शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
5
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
6
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
7
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
8
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
9
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
10
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
11
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
12
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
13
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
14
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
15
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
16
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
17
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
18
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
19
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
20
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा

आर्द्राच्या उंदरावर पेरणीची मदार

By admin | Updated: June 22, 2016 00:16 IST

कोकणानंतर थेट विदर्भात पावसाने हजेरी लावली असली तरी पेरणीयोग्य पाऊस जिल्ह्यात कुठेही झालेला नाही.

पेरणी प्रारंभ : सर्वच तालुक्यांत तुरळक पाऊससचिन सुंदरकर अमरावतीकोकणानंतर थेट विदर्भात पावसाने हजेरी लावली असली तरी पेरणीयोग्य पाऊस जिल्ह्यात कुठेही झालेला नाही. मृग नक्षत्र संपला असून मंगळवारपासून आर्द्रान क्षत्राला प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी पहिल्या पावसावर पेरणीला प्रारंभ झाला आहे. आतापर्यंत पाच टक्केपेक्षाही कमी पेरणी झाली आहे. जिल्ह्यात पेरणीचे एकूण क्षेत्रफळ ७ लाख १४ हजार ९५० हेक्टरमध्ये राहणार असल्याचा अंदाज कृषी खात्याने वर्तविला आहे.विदर्भात सरासरी ७ जूननंतर मान्सूनचे आगमण होते. परंतु यंदा मान्सून लांबल्याने पेरणीला सुरुवात झाली नाही. मान्सूनच्या दमदार पावसाची प्रतीक्षा बळीराजाला लागली आहे. अमरावती जिल्ह्यातील चौदा तालुक्यांत अद्यापही पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. मात्र तुरळक पावसाच्या सरीवर थोडीफार पेरणी केल्या गेली. अद्यापही वातावरणात उकाडा कायम आहे. पावसाचे वातावरण निर्माण झाल्याने काही ठिकाणी धूळपेरणीला सुरुवात झाली आहे. अमरावती तालुक्यात सोयाबीनचा पेरा ३२ हजार हेक्टर क्षेत्रात राहणार असून कपाशी १०,०००, तूर ११०००, मूग ३००, ज्वारी ५००, उडदाचे क्षेत्रफळ ४०० हेक्टर राहणार आहे. भातकुली तालुक्यात २८ हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीन, कपाशी ७ हजार हेक्टर, तूर १० हजार हेक्टर, मूग २ हजार हेक्टर, ज्वारी ५००, उडदाचा पेरा ५०० हेक्टर क्षेत्रात राहणार आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ३५ हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीन, ८ हजार हेक्टरमध्ये कपाशी, १२ हजार हेक्टरमध्ये तूर, १ हजार हेक्टरमध्ये मूग, १ हजार हेक्टरमध्ये उडदाची पेरणी होण्याची शक्यता कृषी विभागाद्वारे वर्तनीली गेली आहे. तिवसा तालुक्यात २३ हजार हेक्टरमध्ये सोयाबीन, १३ हजार हेक्टरमध्ये कपाशी, ६५०० हेक्टर क्षेत्रात तूर, २०० हेक्टरमध्ये मूग, ५०० हेक्टरमध्ये ज्वारीचा पेरा राहणार आहे. चांदूररेल्वे तालुक्यात २२ हजार हेक्टरमध्ये सोयाबीन, ११ हजार हेक्टरमध्ये कपाशी, ८ हजार हेक्टरमध्ये तूर, २०० हेक्टरमध्ये मूग, ५०० हेक्टरमध्ये ज्वारी, ८०० हेक्टरमध्ये उडदाचा पेरा होण्याचे प्रस्तावित आहे. तालुक्यात दोन टक्के पेरणी झाली. मृग नक्षत्रात पाऊस येऊन तीन वर्षांत प्रथमच पेरणीला सुरुवात झाली. धामणगाव, मोर्शी, वरुड, चांदूरबाजार, अचलपूर, अंजनगाव, दर्यापूर, धारणी, चिखलदरा तालुक्यात सोयाबीन, कपाशी आणि तुरीचा पेरा यंदा अधिक होण्याची शक्यता आहे. यंदाच्या खरीप हंगामात दमदार पाऊस कोसळल्यास याचा फायदा इतर पिकांसह संत्रा पिकाला होणार आहे. वरुड,मोर्शी, शेंदूरजनाघाट परिसरात संत्रा, मोसंबी व लिंबाच्या कलम खरेदीसाठी शेतकऱ्यांनी धाव घेतली आहे.