शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

आयपीएस प्रज्ञा सरवदे यांच्या आदेशानंतर श्रीनिवास रेड्डीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:15 IST

अमरावती : बहुचर्चित दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणातील आरोपी तथा मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे निलंबित क्षेत्रसंचालक तत्कालीन अपर प्रधान मुख्य ...

अमरावती : बहुचर्चित दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणातील आरोपी तथा मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे निलंबित क्षेत्रसंचालक तत्कालीन अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी याला गुरुवारी सकाळी ६ वाजता पोलिसांनी अटक केली. मात्र, ही कारवाई आयपीएस चौकशी पथकप्रमुख अपर पाेलीस महासंचालक प्रज्ञा सरवदे यांच्या आदेशानंतर झाल्याची माहिती आहे. अमरावती ग्रामीण पोलिसांनी नागपूर गुन्हे शाखेच्या मदतीने बुधवारी उशिरा नागपुरातून रेड्डीला ताब्यात घेतले.

२५ मार्च रोजी दीपाली चव्हाण यांंनी आत्महत्या केली होती. २६ मार्च राेजी या प्रकरणातील प्रमुख आरोपी गुगामल वन्यजीव विभागाचा निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याला अटक करण्यात आली. त्याच्याविरूद्ध धारणी पोलिसांनी भादंविच्या ३०६, ३१२. ५०४, ५०६ अन्वये गुन्हा नोंदविला असून, तो सध्या येथील मध्यवर्ती कारागृहात जेरबंद आहे. दीपाली यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात श्रीनिवास रेड्डी हे देखील तितकेच दोषी आहे. गुन्हे दाखल करावे, यासाठी राजकीय, सामाजिक संघटनांनी आंदाेलन केले. दरम्यान राज्य शासनाने दीपाली मृत्यूप्रकरणी श्रीनिवास रेड्डी याच्या भूमिकेच्या चौकशीसाठी अपर पोलीस महासंचालक प्रज्ञा सरवदे यांच्या अध्यक्षतेत चौकशी समिती गठित केली. आयपीएस चौकशी पथकाने हरिसाल, अमवराती येथे २१ ते २८ पर्यंत दौरा केला. दीपाली प्रकरणाशी निगडित व्यक्ती, अधिकारी, कर्मचाऱ्यांचे बयाण नोंदविले. २६ एप्रिल रोजी आयपीएस प्रज्ञा सरवदे अमरावतीत दाखल झाल्या. २७ एप्रिल रोजी सरवदे व त्यांच्या पथकाने हरिसाल गाठले. दीपाली प्रकरणाची संबंधित घटनास्थळाची पाहणी केली. येथे काही ठिकाणी निरीक्षण केले. वन कर्मचारी यांच्याशी संवाद साधून आपबितीची माहिती घेतली. येथील राज्य राखीव दलाच्या विश्रामगृहात पथकातील सहकारी सदस्यांनी नोंदविलेल्या बयाणांवर बुधवारी मंथन केले. काही जणांसोबत त्यांनी भेटीगाठी घेतल्या. मात्र, २८ एप्रिल राेजी सकाळी ९ वाजता येथील एसपी कार्यालय गाठले. वस्तुस्थितीच्या आधारे आयपीएस प्रज्ञा सरवदे यांनी श्रीनिवास रेड्डीच्या अटकेचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले. त्यानंतर ग्रामीण गुन्हे शाखेेचे पथक ॲक्टिव्ह झाले आणि रेड्डी याच्या मुसक्या आवळण्यासाठी नागपूरच्या दिशेने पोलीस पथक रवाना झाले. दरम्यान डॉ. प्रज्ञा सरवदे यांनी मुंबईकडे जाण्यासाठी मार्गक्रमण केले. त्यानंतर वाहनांनी नागपूरकडे रवाना झाल्या. मात्र, सकाळी १० ते १ वाजता दरम्यान आयपीएस चौकशी पथकाने कागदपत्रांच्या पडताळणीसाठी तीन तास ठिय्या मांडला होता, हे विशेष.

---------------

कोट

धारणी पोलिसांनी सकाळी ६ वाजता तत्कालीन अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांना अटक केली. फौजदारी कारवाईसाठी शासनाची परवानगी घ्यावी लागत नाही. आरोपपत्र न्यायालयात दाखल करताना मात्र शासनाला कळवावे लागतात. रेड्डीवर भादंविच्या कलम ३०६ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.

- हरी बालाजी एन. पोलीस अधीक्षक, अमरावती