शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

-आता विशेष विवाह नोंदणी झाली आॅनलाईन

By admin | Updated: September 11, 2016 00:11 IST

विवाहेच्छुकांना विशेष विवाह कायद्यानुसार विवाह नोंदणीसाठी शासकीय कार्यालयांमध्ये करावी लागणारी पायपीट थांबली आहे.

आधार लिंक अनिवार्य : पायपीट थांबली

अमरावती : विवाहेच्छुकांना विशेष विवाह कायद्यानुसार विवाह नोंदणीसाठी शासकीय कार्यालयांमध्ये करावी लागणारी पायपीट थांबली आहे. विवाह नोंदणीसाठी आता आॅनलॉईन नोंदणी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. गत चार महिन्यांत जिल्ह्यात २५५ जोडप्यांनी आॅनलाईन विवाह नोंदणीचा लाभ घेतल्याची माहिती आहे.यापूर्वी विवाह नोंदणीची पद्धत ही वेळकाढू होती. त्यामुळे विवाह इच्छुकांना कागदपत्रांची पूर्तता करताना दमझाक व्हायची. मात्र आता विशेष विवाह नोंदणी कायद्यान्वये आधार लिंकिंग करून आॅनलॉईन विवाह नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे वधू-वरांना थेट लग्नासाठीच विवाह नोंदणी कार्यालयात थेट जावे लागणार आहे. या पारदर्शक प्रणालीमुळे विवाहेच्छुकांना शासकीय कार्यालयात मारावे लागणारे हेलपाटे बंद झाले आहे. विवाह नोंदणी पद्धतीमुळे वधू- वरांना विवाह नोंदणी कार्यालयात जाऊन पूर्वी नोंदणी करावी लागत होती. त्यानंतर मिळालेल्या तारखेत सदर कार्यालयात उपस्थित राहून ‘लगीनघाई’ करावी लागत होती. त्यामुळे वधू-वरांना विवाह नोंदणी कार्यालयात किमान दोन वेळा येरझारा माराव्या लागत होत्या. यामुळे अनेक अडचणींना सामारे जावे लागत होते. दरम्यान विवाह नोंदणी अर्ज भरणारे दलाल, वेळेपूर्वी विवाह नोंदणी करून देण्याचे आमीष देऊन वधू-वरांची आर्थिक फसवणूक व्हायची. परंतु आता विशेष विवाह नोंदणी कायद्यामुळे पारदर्शकता आणली गेली आहे. त्यामुळे दलालांकडून होणारी फसवणूक थांबली आहे. वधू-वरांना विवाह नोंदणी सुलभ व्हावी, यासाठी शासनाच्या नोंदणी व मुंद्राक शुल्क विभागाने विवाहासाठी आॅनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. विवाह नोंदणीसाठी कार्यालयात ये- जा करण्याची भानगड संपुष्टात आली आहे. घरूनच विवाह नोंदणी करता येणार आहे. यापूर्वी विवाह नोंदणी करताना कागदपत्रांची पूर्तता, गुंतागुंत बंद करण्यात आली आहे. मे २०१६ पासून विशेष विवाह नोंदणी सुरु झाली आहे. (प्रतिनिधी)१९५४ च्या कायद्यानुसार वधू-वरांना लाभविशेष विवाह नोंदणी करण्याची संधी ही राज्य शासनाच्या मुंद्राक व शुल्क विभागाने १९५४ च्या कायद्यानुसार वधू-वरांना उपलब्ध करून दिली आहे. आतापर्यंत या कायद्यानुसार जिल्ह्यात २५५ जोडप्यांनी विशेष विवाह कायद्याचा लाभ घेतल्याची माहिती आहे. ३ मे २०१६ पासून विशेष विवाह नोंदणी केली जात आहे.आॅनलाईन विवाह नोंदणी करणाऱ्या वधू-वरांना कलम ५ नुसार नोटीस बजावून कागदपत्रांसह विवाह नोंदणीसाठी बोलाविले जाते. दोन साक्षीदार, आधार कार्ड हे अनिवार्य असून नोंदणीनंतर ६० दिवसांच्या आत विवाह करणे बंधनकारक आहे.- अशोक धुळे,दुय्यम निबंधक, अमरावती