शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
4
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
5
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
6
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
7
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
8
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
9
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
10
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
11
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
12
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
13
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
14
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
15
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
17
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
18
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
19
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
20
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त

-आता विशेष विवाह नोंदणी झाली आॅनलाईन

By admin | Updated: September 11, 2016 00:11 IST

विवाहेच्छुकांना विशेष विवाह कायद्यानुसार विवाह नोंदणीसाठी शासकीय कार्यालयांमध्ये करावी लागणारी पायपीट थांबली आहे.

आधार लिंक अनिवार्य : पायपीट थांबली

अमरावती : विवाहेच्छुकांना विशेष विवाह कायद्यानुसार विवाह नोंदणीसाठी शासकीय कार्यालयांमध्ये करावी लागणारी पायपीट थांबली आहे. विवाह नोंदणीसाठी आता आॅनलॉईन नोंदणी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. गत चार महिन्यांत जिल्ह्यात २५५ जोडप्यांनी आॅनलाईन विवाह नोंदणीचा लाभ घेतल्याची माहिती आहे.यापूर्वी विवाह नोंदणीची पद्धत ही वेळकाढू होती. त्यामुळे विवाह इच्छुकांना कागदपत्रांची पूर्तता करताना दमझाक व्हायची. मात्र आता विशेष विवाह नोंदणी कायद्यान्वये आधार लिंकिंग करून आॅनलॉईन विवाह नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे वधू-वरांना थेट लग्नासाठीच विवाह नोंदणी कार्यालयात थेट जावे लागणार आहे. या पारदर्शक प्रणालीमुळे विवाहेच्छुकांना शासकीय कार्यालयात मारावे लागणारे हेलपाटे बंद झाले आहे. विवाह नोंदणी पद्धतीमुळे वधू- वरांना विवाह नोंदणी कार्यालयात जाऊन पूर्वी नोंदणी करावी लागत होती. त्यानंतर मिळालेल्या तारखेत सदर कार्यालयात उपस्थित राहून ‘लगीनघाई’ करावी लागत होती. त्यामुळे वधू-वरांना विवाह नोंदणी कार्यालयात किमान दोन वेळा येरझारा माराव्या लागत होत्या. यामुळे अनेक अडचणींना सामारे जावे लागत होते. दरम्यान विवाह नोंदणी अर्ज भरणारे दलाल, वेळेपूर्वी विवाह नोंदणी करून देण्याचे आमीष देऊन वधू-वरांची आर्थिक फसवणूक व्हायची. परंतु आता विशेष विवाह नोंदणी कायद्यामुळे पारदर्शकता आणली गेली आहे. त्यामुळे दलालांकडून होणारी फसवणूक थांबली आहे. वधू-वरांना विवाह नोंदणी सुलभ व्हावी, यासाठी शासनाच्या नोंदणी व मुंद्राक शुल्क विभागाने विवाहासाठी आॅनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. विवाह नोंदणीसाठी कार्यालयात ये- जा करण्याची भानगड संपुष्टात आली आहे. घरूनच विवाह नोंदणी करता येणार आहे. यापूर्वी विवाह नोंदणी करताना कागदपत्रांची पूर्तता, गुंतागुंत बंद करण्यात आली आहे. मे २०१६ पासून विशेष विवाह नोंदणी सुरु झाली आहे. (प्रतिनिधी)१९५४ च्या कायद्यानुसार वधू-वरांना लाभविशेष विवाह नोंदणी करण्याची संधी ही राज्य शासनाच्या मुंद्राक व शुल्क विभागाने १९५४ च्या कायद्यानुसार वधू-वरांना उपलब्ध करून दिली आहे. आतापर्यंत या कायद्यानुसार जिल्ह्यात २५५ जोडप्यांनी विशेष विवाह कायद्याचा लाभ घेतल्याची माहिती आहे. ३ मे २०१६ पासून विशेष विवाह नोंदणी केली जात आहे.आॅनलाईन विवाह नोंदणी करणाऱ्या वधू-वरांना कलम ५ नुसार नोटीस बजावून कागदपत्रांसह विवाह नोंदणीसाठी बोलाविले जाते. दोन साक्षीदार, आधार कार्ड हे अनिवार्य असून नोंदणीनंतर ६० दिवसांच्या आत विवाह करणे बंधनकारक आहे.- अशोक धुळे,दुय्यम निबंधक, अमरावती