शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
3
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
4
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
5
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
6
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
7
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
8
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
9
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
10
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
11
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
12
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
13
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
14
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
15
Maharashtra HSC Result 2025: बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
16
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
17
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
18
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
19
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
20
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू

आर्द्राच्या उंदरावर पेरणीची मदार

By admin | Updated: June 22, 2016 00:16 IST

कोकणानंतर थेट विदर्भात पावसाने हजेरी लावली असली तरी पेरणीयोग्य पाऊस जिल्ह्यात कुठेही झालेला नाही.

पेरणी प्रारंभ : सर्वच तालुक्यांत तुरळक पाऊससचिन सुंदरकर अमरावतीकोकणानंतर थेट विदर्भात पावसाने हजेरी लावली असली तरी पेरणीयोग्य पाऊस जिल्ह्यात कुठेही झालेला नाही. मृग नक्षत्र संपला असून मंगळवारपासून आर्द्रान क्षत्राला प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी पहिल्या पावसावर पेरणीला प्रारंभ झाला आहे. आतापर्यंत पाच टक्केपेक्षाही कमी पेरणी झाली आहे. जिल्ह्यात पेरणीचे एकूण क्षेत्रफळ ७ लाख १४ हजार ९५० हेक्टरमध्ये राहणार असल्याचा अंदाज कृषी खात्याने वर्तविला आहे.विदर्भात सरासरी ७ जूननंतर मान्सूनचे आगमण होते. परंतु यंदा मान्सून लांबल्याने पेरणीला सुरुवात झाली नाही. मान्सूनच्या दमदार पावसाची प्रतीक्षा बळीराजाला लागली आहे. अमरावती जिल्ह्यातील चौदा तालुक्यांत अद्यापही पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. मात्र तुरळक पावसाच्या सरीवर थोडीफार पेरणी केल्या गेली. अद्यापही वातावरणात उकाडा कायम आहे. पावसाचे वातावरण निर्माण झाल्याने काही ठिकाणी धूळपेरणीला सुरुवात झाली आहे. अमरावती तालुक्यात सोयाबीनचा पेरा ३२ हजार हेक्टर क्षेत्रात राहणार असून कपाशी १०,०००, तूर ११०००, मूग ३००, ज्वारी ५००, उडदाचे क्षेत्रफळ ४०० हेक्टर राहणार आहे. भातकुली तालुक्यात २८ हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीन, कपाशी ७ हजार हेक्टर, तूर १० हजार हेक्टर, मूग २ हजार हेक्टर, ज्वारी ५००, उडदाचा पेरा ५०० हेक्टर क्षेत्रात राहणार आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ३५ हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीन, ८ हजार हेक्टरमध्ये कपाशी, १२ हजार हेक्टरमध्ये तूर, १ हजार हेक्टरमध्ये मूग, १ हजार हेक्टरमध्ये उडदाची पेरणी होण्याची शक्यता कृषी विभागाद्वारे वर्तनीली गेली आहे. तिवसा तालुक्यात २३ हजार हेक्टरमध्ये सोयाबीन, १३ हजार हेक्टरमध्ये कपाशी, ६५०० हेक्टर क्षेत्रात तूर, २०० हेक्टरमध्ये मूग, ५०० हेक्टरमध्ये ज्वारीचा पेरा राहणार आहे. चांदूररेल्वे तालुक्यात २२ हजार हेक्टरमध्ये सोयाबीन, ११ हजार हेक्टरमध्ये कपाशी, ८ हजार हेक्टरमध्ये तूर, २०० हेक्टरमध्ये मूग, ५०० हेक्टरमध्ये ज्वारी, ८०० हेक्टरमध्ये उडदाचा पेरा होण्याचे प्रस्तावित आहे. तालुक्यात दोन टक्के पेरणी झाली. मृग नक्षत्रात पाऊस येऊन तीन वर्षांत प्रथमच पेरणीला सुरुवात झाली. धामणगाव, मोर्शी, वरुड, चांदूरबाजार, अचलपूर, अंजनगाव, दर्यापूर, धारणी, चिखलदरा तालुक्यात सोयाबीन, कपाशी आणि तुरीचा पेरा यंदा अधिक होण्याची शक्यता आहे. यंदाच्या खरीप हंगामात दमदार पाऊस कोसळल्यास याचा फायदा इतर पिकांसह संत्रा पिकाला होणार आहे. वरुड,मोर्शी, शेंदूरजनाघाट परिसरात संत्रा, मोसंबी व लिंबाच्या कलम खरेदीसाठी शेतकऱ्यांनी धाव घेतली आहे.