शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

खरिपाच्या ५० टक्के पेरणी क्षेत्रात सोयाबीन

By admin | Updated: May 25, 2015 00:29 IST

यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात ७ लाख १५ हजार क्षेत्रात पेरणी होणार आहे. यासाठी एक लाख २७ हजार क्विंटल ...

सात लाखांवर क्षेत्र : सोयाबीनसाठी १ लाख १५ हजार क्विंटल बियाण्यांची गरजअमरावती : यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात ७ लाख १५ हजार क्षेत्रात पेरणी होणार आहे. यासाठी एक लाख २७ हजार क्विंटल बियाणे लागणार आहे. सर्वाधिक ३ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीन असल्याने पेरणीसाठी एक लाख १५ हजार क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. कृषी विभागाद्वारा सोयाबीन बियाण्यांची टंचाई भासणार नसल्याचे सांगण्यात येत असले तरी या हंगामात पेरणीक्षेत्रात वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता सोयाबीन बियाण्यांची टंचाई भासण्याची शक्यता आहे. खरिपासाठी संकरित कापूस ३ हजार ५९१ क्विंटल, सुधारित कापूस ६० क्विंटल, तूर ४ हजार ७७६ क्विंटल, मूग एक हजार २६० क्विंटल, संकरित ज्वार २ हजार क्विंटल, उडीद २४४ क्विंटल असे एकूण १ लाख २६ हजार ६८१ क्विंटल बियाणे लागणार आहे. तालुकानिहाय आकडेवारी पाहता अमरावती तालुक्यात १२ हजार १४२ क्विंटल, भातकुली १० हजार ७१४ क्विंटल, नांदगाव खंडेश्वर १५ हजार ६५८ क्विंटल बियाणे लागणार आहे. शेतकऱ्यांना जागरूक करण्याची गरजखरीप हंगामात सोयाबीन पेरणीपूर्वी बियाण्याला लिक्विड किंवा पावडर स्वरुपातील ‘रायझोबियम अधिक पीएसबी अधिक ट्रायकोडर्मा’ या जिवाणू खतांची व जैविक बुरशीनाशकाची प्रक्रिया करणे फायदेशीर आहे. तसेच बियाणे प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये पुरसे प्रबोधन व जागरुकता निर्माण करण्याची गरज असल्याचे अमरावती जिल्हा कृषी साहित्य विक्रेता संघाने निवेदनातून कळविले आहे. कृषी साहित्य विक्रेता संघाची प्रतिक्रिया सोयाबीन बियाणे उगवणशक्तीबाबत अत्यंत संवेदनशील आहे. साठवणुकीच्या गोदामातील मे-जून मधील अधिक तापमान, पेरणीच्या वेळी जमिनीतील ओलावा, पेरणीची खोली, पेरणीनंतर पावसाचा ताण किंवा बियाणे दडवणारा जोराचा पाऊस याचा सोयाबीनच्या उगवणशक्तीवर परिणाम होतो. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात प्रयोगशाळेत उगवणशक्ती तपासल्यानंतर शासनाच्या बीज प्रमाणीकरण यंत्रणेद्वारे प्रमाणित बियाणे उपरोल्लेखीत घटक अनुकूल नसल्यास उगवले नाही तर जबाबदार कोण? त्यामुळे बियाणे गुणनियंत्रण विभागाने शेतकऱ्यांमध्ये यासंबंधी जागरुकता निर्माण करणे आवश्यक असल्याचे कृषी साहित्य विक्रेता संघाचे जिल्हाध्यक्ष विलास इंगोले यांनी कळविले आहे.