शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

सोयाबीन उगवण तक्रारींची पुनरावृत्ती होऊ नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:12 IST

अमरावती : सोयाबीनच्या उगवणबाबत गत हंगामात मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तसे पुन्हा घडू नये, यासाठी आवश्यक ...

अमरावती : सोयाबीनच्या उगवणबाबत गत हंगामात मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तसे पुन्हा घडू नये, यासाठी आवश्यक उपाययोजनांची भरीव अंमलबजावणी करण्याचे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी शुक्रवारी दिले.

खरीप हंगाम नियोजनाबाबत कृषी विभागाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी आमदार सुलभा खोडके, आमदार बळवंत वानखडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यपालन अधिकारी अविश्यांत पंडा, कृषी सहसंचालक शंकर तोटावार, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी विजय चवाळे आदी उपस्थित होते.

खरिपासाठी गुणवत्तापूर्ण बियाण्याचा पुरेसा पुरवठा सर्वदूर झाला पाहिजे. त्याअनुषंगाने सर्वतोपरी प्रयत्न व्हावेत. गतवर्षी अवकाळी पावसाने नुकसान झाले. त्यात बियाण्याची गुणवत्ता कमी झाल्याने पुन्हा पेरणीची वेळ आली. हे पुन्हा घडू नये, यासाठी आताच उपाय राबवावेत. बियाण्याची कमतरता भासू नये. बियाण्याची साठेबाजी होता कामा नये. असा प्रकार कुठेही झाल्याचे आढळल्यास कुणाचीही गय करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

बॉक्स

खरिपासाठी सोयाबीन पिकाखाली २.७० लाख प्रस्तावित असून, २.१५ लाख क्विंटल बियाण्याची गरज आहे. त्यानुसार महाबीजकडे ८५ हजार क्विंटल व खासगी कंपन्यांकडे ४५,३१६ क्विंटल मागणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना घरचे बियाणे जतन करण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार ९२,८०५ क्विंटल बियाणे उपलब्ध असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी सांगितले.

बॉक्स

ही खबरदारी आवश्यक

शेतकऱ्यांनीही उगवणक्षमता तपासून ती ७० टक्के असल्याची खात्री करून पेरणी करावी. घरचे सोयाबीन बियाणेही तपासूनच पेरावे. सोयाबीन बियाणे पेरताना चार सेंटिमीटरपेक्षा जास्त खोलीवर पेरू नये. ट्रॅक्टरने पेरायचे झाल्यास अनुभवी ड्रायव्हरकडून पेरणी करावी. बियाणे बीजप्रक्रिया केल्याशिवाय पेरू नये. बीजप्रक्रियेसाठी बुरशीनाशक किंवा जीवाणू संघ वापरावा आदी सूचना कृषी विभागाने केल्या आहेत.