शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीत कीटकनाशकांची फवारणी करताना दोन शेतक-यांचा बळी, यंत्रणा हादरली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2017 19:26 IST

कीटकनाशकांची फवारणी करताना झालेल्या विषबाधेमुळे सलग दोन महिन्यांत दोन शेतक-यांचा बळी गेल्याची घटना उघड झाल्यानंतर जिल्ह्याची यंत्रणा हादरली आहे. सामान्य रूग्णालयाच्या माहितीनुसार यंदा जानेवारीपासून आतापर्यंत १५४ विषबाधेचे रूग्ण दाखल झाले असल्याने मृत्यूच्या फवारणीची लागण जिल्ह्यात झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

अमरावती : कीटकनाशकांची फवारणी करताना झालेल्या विषबाधेमुळे सलग दोन महिन्यांत दोन शेतक-यांचा बळी गेल्याची घटना उघड झाल्यानंतर जिल्ह्याची यंत्रणा हादरली आहे. सामान्य रूग्णालयाच्या माहितीनुसार यंदा जानेवारीपासून आतापर्यंत १५४ विषबाधेचे रूग्ण दाखल झाले असल्याने मृत्यूच्या फवारणीची लागण जिल्ह्यात झाल्याचे स्पष्ट झाले आहे. वैद्यकीय परीक्षण अहवालानंतर शेतकºयांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.कीटकनाशकांच्या फवारणीमुळे यवतमाळ जिल्ह्यात २०, तर विदर्भात ३५ शेतकºयांचा मृत्यू झाल्यानंतर प्रामुख्याने हा प्रश्न चर्च्चेत आला. शासनाने ही बाब गंभीरतेने घेतल्यानंतर जिल्ह्यातदेखील अशा घटनांचा शोध घेण्यास सुरूवात झाली. जिल्ह्यात अशाप्रकारे एकाही शेतकºयाचा मृत्यू झालेला नाही, यावर जिल्हा प्रशासन ठाम होते. मात्र सात आॅक्टोबरनंतर विविध रूग्णालयांकडून माहिती आल्यानंतर दोन महिन्यांत दोन शेतकºयांचा मृत्यू विषबाधेने झाल्याची बाब जिल्हा प्रशासनाने तत्त्वत: मान्य केली आहे. १ जानेवारी ते ७ आॅक्टोबरपर्यंतच्या कालावधीत १५४ विषबाधेचे रूग्ण दाखल झाल्याची माहिती कृषी विभागाने सामान्य रूग्णालयाच्या हवाल्याने दिली. मात्र रूग्णामध्ये कीटकनाशकांच्या फवारणीमुळे किती शेतकºयांना विषबाधा झाली याची नेमकी माहिती नाही. कृषी विभागाच्या माहितीनुसार, माहुली जहांगीर ठाण्यांतर्गत डवरगाव येथील प्रदीप आवारे यांचा २९ सप्टेंबरला व येवदा ठाण्यांतर्गत ठाकरे यांचा ७ आॅक्टोबरला विषबाधेने मृत्यू झाला. या दोन्ही प्रकरणांत शवविच्छेदन अहवाल अप्राप्त असल्याने मृत्यू नेमका कशामुळे झाला, याविषयी अहवालाची प्रतीक्षा आहे. दरम्यान पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी संबंधित यंत्रणांची बैठक घेऊन कार्यवाहीचे निर्र्देश दिले आहेत.

आॅक्टोबरमध्ये विषबाधेचे १३ रूग्ण जिल्हा सामान्य रूग्णालयात एक आॅक्टोबरपासून आतापर्यत विषबाधेचे १३ रूग्ण दाखल झालेत, तर एक जानेवारीपासून आतापर्यंत १५४ रूग्ण जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल झाल्याची माहिती निवासी उपजिल्हााधिकारी नितीन व्यवहारे यांनी दिली. या रूग्णामध्ये कीटकनाशकांच्या फवारणीमुळे किती रूग्णांना विषबाधा झाली याची माहिती जिल्हा सामान्य रूग्णालयाकडून अद्याप मिळू शकली नाही. खासगी रूग्णालयात किती रूग्णांनी विषबाधेचा उपचार घेतला, याबाबत शासकीय यंत्रणा अनभिज्ञ आहे. 

ही आहेत विषबाधेची कारणेयंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस असला तरी पूरक पावसामुळे कपाशीची झालेली वाढ ही माणसांच्या उंचीपेक्षा अधिक आहे. या पिकावर फवारणी करताना हवेची दिशा बदलल्यास फवारा थेट शेतक-यांच्या चेह-यावर उडतो. नाका-तोंडातून विष थेट शरीरात जाते. बॅटरीमुळे गतीने चालणाºया चायना स्प्रे पंपाचा वापर, अप्रमाणित व अतिविषारी कीटकनाशकांची फवारणी, यंदा सप्टेंबरपासूनच कडक उन्हाचे चटके असल्याने शेतकºयांना आलेल्या घामामुळे उघड्या त्वचेच्या छिद्रातून कीटकनाशकाचे अंश शरीरात जातात आदी कारणांमुळे शेतकºयांना कीटकनाशकांची विषबाधा होते.

कीटकनाशकांची फवारणी करताना घ्यावयाच्या दक्षतेबाबत शेतकºयांमध्ये जागृती करण्यात येत आहे. सुरक्षित वापराचे निकष पूर्ण न करणारी कीटकनाशके विकणा-या दुकानदारांविरुद्ध कठोर कारवाईचे निर्देश यंत्रणेला दिले आहेत.              - प्रवीण पोटे,              पालकमंत्री, अमरावती

टॅग्स :Farmerशेतकरी