शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सोयाबीन उगवण तक्रारींची पुनरावृत्ती होऊ नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:12 IST

अमरावती : सोयाबीनच्या उगवणबाबत गत हंगामात मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तसे पुन्हा घडू नये, यासाठी आवश्यक ...

अमरावती : सोयाबीनच्या उगवणबाबत गत हंगामात मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तसे पुन्हा घडू नये, यासाठी आवश्यक उपाययोजनांची भरीव अंमलबजावणी करण्याचे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी शुक्रवारी दिले.

खरीप हंगाम नियोजनाबाबत कृषी विभागाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी आमदार सुलभा खोडके, आमदार बळवंत वानखडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यपालन अधिकारी अविश्यांत पंडा, कृषी सहसंचालक शंकर तोटावार, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी विजय चवाळे आदी उपस्थित होते.

खरिपासाठी गुणवत्तापूर्ण बियाण्याचा पुरेसा पुरवठा सर्वदूर झाला पाहिजे. त्याअनुषंगाने सर्वतोपरी प्रयत्न व्हावेत. गतवर्षी अवकाळी पावसाने नुकसान झाले. त्यात बियाण्याची गुणवत्ता कमी झाल्याने पुन्हा पेरणीची वेळ आली. हे पुन्हा घडू नये, यासाठी आताच उपाय राबवावेत. बियाण्याची कमतरता भासू नये. बियाण्याची साठेबाजी होता कामा नये. असा प्रकार कुठेही झाल्याचे आढळल्यास कुणाचीही गय करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

बॉक्स

खरिपासाठी सोयाबीन पिकाखाली २.७० लाख प्रस्तावित असून, २.१५ लाख क्विंटल बियाण्याची गरज आहे. त्यानुसार महाबीजकडे ८५ हजार क्विंटल व खासगी कंपन्यांकडे ४५,३१६ क्विंटल मागणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना घरचे बियाणे जतन करण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार ९२,८०५ क्विंटल बियाणे उपलब्ध असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी सांगितले.

बॉक्स

ही खबरदारी आवश्यक

शेतकऱ्यांनीही उगवणक्षमता तपासून ती ७० टक्के असल्याची खात्री करून पेरणी करावी. घरचे सोयाबीन बियाणेही तपासूनच पेरावे. सोयाबीन बियाणे पेरताना चार सेंटिमीटरपेक्षा जास्त खोलीवर पेरू नये. ट्रॅक्टरने पेरायचे झाल्यास अनुभवी ड्रायव्हरकडून पेरणी करावी. बियाणे बीजप्रक्रिया केल्याशिवाय पेरू नये. बीजप्रक्रियेसाठी बुरशीनाशक किंवा जीवाणू संघ वापरावा आदी सूचना कृषी विभागाने केल्या आहेत.