शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

संयमी, मधुर वाणी आनंदनिर्मितीचा झरा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 22:44 IST

आयुष्यात पैसे किती कमविले यापेक्षा आनंद किती कमविला याचीच मोजदाद महत्त्वपूर्ण ठरते. संयमी आणि मधुर वाणीमुळे माझ्या यशस्वीतेची गती दुप्पट होऊ शकली, असे विनम्र प्रतिपादन शैलेश वानखेडे यांनी केले.

ठळक मुद्देशैलेश वानखेडे : ९० टक्के समस्या सुटतात

अमरावती : आयुष्यात पैसे किती कमविले यापेक्षा आनंद किती कमविला याचीच मोजदाद महत्त्वपूर्ण ठरते. संयमी आणि मधुर वाणीमुळे माझ्या यशस्वीतेची गती दुप्पट होऊ शकली, असे विनम्र प्रतिपादन शैलेश वानखेडे यांनी केले.एकवीरा देवस्थानचे सचिव आणि अमरावती शहराच्या नवनिर्माणात अग्रणी स्थानी असलेले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायी शैलेश वानखेडे म्हणतात, माझा शत्रूही आला तरी मी त्यांच्याशी हसूनच बोलतो. बोलण्यामुळे एकही शत्रू निर्माण होऊ नये, हा कटाक्ष मी पहिलेपासूनच पाळत आलो आहे. प्रचंड रागात कुणी आलेच तर त्यांचे बोलणे मी नीट ऐकून घेतो. शांतपणे आणि हळू आवाजात त्यांच्याशी संवाद साधतो. माझ्या या क्रियेला हमखास प्रतिसाद मिळतो. समोरच्या व्यक्तीच्या स्वराची उंची कमी होऊ लागते. एकदा की ती व्यक्ती हळू आवाजात बोलली की, अहंकार निवळत जातो नि संवादास सुरुवात होते. ९० टक्के समस्या तेथेच निकाली निघते. समस्या सुटली की माणूस जोडला जातो. हे सूत्र आता माझी जीवनपद्धतीच झाली आहे. विनोदाने मला काही मित्र म्हणतात, 'गोड बोलण्याने डायबिटीज होईल'; परंतु गोड बोलणे हा आनंदनिर्मितीचा झरा आहे, याची प्रचिती मला आली आहे. गोड वाणीचा तोटा नाही, आहे तो लाभच.व्यक्ती व्यावसायिक मूल्याची असो अगर नसो, घरी राबणारा कामगार असो वा तुमच्या संसाराची राणी, वाणी गोड असेल तर त्या व्यक्तीसोबतच्या संवादातून निर्माण होईल तो निखळ आनंदच. या पद्धतीने प्रत्येकजण तुमच्यासोबत जोडला जाईल. तीच तुमची शक्ती, असे सूत्र शैलेश वानखेडे यांनी 'लोकमत'च्या वाचकांसाठी उलगडले.