शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनचे अनुदान : ८ हजार शेतकऱ्यांना १२ कोटींची मदत केव्हा? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 20:32 IST

गतवर्षी बाजार समित्यांमध्ये आॅक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत हमीपेक्षा कमी दराने विकल्या गेलेल्या सोयाबीनसाठी शासनाने प्रतीक्विंटल २०० रूपये दराने २५ क्विंटलप्रमाणे मदत देण्याचा निर्णय घेतला. या मदतीसाठी पात्र जिल्ह्यातील ३८ हजार शेतकऱ्यांचे १२ कोटी १६ लाखांचे अनुदान अद्याप देण्यात आलेले नाही.

अमरावती : गतवर्षी बाजार समित्यांमध्ये आॅक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत हमीपेक्षा कमी दराने विकल्या गेलेल्या सोयाबीनसाठी शासनाने प्रतीक्विंटल २०० रूपये दराने २५ क्विंटलप्रमाणे मदत देण्याचा निर्णय घेतला. या मदतीसाठी पात्र जिल्ह्यातील ३८ हजार शेतकऱ्यांचे १२ कोटी १६ लाखांचे अनुदान अद्याप देण्यात आलेले नाही. शेतकरी आर्थिक संकटात असल्याने शासनाने तातडीने अनुदान उपलब्ध करावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.सोयाबीनची मदत मिळविण्यासाठी जिल्ह्यातून साधारणपणे ४५ हजार प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे बाजार समित्यांव्दारा सादर करण्यात आले. या प्रस्तावांची तालुकास्तरीय समितीव्दारा पडताळणी करण्यात आली. जिल्ह्यात अमरावती व धामणगाव बाजार समितीमध्ये प्रस्तावांची संख्या अधिक असल्यामुळे पडताळणी रखडली होती. मात्र, आता जिल्हा उपनिबंधकांनी प्रस्तावाला मंजुरी देऊन पणन् संचालकांकडे अनुदानाची मागणी नोंदविण्यात आली आहे. शासनाने कांद्याचे अनुदान मागील आठवड्यात दिल्याने या आठवड्यात सोयाबीनचे अनुदान मिळेल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र शासनाला या अनुदानाचा विसर पडला आहे. असे आहे तालुकानिहाय प्रलंबित अनुदानअमरावती तालुक्यात २३,१५८ शेतकऱ्यांचे सात कोटी ६५ लाख, नांदगाव २,४५४ शेतकऱ्यांचे ६३ लाख ५५ हजार, चांदूररेल्वे १,३०३ शेतकऱ्यांचे ३२ लाख २० हजार, धामणगाव ३,३०३ शेतकऱ्यांचे एक कोटी दोन लाख, तिवसा २७३ शेतकऱ्यांचे सहा लाख ७६ हजार, चांदूरबाजार १,६७० शेतकऱ्यांचे ४५ लाख ४७ हजार, मोर्शी १,२४५ शेतकºयांचे २८ लाख ४९ हजार, वरूड ३७ शेतकऱ्यांचे ४० लाख २१ हजार, अंजनगाव सुर्जी १,७६५ शेतकऱ्यांचे ५० लाख १४ हजार, अचलपूर १,६४८ शेतकऱ्यांचे ५५ लाख ९८ हजार धारणी ५६३ शेतकऱ्यांचे २४ लाख ९२ हजार रूपयांचे अनुदान प्रलंबित आहे. रोशनखेडयातील  त्या शेतकऱ्यांनाही अनुदानवरूड तालुक्यातील रोशनखेड्यातील शेतकरी कृषी बाजार संस्थेला पणन अनुज्ञप्ती प्राप्त आहे. या केंद्रावर आॅक्टोबर ते डिसेंबर २०१६ या कालावधीत हमीपेक्षा कमी भावाने सोयाबीन विकले गेल्यामुळे त्या शेतकऱ्यांनादेखील प्रतिक्विंटल २०० रूपयेप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय शासनाने मंगळवार ८ आॅगस्ट रोजी घेतला आहे.