शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

आश्वासनावर शेतकऱ्यांची बोळवण

By admin | Updated: July 26, 2014 23:52 IST

जिल्ह्यातील २०० च्या वर शेतकऱ्यांचे सोयाबीन व कपाशी बियाणे उगवलेच नसल्याच्या तक्रारी तालुकास्तरीय समिती व जिल्हा कृषी विकास अधिकाऱ्यांकडे दाखल आहेत. याविषयीचे पंचनामे युद्धस्तरावर सुरू आहेत.

बियाणे उगवले नसल्याच्या २०० च्यावर तक्रारी : कोण देणार मोफत बियाणे? कृषी विभाग अनभिज्ञगजानन मोहोड - अमरावतीजिल्ह्यातील २०० च्या वर शेतकऱ्यांचे सोयाबीन व कपाशी बियाणे उगवलेच नसल्याच्या तक्रारी तालुकास्तरीय समिती व जिल्हा कृषी विकास अधिकाऱ्यांकडे दाखल आहेत. याविषयीचे पंचनामे युद्धस्तरावर सुरू आहेत. निकृष्ट बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यासाठी शेतकऱ्यांना मोफत बियाणे देण्याचे आश्वासन कृषिमंत्र्यांनी देऊन शेतकऱ्यांची बोळवण केली. प्रत्यक्षात हे मोफत बियाणे शेतकऱ्यांना कोण पुरविणार? याविषयी जिल्हा परिषदेचा कृषी विभाग अनभिज्ञ आहे. दीड महिन्यांपासून पावसाने दडी मारल्यानंतर आलेल्या पावसाने शेतकऱ्यांना आशा दाखविली. मात्र बाजारात विक्रीसाठी असणाऱ्या महाबीजसह नामांकित कंपन्याच्या बियाण्यांची उगवणशक्ती कमी असल्याने पेरलेले बियाणे उगवलेच नाहीत. मूग व उडदाचा कालावधी संपल्याने शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीन पेरणीला पसंती दिली. सद्यस्थितीत जिल्ह्यात २ लाख ५० हजार ९०० हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी झाली. पेरणीसाठी ट्रॅक्टर, मजुरी, बियाणे व खते असा एकरी १० हजारांच्यावर खर्च शेतकऱ्यांनी केला. जिल्ह्यात २५ हजार हेक्टर क्षेत्रामधील बियाणे उगवलेच नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. या क्षेत्रावर दुबार पेरणीचे सावट आहे. तक्रारींचे निवारण करण्यासाठी उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती कार्यरत आहे. ही समिती शेतांचे पंचनामे करीत आहे. या फसगत झालेल्या शेतकऱ्यांना मोफत बियाणे देण्याची घोषणा कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अमरावती येथे केली. शेतकऱ्यांना मोफत बियाणे मिळालेले नाहीत. कृषी विभाग केवळ आश्वासनावर शेतकऱ्यांची बोळवण करीत आहे. मोफत बियाण्यांचा संभ्रम कायमशेतकऱ्यांनी पेरणी केलेले बियाणे निघालेच नाही, अशा शेतकऱ्यांना मोफत बियाणे देण्याची घोषणा राज्याचे कृषिमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अमरावती येथे २१ जुलै रोजी केली. मात्र हे मोफत बियाणे कोण देणार? याविषयीची माहिती कृषी विभागाला नाही. याविषयी अद्याप संभ्रम कायम आहे. महाबीज ३३५ या वाणांच्या तक्रारीपूर्णानगर येथील शेतकऱ्यांनी गावातील सुमित कृषी सेवा केंद्रातून महाबीज कंपनीचे ३३५ हे बियाणे खरेदी केले. पेरणीपश्चात आठ, दहा दिवसांचा कालावधी ओलांडला असताना बियाणे उगवलेच नसल्याच्या अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी कृषी विभागाकडे दाखल झाल्या आहेत.