शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

अमरावतीत कीटकनाशकांची फवारणी करताना दोन शेतक-यांचा बळी, यंत्रणा हादरली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2017 19:26 IST

कीटकनाशकांची फवारणी करताना झालेल्या विषबाधेमुळे सलग दोन महिन्यांत दोन शेतक-यांचा बळी गेल्याची घटना उघड झाल्यानंतर जिल्ह्याची यंत्रणा हादरली आहे. सामान्य रूग्णालयाच्या माहितीनुसार यंदा जानेवारीपासून आतापर्यंत १५४ विषबाधेचे रूग्ण दाखल झाले असल्याने मृत्यूच्या फवारणीची लागण जिल्ह्यात झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

अमरावती : कीटकनाशकांची फवारणी करताना झालेल्या विषबाधेमुळे सलग दोन महिन्यांत दोन शेतक-यांचा बळी गेल्याची घटना उघड झाल्यानंतर जिल्ह्याची यंत्रणा हादरली आहे. सामान्य रूग्णालयाच्या माहितीनुसार यंदा जानेवारीपासून आतापर्यंत १५४ विषबाधेचे रूग्ण दाखल झाले असल्याने मृत्यूच्या फवारणीची लागण जिल्ह्यात झाल्याचे स्पष्ट झाले आहे. वैद्यकीय परीक्षण अहवालानंतर शेतकºयांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.कीटकनाशकांच्या फवारणीमुळे यवतमाळ जिल्ह्यात २०, तर विदर्भात ३५ शेतकºयांचा मृत्यू झाल्यानंतर प्रामुख्याने हा प्रश्न चर्च्चेत आला. शासनाने ही बाब गंभीरतेने घेतल्यानंतर जिल्ह्यातदेखील अशा घटनांचा शोध घेण्यास सुरूवात झाली. जिल्ह्यात अशाप्रकारे एकाही शेतकºयाचा मृत्यू झालेला नाही, यावर जिल्हा प्रशासन ठाम होते. मात्र सात आॅक्टोबरनंतर विविध रूग्णालयांकडून माहिती आल्यानंतर दोन महिन्यांत दोन शेतकºयांचा मृत्यू विषबाधेने झाल्याची बाब जिल्हा प्रशासनाने तत्त्वत: मान्य केली आहे. १ जानेवारी ते ७ आॅक्टोबरपर्यंतच्या कालावधीत १५४ विषबाधेचे रूग्ण दाखल झाल्याची माहिती कृषी विभागाने सामान्य रूग्णालयाच्या हवाल्याने दिली. मात्र रूग्णामध्ये कीटकनाशकांच्या फवारणीमुळे किती शेतकºयांना विषबाधा झाली याची नेमकी माहिती नाही. कृषी विभागाच्या माहितीनुसार, माहुली जहांगीर ठाण्यांतर्गत डवरगाव येथील प्रदीप आवारे यांचा २९ सप्टेंबरला व येवदा ठाण्यांतर्गत ठाकरे यांचा ७ आॅक्टोबरला विषबाधेने मृत्यू झाला. या दोन्ही प्रकरणांत शवविच्छेदन अहवाल अप्राप्त असल्याने मृत्यू नेमका कशामुळे झाला, याविषयी अहवालाची प्रतीक्षा आहे. दरम्यान पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी संबंधित यंत्रणांची बैठक घेऊन कार्यवाहीचे निर्र्देश दिले आहेत.

आॅक्टोबरमध्ये विषबाधेचे १३ रूग्ण जिल्हा सामान्य रूग्णालयात एक आॅक्टोबरपासून आतापर्यत विषबाधेचे १३ रूग्ण दाखल झालेत, तर एक जानेवारीपासून आतापर्यंत १५४ रूग्ण जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल झाल्याची माहिती निवासी उपजिल्हााधिकारी नितीन व्यवहारे यांनी दिली. या रूग्णामध्ये कीटकनाशकांच्या फवारणीमुळे किती रूग्णांना विषबाधा झाली याची माहिती जिल्हा सामान्य रूग्णालयाकडून अद्याप मिळू शकली नाही. खासगी रूग्णालयात किती रूग्णांनी विषबाधेचा उपचार घेतला, याबाबत शासकीय यंत्रणा अनभिज्ञ आहे. 

ही आहेत विषबाधेची कारणेयंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस असला तरी पूरक पावसामुळे कपाशीची झालेली वाढ ही माणसांच्या उंचीपेक्षा अधिक आहे. या पिकावर फवारणी करताना हवेची दिशा बदलल्यास फवारा थेट शेतक-यांच्या चेह-यावर उडतो. नाका-तोंडातून विष थेट शरीरात जाते. बॅटरीमुळे गतीने चालणाºया चायना स्प्रे पंपाचा वापर, अप्रमाणित व अतिविषारी कीटकनाशकांची फवारणी, यंदा सप्टेंबरपासूनच कडक उन्हाचे चटके असल्याने शेतकºयांना आलेल्या घामामुळे उघड्या त्वचेच्या छिद्रातून कीटकनाशकाचे अंश शरीरात जातात आदी कारणांमुळे शेतकºयांना कीटकनाशकांची विषबाधा होते.

कीटकनाशकांची फवारणी करताना घ्यावयाच्या दक्षतेबाबत शेतकºयांमध्ये जागृती करण्यात येत आहे. सुरक्षित वापराचे निकष पूर्ण न करणारी कीटकनाशके विकणा-या दुकानदारांविरुद्ध कठोर कारवाईचे निर्देश यंत्रणेला दिले आहेत.              - प्रवीण पोटे,              पालकमंत्री, अमरावती

टॅग्स :Farmerशेतकरी