शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

अचलपूर बाजार समितीत सोयाबीन बेभाव

By admin | Updated: October 24, 2016 00:14 IST

जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याला अस्मानी व सुल्तानी संकटाचा भार सोसवत नसल्यामुळे त्याला आत्महत्येचा मार्ग स्वीकारावा लागत आहे.

क्विंटलमागे ३०० ग्रॅमची कट्टी : व्यापारी-अडत्यांची मनमानी, शेतकऱ्यांची कोंडीपरतवाडा : जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याला अस्मानी व सुल्तानी संकटाचा भार सोसवत नसल्यामुळे त्याला आत्महत्येचा मार्ग स्वीकारावा लागत आहे. मात्र अचलपूर बाजार समितीत अडत्या-व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभाराने सोयाबीन पडत्या भावाने खरेदी केले जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केल्या जात आहे. दिवाळी सण पाहता मोठ्या प्रमाणात अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज हजारो क्विंटल सोयाबीन येत आहे. अशातच स्थानीय व्यापारी-अडत्यांनी थोड्या ओलसर असलेल्या सोयाबीनच्या प्रति क्वंटलमागे तीनशे ग्रॅम कट्टी कापायला सुरुवात केल्याने कमी दर आणि त्यातही वजनाची कट्टी होत असल्याने शेतकऱ्यांची लुबाडणूक होत असल्याचे चित्र आहे. ही कट्टी बाजार समितीच्या कुठल्याच नियमात बसत नसताना दिवसाढवळ्या शेतकऱ्यांची सुरू असलेली लुबाडणूक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान पोहोचवणारी ठरली आहे. दुसरीकडे बाजार समितीच्या कुठल्याच संचालकाने याविरुद्ध आवाज न उठविणे यावरही शेतकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.बेभाव सोयाबीनजिल्ह्यातील मोठ्या बाजार समितीत गणना होणाऱ्या अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गोरगरीब शेतकऱ्यांचा शेतमाल मातीमोल भावाने खरेदी केल्या जात आहे. शेतमालाचे दर ठरविण्याची पद्धत शासकीयदृष्ट्या नियमबाह्य असून सोळाशे ते दोन हजार ७०० रूपये दरापर्यंत दाताने दाबून प्रतवारी ठरवून सोयाबीन खरेदी केले जात असल्याचे चित्र आहे. (तालुका प्रतिनिधी)कट्टीत गेले १३ किलो सोयाबीनखरेदीदार व्यापाऱ्यांच्या मनमौजी कारभाराचा फटका सवर शेतकऱ्यांना बसत आहे. सोयाबीन ओलसर असल्याची बतावणी करीत प्रतिक्विंटल मागे तीनशे ग्रॅमची कट्टी कापल्याच्या कारणावरून व्यापारी, अडते आणि शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद उफाळून येत आहेत. कुष्ठा येथील शेतकरी अविनाश चौधरी यांनी शुक्रवारी बाजार समितीमध्ये ४५ क्विंटल सोयाबीन आणले होते. अशोककुमार जैन यांच्या अडतीवर हे सोयाबीन विकण्यात आले. त्या सोयाबीनमध्ये प्रतिक्विंटल ३०० ग्रॅम कट्टी कापल्याने चौधरी यांचे १३ किलो सोयाबीन अतिरिक्त गेले. याच पद्धतीने गोरगरीब शेतकऱ्यांची लुबाडणूक होत असल्याचे चित्र आहे.दाताने दाबून ठरते प्रतवारीअचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या शेतमाल खरेदीची अद्यावत अशी यंत्रणा नाही. परिणामी कुठल्याच परीभाषेत व नियमबाह्य असलेली पद्धत सर्रासपणे सुरू आहे. सोयाबीनचा दाणा दाताखाली दाबून नंतर खरेदीदार प्रतवारी ठरवत असल्याचे चित्र आहे. यातच दिलेल्या दराप्रमाणे शेतकऱ्याला मिळेल त्या भावाने सोयाबीन द्यावे लागत आहे.