शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

अमरावतीत कृषकांच्या समर्थनासाठी पुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:31 IST

विविध संघटना, राजकीय पक्षांचा सहभाग, व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद ठेवली प्रतिष्ठाने अमरावती : केंद्र सरकारच्या शेतकरी-कामगारविरोधी धोरणाला विरोध व दिल्लीतील ...

विविध संघटना, राजकीय पक्षांचा सहभाग, व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद ठेवली प्रतिष्ठाने

अमरावती : केंद्र सरकारच्या शेतकरी-कामगारविरोधी धोरणाला विरोध व दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ८ डिसेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या भारत बंदला अमरावती जिल्ह्यातही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कॉंग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस तसेच किसान संघर्ष समन्वय समिती, वंचित बहुजन आघाडीसह विविध संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. व्यापाऱ्यांनीही प्रतिष्ठाने बंद ठेवली.

शहरातील राजकमल चौक येथे सकाळी ९ वाजता महाविकास आघाडीचे नेते एकत्र आलेत. यानंतर राजकमल चौक, गांधी चौक, इतवारा बाजार, जवाहर रोड, जयस्तंभ चौकातून रॅली काढण्यात आली. नेत्यांच्या आवाहनाला अनुसरून व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून आंदोलनाला भरभरून प्रतिसाद दिला.

बंद समर्थकांची रॅली ही जयस्तंभ चौकात पोहोचताच महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला हारार्पण करण्यात आले. इर्विन चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण केल्यानंतर या ठिकाणी केंद्रातील मोदी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मार्गदर्शन केले व या नवीन कृषिकायद्यांचा समाचार घेतला.

आंदोलनात आमदार सुलभा खोडके, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, शहराध्यक्ष किशोर बोरकर, शिवसेनेचे माजी खासदार अनंत गुढे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेखा ठाकरे, जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे, मनपाचे विरोधी पक्षनेता बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, अशोक सोनारकर यांच्यासह महाविकास आघाडीसह अन्य पक्षांचे तसेच संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.