शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

‘एसपीं’चे विशेष पथक कुचकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 23:50 IST

जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनाष कुमार यांनी अवैध वाहतूक रोखण्यासाठी जिल्ह्यातील ३१ पैकी १२ ठाण्यांत प्रायोगिक तत्त्वावर विशेष वाहतूक नियंत्रण पथक वर्षभरापूर्वी गठित केले. मात्र, आतापर्यंत या पथकाकडून झालेल्या कारवाईचा लेखाजोखा बघितला तर एका ठाण्यात प्रतिदिन आठ वाहनांवरच कारवाई करण्यात आली.

ठळक मुद्देअवैध वाहतूक फोफावली : दरदिवशी एका ठाण्यात आठ केसेस

संदीप मानकर ।आॅनलाईन लोकमतअमरावती : जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनाष कुमार यांनी अवैध वाहतूक रोखण्यासाठी जिल्ह्यातील ३१ पैकी १२ ठाण्यांत प्रायोगिक तत्त्वावर विशेष वाहतूक नियंत्रण पथक वर्षभरापूर्वी गठित केले. मात्र, आतापर्यंत या पथकाकडून झालेल्या कारवाईचा लेखाजोखा बघितला तर एका ठाण्यात प्रतिदिन आठ वाहनांवरच कारवाई करण्यात आली. परिणामी अवैध वाहतूक सुरूच असल्याचे वास्तव असून, ‘एसपीं’चे हे पथक कुचकामी ठरल्याचे चित्र आहे.जिल्ह्यात वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी ग्रामीण वाहतूक शाखेकडे सोपविली आहे. परंतु, ग्रामीण भागात अवैध वाहतूक फोफावल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी १२ पोलीस ठाण्यांतर्गत ६२ शिपाई असलेल्या विशेष पथकाचे गठन केले. विशेषत: या पथकात ‘एसपीं’ने मुख्यालयातून दोन पथकाचे गठन करून त्यात एका पोलीस निरीक्षकांसह १६ शिपायांची नियुक्ती केली. प्रारंभी या विशेष पथकाने जिल्ह्यात अवैध वाहतूक रोखण्यासाठी चांगली कामगिरी बजावली. दरम्यान, ‘एसपीं’च्या या पथकाने ग्रामीण भागातील ठाणेदारांची भंबेरी उडाली. मात्र, आॅगस्ट २०१७ ते २८ फेब्रुवारी २०१८ पर्यत सात महिन्यांत २० हजार ६१२ वाहतूक नियमांचे उल्लंघन, अवैध वाहतुकींविरूद्ध केस दाखल केला. या कारवाईत ५२ लाख ६ हजार रूपये दंड वसूल केला. कारवाईची ही सरासरी प्रतिमहा २९४४ केसेस दाखल केल्याचे दिसून येते.विशेष पथकाने केलेल्या कारवाईच्या आकडेवारीनुसार प्रति पोलीस ठाणे अवैध वाहतुकीचे २४५ प्रकरणे दर महिन्याला दाखल झाल्याचे स्पष्ट होते. या एकूण आकडेवारीचा गोषवारा बघितला तर १२ पोलीस ठाण्यांत दरदिवशी आठ केसेस दाखल होत असल्याचे वास्तव आहे. मात्र, जिल्ह्यातील माहिती घेतली असता आजही मोठ्या प्रमाणात नियमबाह्य वाहतूक सुरू आहे. ‘एसपीं’नी अवैध वाहतूक रोखण्यासाठी विशेष पथक नेमल्याने ठाणेनिहाय होणारी कारवाई मंदावली आहे.या पथकामुळे वाहतूक पोलिसांचे अधिकार गोठविले असून ठाणेदारांमध्ये कमालिची अनास्था आली आहे. परंतु विशेष बाब म्हणून ठाणेदारांना चालान बूक दिल्याची माहिती आहे.क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूकग्रामीण भागात काळीपिवळी, आॅटोरिक्षा, मिनीडोर, खासगी बसेस, ट्रॅव्हल्स अशा विविध प्रकारच्या वाहनातून नियमबाह्य वाहतूक सुरू आहे. काळीपिवळी वाहनांमध्ये तर २० ते २५ प्रवासी वाहतूक होते. बसस्थानकासमोर अवैध वाहतुकीमुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले असून, ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी एकही वाहतूक शिपाई फिरकत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. किरकोळ अपघाताच्या घटना नित्याचीच बाब झाली आहे. परिणामी येत्या काळात गंभीर अपघाताची प्रतीक्षा पोलिसांना आहे काय, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.ग्रामीण भागात १२ ठाण्यांत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी अवैध वाहतूक रोखण्यासाठी विशेष पथक गठीत केले आहे. या पथकात १२ ठाण्याचे पोलीस शिपाई असले तरी मुख्यालयातून दोन स्वतंत्र पथकात १६ शिपाई आहे. विशेष पथकाकडून दरदिवशी ५० ते ६० केसेस दाखल करण्याचे टार्गेट आहे. ठाणेदारांनाही स्थानिक पातळीवर कारवाईसाठी चालान बूक दिले आहेत.- विलास कुलकर्णी, पोलीस निरीक्षक, ग्रामीण वाहतूक शाखा