्त दिनचर्या ही रेड्डींना अन्य बंदीजनांसारखी घालवावी लागत आहे.

---------------

शरीरावरील खुणा, डाग, जन्मत: वर्ण तपासले

न्यायालयाच्या आदेशानुसार धारणी पोलिसांनी श्रीनिवास रेड्डींना येथील अंध विद्यालयात साकारलेल्या तात्पुरत्या कारागृहात बंदीजन म्हणून आणले. कारागृहाचे शिपाई, हवालदार यांनी न्यायालयीन आदेश बघितल्यानंतर रेड्डींची कारागृहाच्या रेकॉर्डवर आराेपी म्हणून नोंद केली. त्यानंतर त्यांच्या शरीरावरील खुणा, डाग, जन्मत: असलेले वर्ण आदींंची बारकाईने तपासणी करताना तशा नोंदी घेतल्या. त्यानंतर जेवणासाठी ॲल्युमिनियमचे ताट आणि पाणी पिण्यासाठी ग्लास देण्यात आले. सामान्य कैद्यासारखे रविवारी रांगेत उभे राहून सकाळचे जेवणदेखील रेड्डींनी घेतले, अशी माहिती जेल सूत्रांकडून मिळाली आहे.

-------------

कारागृहात आराेपी म्हणून येणारी प्रत्येक व्यक्ती ही आमच्यासाठी समान असते. मग ती राजकीय असो, अधिकारी असाे, वा व्हीआयपी त्यांना कैदी म्हणून समान वागणूक दिली जाते. श्रीनिवास रेड्डी यांना शनिवारी सायंकाळी उशिरा आणले गेले. अंध विद्यालयात तात्पुरत्या कारागृहात सामान्य कैद्यांमध्ये ठेवण्यात आले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने तेथे सीसीटीव्ही कॅमेेरे बसविले आहेत.

- रमेश कांबळे, अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह अमरावती