शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
5
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
6
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
7
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
8
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
9
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
10
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
11
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
12
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
13
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
14
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
15
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
16
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
17
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
18
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
19
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
20
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?

‘एसपीं’चे विशेष पथक कुचकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 23:50 IST

जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनाष कुमार यांनी अवैध वाहतूक रोखण्यासाठी जिल्ह्यातील ३१ पैकी १२ ठाण्यांत प्रायोगिक तत्त्वावर विशेष वाहतूक नियंत्रण पथक वर्षभरापूर्वी गठित केले. मात्र, आतापर्यंत या पथकाकडून झालेल्या कारवाईचा लेखाजोखा बघितला तर एका ठाण्यात प्रतिदिन आठ वाहनांवरच कारवाई करण्यात आली.

ठळक मुद्देअवैध वाहतूक फोफावली : दरदिवशी एका ठाण्यात आठ केसेस

संदीप मानकर ।आॅनलाईन लोकमतअमरावती : जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनाष कुमार यांनी अवैध वाहतूक रोखण्यासाठी जिल्ह्यातील ३१ पैकी १२ ठाण्यांत प्रायोगिक तत्त्वावर विशेष वाहतूक नियंत्रण पथक वर्षभरापूर्वी गठित केले. मात्र, आतापर्यंत या पथकाकडून झालेल्या कारवाईचा लेखाजोखा बघितला तर एका ठाण्यात प्रतिदिन आठ वाहनांवरच कारवाई करण्यात आली. परिणामी अवैध वाहतूक सुरूच असल्याचे वास्तव असून, ‘एसपीं’चे हे पथक कुचकामी ठरल्याचे चित्र आहे.जिल्ह्यात वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी ग्रामीण वाहतूक शाखेकडे सोपविली आहे. परंतु, ग्रामीण भागात अवैध वाहतूक फोफावल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी १२ पोलीस ठाण्यांतर्गत ६२ शिपाई असलेल्या विशेष पथकाचे गठन केले. विशेषत: या पथकात ‘एसपीं’ने मुख्यालयातून दोन पथकाचे गठन करून त्यात एका पोलीस निरीक्षकांसह १६ शिपायांची नियुक्ती केली. प्रारंभी या विशेष पथकाने जिल्ह्यात अवैध वाहतूक रोखण्यासाठी चांगली कामगिरी बजावली. दरम्यान, ‘एसपीं’च्या या पथकाने ग्रामीण भागातील ठाणेदारांची भंबेरी उडाली. मात्र, आॅगस्ट २०१७ ते २८ फेब्रुवारी २०१८ पर्यत सात महिन्यांत २० हजार ६१२ वाहतूक नियमांचे उल्लंघन, अवैध वाहतुकींविरूद्ध केस दाखल केला. या कारवाईत ५२ लाख ६ हजार रूपये दंड वसूल केला. कारवाईची ही सरासरी प्रतिमहा २९४४ केसेस दाखल केल्याचे दिसून येते.विशेष पथकाने केलेल्या कारवाईच्या आकडेवारीनुसार प्रति पोलीस ठाणे अवैध वाहतुकीचे २४५ प्रकरणे दर महिन्याला दाखल झाल्याचे स्पष्ट होते. या एकूण आकडेवारीचा गोषवारा बघितला तर १२ पोलीस ठाण्यांत दरदिवशी आठ केसेस दाखल होत असल्याचे वास्तव आहे. मात्र, जिल्ह्यातील माहिती घेतली असता आजही मोठ्या प्रमाणात नियमबाह्य वाहतूक सुरू आहे. ‘एसपीं’नी अवैध वाहतूक रोखण्यासाठी विशेष पथक नेमल्याने ठाणेनिहाय होणारी कारवाई मंदावली आहे.या पथकामुळे वाहतूक पोलिसांचे अधिकार गोठविले असून ठाणेदारांमध्ये कमालिची अनास्था आली आहे. परंतु विशेष बाब म्हणून ठाणेदारांना चालान बूक दिल्याची माहिती आहे.क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूकग्रामीण भागात काळीपिवळी, आॅटोरिक्षा, मिनीडोर, खासगी बसेस, ट्रॅव्हल्स अशा विविध प्रकारच्या वाहनातून नियमबाह्य वाहतूक सुरू आहे. काळीपिवळी वाहनांमध्ये तर २० ते २५ प्रवासी वाहतूक होते. बसस्थानकासमोर अवैध वाहतुकीमुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले असून, ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी एकही वाहतूक शिपाई फिरकत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. किरकोळ अपघाताच्या घटना नित्याचीच बाब झाली आहे. परिणामी येत्या काळात गंभीर अपघाताची प्रतीक्षा पोलिसांना आहे काय, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.ग्रामीण भागात १२ ठाण्यांत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी अवैध वाहतूक रोखण्यासाठी विशेष पथक गठीत केले आहे. या पथकात १२ ठाण्याचे पोलीस शिपाई असले तरी मुख्यालयातून दोन स्वतंत्र पथकात १६ शिपाई आहे. विशेष पथकाकडून दरदिवशी ५० ते ६० केसेस दाखल करण्याचे टार्गेट आहे. ठाणेदारांनाही स्थानिक पातळीवर कारवाईसाठी चालान बूक दिले आहेत.- विलास कुलकर्णी, पोलीस निरीक्षक, ग्रामीण वाहतूक शाखा