शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

‘एसपीं’चे विशेष पथक कुचकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 23:50 IST

जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनाष कुमार यांनी अवैध वाहतूक रोखण्यासाठी जिल्ह्यातील ३१ पैकी १२ ठाण्यांत प्रायोगिक तत्त्वावर विशेष वाहतूक नियंत्रण पथक वर्षभरापूर्वी गठित केले. मात्र, आतापर्यंत या पथकाकडून झालेल्या कारवाईचा लेखाजोखा बघितला तर एका ठाण्यात प्रतिदिन आठ वाहनांवरच कारवाई करण्यात आली.

ठळक मुद्देअवैध वाहतूक फोफावली : दरदिवशी एका ठाण्यात आठ केसेस

संदीप मानकर ।आॅनलाईन लोकमतअमरावती : जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनाष कुमार यांनी अवैध वाहतूक रोखण्यासाठी जिल्ह्यातील ३१ पैकी १२ ठाण्यांत प्रायोगिक तत्त्वावर विशेष वाहतूक नियंत्रण पथक वर्षभरापूर्वी गठित केले. मात्र, आतापर्यंत या पथकाकडून झालेल्या कारवाईचा लेखाजोखा बघितला तर एका ठाण्यात प्रतिदिन आठ वाहनांवरच कारवाई करण्यात आली. परिणामी अवैध वाहतूक सुरूच असल्याचे वास्तव असून, ‘एसपीं’चे हे पथक कुचकामी ठरल्याचे चित्र आहे.जिल्ह्यात वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी ग्रामीण वाहतूक शाखेकडे सोपविली आहे. परंतु, ग्रामीण भागात अवैध वाहतूक फोफावल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी १२ पोलीस ठाण्यांतर्गत ६२ शिपाई असलेल्या विशेष पथकाचे गठन केले. विशेषत: या पथकात ‘एसपीं’ने मुख्यालयातून दोन पथकाचे गठन करून त्यात एका पोलीस निरीक्षकांसह १६ शिपायांची नियुक्ती केली. प्रारंभी या विशेष पथकाने जिल्ह्यात अवैध वाहतूक रोखण्यासाठी चांगली कामगिरी बजावली. दरम्यान, ‘एसपीं’च्या या पथकाने ग्रामीण भागातील ठाणेदारांची भंबेरी उडाली. मात्र, आॅगस्ट २०१७ ते २८ फेब्रुवारी २०१८ पर्यत सात महिन्यांत २० हजार ६१२ वाहतूक नियमांचे उल्लंघन, अवैध वाहतुकींविरूद्ध केस दाखल केला. या कारवाईत ५२ लाख ६ हजार रूपये दंड वसूल केला. कारवाईची ही सरासरी प्रतिमहा २९४४ केसेस दाखल केल्याचे दिसून येते.विशेष पथकाने केलेल्या कारवाईच्या आकडेवारीनुसार प्रति पोलीस ठाणे अवैध वाहतुकीचे २४५ प्रकरणे दर महिन्याला दाखल झाल्याचे स्पष्ट होते. या एकूण आकडेवारीचा गोषवारा बघितला तर १२ पोलीस ठाण्यांत दरदिवशी आठ केसेस दाखल होत असल्याचे वास्तव आहे. मात्र, जिल्ह्यातील माहिती घेतली असता आजही मोठ्या प्रमाणात नियमबाह्य वाहतूक सुरू आहे. ‘एसपीं’नी अवैध वाहतूक रोखण्यासाठी विशेष पथक नेमल्याने ठाणेनिहाय होणारी कारवाई मंदावली आहे.या पथकामुळे वाहतूक पोलिसांचे अधिकार गोठविले असून ठाणेदारांमध्ये कमालिची अनास्था आली आहे. परंतु विशेष बाब म्हणून ठाणेदारांना चालान बूक दिल्याची माहिती आहे.क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूकग्रामीण भागात काळीपिवळी, आॅटोरिक्षा, मिनीडोर, खासगी बसेस, ट्रॅव्हल्स अशा विविध प्रकारच्या वाहनातून नियमबाह्य वाहतूक सुरू आहे. काळीपिवळी वाहनांमध्ये तर २० ते २५ प्रवासी वाहतूक होते. बसस्थानकासमोर अवैध वाहतुकीमुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले असून, ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी एकही वाहतूक शिपाई फिरकत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. किरकोळ अपघाताच्या घटना नित्याचीच बाब झाली आहे. परिणामी येत्या काळात गंभीर अपघाताची प्रतीक्षा पोलिसांना आहे काय, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.ग्रामीण भागात १२ ठाण्यांत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी अवैध वाहतूक रोखण्यासाठी विशेष पथक गठीत केले आहे. या पथकात १२ ठाण्याचे पोलीस शिपाई असले तरी मुख्यालयातून दोन स्वतंत्र पथकात १६ शिपाई आहे. विशेष पथकाकडून दरदिवशी ५० ते ६० केसेस दाखल करण्याचे टार्गेट आहे. ठाणेदारांनाही स्थानिक पातळीवर कारवाईसाठी चालान बूक दिले आहेत.- विलास कुलकर्णी, पोलीस निरीक्षक, ग्रामीण वाहतूक शाखा