शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
4
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
5
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
6
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
7
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
8
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
9
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
10
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
11
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
13
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
14
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
15
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
16
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
17
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
18
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
20
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!

संयमी, मधुर वाणी आनंदनिर्मितीचा झरा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 22:44 IST

आयुष्यात पैसे किती कमविले यापेक्षा आनंद किती कमविला याचीच मोजदाद महत्त्वपूर्ण ठरते. संयमी आणि मधुर वाणीमुळे माझ्या यशस्वीतेची गती दुप्पट होऊ शकली, असे विनम्र प्रतिपादन शैलेश वानखेडे यांनी केले.

ठळक मुद्देशैलेश वानखेडे : ९० टक्के समस्या सुटतात

अमरावती : आयुष्यात पैसे किती कमविले यापेक्षा आनंद किती कमविला याचीच मोजदाद महत्त्वपूर्ण ठरते. संयमी आणि मधुर वाणीमुळे माझ्या यशस्वीतेची गती दुप्पट होऊ शकली, असे विनम्र प्रतिपादन शैलेश वानखेडे यांनी केले.एकवीरा देवस्थानचे सचिव आणि अमरावती शहराच्या नवनिर्माणात अग्रणी स्थानी असलेले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायी शैलेश वानखेडे म्हणतात, माझा शत्रूही आला तरी मी त्यांच्याशी हसूनच बोलतो. बोलण्यामुळे एकही शत्रू निर्माण होऊ नये, हा कटाक्ष मी पहिलेपासूनच पाळत आलो आहे. प्रचंड रागात कुणी आलेच तर त्यांचे बोलणे मी नीट ऐकून घेतो. शांतपणे आणि हळू आवाजात त्यांच्याशी संवाद साधतो. माझ्या या क्रियेला हमखास प्रतिसाद मिळतो. समोरच्या व्यक्तीच्या स्वराची उंची कमी होऊ लागते. एकदा की ती व्यक्ती हळू आवाजात बोलली की, अहंकार निवळत जातो नि संवादास सुरुवात होते. ९० टक्के समस्या तेथेच निकाली निघते. समस्या सुटली की माणूस जोडला जातो. हे सूत्र आता माझी जीवनपद्धतीच झाली आहे. विनोदाने मला काही मित्र म्हणतात, 'गोड बोलण्याने डायबिटीज होईल'; परंतु गोड बोलणे हा आनंदनिर्मितीचा झरा आहे, याची प्रचिती मला आली आहे. गोड वाणीचा तोटा नाही, आहे तो लाभच.व्यक्ती व्यावसायिक मूल्याची असो अगर नसो, घरी राबणारा कामगार असो वा तुमच्या संसाराची राणी, वाणी गोड असेल तर त्या व्यक्तीसोबतच्या संवादातून निर्माण होईल तो निखळ आनंदच. या पद्धतीने प्रत्येकजण तुमच्यासोबत जोडला जाईल. तीच तुमची शक्ती, असे सूत्र शैलेश वानखेडे यांनी 'लोकमत'च्या वाचकांसाठी उलगडले.