शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

धामणगाव तालुक्यातील सोयाबीन पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 05:00 IST

धामणगाव तालुक्यात यंदा २५ हजार ४३१ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली. यात ९३०५, जेए ३३५, ३३६ या लवकर येणाऱ्या वाणांची सर्वाधिक १६ हजार २८९ हेक्टरमध्ये पेरणी जून महिन्यातच झाली. नंतर पावसाने आठ दिवस खंड दिला. मात्र, सोयाबीनची स्थिती मध्यंतरीच्या काळात सुधारली. पिकांची स्थिती पाहून शेतकऱ्यांमध्ये उत्साह संचारला होता. मात्र, तालुक्यात सतत पाच दिवसांपासून पावसाची हजेरी असल्याने पिके पाण्याखाली आली.

ठळक मुद्देसंकट : प्रथम खोडकिडी आता कोंब, सलग पाचव्या दिवशी पाऊस

मोहन राऊत।लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : प्रथम अल्प पाऊस, त्यानंतर खोड किडीच्या वाढत्या प्रादुर्भावाने शेंगांची वाढ खुंटली. तालुक्यात आता पाच दिवसांपासून अधूनमधून सलग सुरू आहे. त्यामुळे पाण्याखाली गेलेल्या तब्बल सात हजार हेक्टरमधील सोयाबीनला कोंब फुटण्यास सुरुवात झाली आहे. आधीच डबघाईस आलेल्या शेतकऱ्यांवर हे नवीन संकट ओढवल्याने चिंतेत भर पडली आहे.धामणगाव तालुक्यात यंदा २५ हजार ४३१ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली. यात ९३०५, जेए ३३५, ३३६ या लवकर येणाऱ्या वाणांची सर्वाधिक १६ हजार २८९ हेक्टरमध्ये पेरणी जून महिन्यातच झाली. नंतर पावसाने आठ दिवस खंड दिला. मात्र, सोयाबीनची स्थिती मध्यंतरीच्या काळात सुधारली. पिकांची स्थिती पाहून शेतकऱ्यांमध्ये उत्साह संचारला होता. मात्र, तालुक्यात सतत पाच दिवसांपासून पावसाची हजेरी असल्याने पिके पाण्याखाली आली. लागलीच खोडअळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे निम्म्यापेक्षा अधिक शेंगा बेपत्ता झाल्या आहेत. उर्वरित शेंगा भरत असताना, आता तालुक्यात ऊन-पावसाचा खेळ सुरू झाला.तालुक्यात पाऊस दररोज दमदार हजेरी लावत आहे. ज्या शेतात जलसंचय होतो, त्या शेतात भरलेल्या शेंगांना कोंब फुटत आहे. तालुक्यातील गव्हा फरकाडे, कावली, वसाड, अंजनसिंगी, नायगाव, सोनोरा काकडे, चिंचोली, झाडगाव, गिरोली, चिचपूर, मंगरूळ दस्तगीर, झाडा, आष्टा तसेच नदीकाठच्या अनेक शिवारांतील सोयाबीन पिकाला सर्वाधिक फटका बसू लागला आहे. मार्च महिन्यापासून कोरोनाने थैमान घातल्याने अनेकांचा रोजगार हिरावला असताना जेमतेम जुळवाजुळव करून शेतकºयांनी बी-बियाणे खरेदी करून पेरणी आटोपली. पिकांची स्थितीसुद्धा चांगली होती. परंतु आता अर्धे पीक खराब झाले असून पावसामुळे शेतकºयांची चिंता अधिकच वाढली आहे. एवढेच नव्हे तर आपल्या कुटुंबाला दोन वेळचे अन्न द्यायचे कसे, असा प्रश्न काही शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे. गतवर्षी अनेक शेतकºयांना पीक नुकसानभरपाईचा लाभ मिळालेला नाही, त्या शेतकºयांच्या तालुका मुख्यालयी येरझारा सुरूच आहेत. शासनाने या संकटकाळात तरी त्वरित मदत करावी, अशी मागणी तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकºयांनी केली आहे.तालुक्यातील कमी अधिक पाऊस तसेच सोयाबीनला खोडअळीचा प्रादुर्भाव व आता कोंब फुटल्यामुळे झालेल्या नुकसानाचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. संबंधित यादी प्रशासनाकडे त्वरित पाठविण्यात येईल.- सागर इंगोले,तालुका कृषी अधिकारीपाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सोयाबीनला कोंब फुटले. दरवर्षीप्रमाणे नापिकीचे संकट यंदाही ओढावले आहे.- प्रल्हाद फरकाडे,शेतकरी, गव्हा फरकाडे

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती