शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

१.७९ लाख हेक्टरवरील पेरण्यांचा पावसाअभावी खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:14 IST

अमरावती : जिल्ह्यात १० दिवसांपासून पावसाची ओढ असल्याने जिल्ह्यात १,७८,५१५ हेक्टरमधील पेरण्या खोळंबल्या आहेत. सद्यस्थितीत ५,२०,२८१ हेक्टरमधील पेरणी आटोपली ...

अमरावती : जिल्ह्यात १० दिवसांपासून पावसाची ओढ असल्याने जिल्ह्यात १,७८,५१५ हेक्टरमधील पेरण्या खोळंबल्या आहेत. सद्यस्थितीत ५,२०,२८१ हेक्टरमधील पेरणी आटोपली आहे. ही टक्केवारी ७४.४५ आहे. सोमवारपासून पुनर्वसु नक्षत्राला सुरुवात झाली आहे. या नक्षत्रामधील पावसाला ‘तरणा’चा पाऊस म्हणतात व वाहन उंदीर आहे. यावर आता शेतकऱ्यांची मदार आहे.

पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या असल्या तरी ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, त्या उलटण्याची भीती निर्माण झालेली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २१७ मिमी पाऊस झाला आहे. मात्र, नियमित व सार्वत्रिक पाऊस झालेला नाही. जून महिन्यात वेळेआधी १० जूनला मान्सूनचे आगमन झालेले असले तरी फक्त दोनच दिवस सार्वत्रिक पावसाची नोंद झाली. पाऊस हा विखुरलेल्या स्वरूपात झाला. त्यामुळे त्या भागातील पेरण्या झाल्या असल्या तरी पावसााभावी कोवळी पिके माना टाकत आहेत व किडी त्यांचा फडशा पाडत असल्याचे चित्र शिवारात आहे.

कृषी विभागाच्या सोमवारचे अहवालानुसार, जिल्ह्यात धानाचे ४१८१ हेक्टर, ज्वारी ७९६२ हेक्टर, मका ९०९४ हेक्टर, तूर ९१,३८९ हेक्टर, मूग ९८९५ हेक्टर, उडीद ३,३९१ हेक्टर, सोयाबीन २,०८,२०८ हेक्टर व भुईमुगाची ३३१ हेक्टरमध्ये पेरणी झालेली आहे.

बॉक्स

तालुकानिहाय पेरणी झालेले क्षेत्र

सद्यस्थितीत धारणी ३१,५९३, चिखलदरा १२,११४, अमरावती ४५,७७४, भातकुली २९,९७९, नांदगाव खंडेश्वर ६१,१७३, चांदूर रेल्वे ३७,४८९, तिवसा ३५,८९३, मोर्शी ४३,०७३, वरूड ३७,८४७, दर्यापूर ४२,४५९, अंजनगाव ३७,३८२, अचलपूर २५,१५१, चांदूर बाजार ३०,१६९ व धामणगाव रेल्वे तालुक्यात ५०,७७३ हेक्टरमध्ये पेरणी झालेली आहे.