शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

सहा लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 01:20 IST

जिल्ह्यात सरासरीच्या ५० टक्के पाऊस असताना ९१ टक्के क्षेत्रात खरिपाची पेरणी झाल्याची कृषी विभागाची माहिती आहे. पावसाच्या खंडामुळे किमान १० टक्के क्षेत्रात दुबार पेरणीचे संकट ओढावल्याचे या विभागाने सांगितले.

ठळक मुद्देकृषी विभागाची माहिती : १० टक्के क्षेत्रात दुबार पेरणीला दुजोरा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात सरासरीच्या ५० टक्के पाऊस असताना ९१ टक्के क्षेत्रात खरिपाची पेरणी झाल्याची कृषी विभागाची माहिती आहे. पावसाच्या खंडामुळे किमान १० टक्के क्षेत्रात दुबार पेरणीचे संकट ओढावल्याचे या विभागाने सांगितले. आणखी दोन दिवस पावसाच्या स्थितीत सुधार नसल्याने दुबार पेरणीचे क्षेत्र वाढणार असल्याचे वास्तव आहे.यंदा खरीप हंगामाचे सुरूवातीपासूनच पावसाचे प्रमाण कमी आहे. २४ जून रोजी मान्सून सुरू झाल्यानंतर आठ दिवसांचा खंड, २ जुलै रोजी पुनरागमन केल्यानंतर ४ पासून आतापर्यंत खंड आहे. दरम्यान केवळ दोन दिवस हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. आता २५ जुलैनंतर हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३६० मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात १८६ मिमी पाऊस पडला. ही ५१ टक्केवारी आहे. अपेक्षित सरासरीच्या निम्माही पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांवर अरिष्ट कोसळले आहे.यंदाच्या खरिपात सात लाख २८ हजार ११२ हेक्टर क्षेत्र सरासरी क्षेत्र आहे. त्यातुलनेत ६ लाख ६८ हजार ८८६ हेक्टरमध्ये सद्यस्थितीत पेरणी झालेली आहे. ही ९१ टक्केवारी आहे. अद्यापही ६० हजार हेक्टर क्षेत्र नापेर आहे. खरीप हंगामाचे दोन महिने संपत आले आहे. २५ जुलैैनंतर सोयाबीनची पेरणी करू नये, अशी कृषी विद्यापीठाची शिफारस आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत धान ५,६०३ हेक्टर, ज्वारी १३,०६५, बाजरी १, मका ८६३२, तूर १,०६,४९५, मूग १२,४२३, उडीद ५६३४, सोयाबीन २,४३,१९२, भुईमूग ५५२, तीळ ७८, सूर्यफूल निरंक, कपाशी २,६६,११६ व हळदीचे ३५४ हेक्टर क्षेत्रात पेरणी झालेली आहे.मान्सूनचा अक्ष त्याच्या स्थितीपासून दक्षिणेकडे सरकरण्याची शक्यता असल्याने मध्यभारतात २५ जुलैपासून पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. ३० जुलैपर्यंत मध्य भारतात हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे.- अनिल बंड, हवामानतज्ञविदर्भाचे नंदनवन पावसात माघारलेयंदाच्या खरिपात सद्यस्थितीत अपेक्षित सरासरीच्या निम्माच म्हणजेच ५१ टक्केच पाऊस आतापर्यंत झालेला आहे. यामध्ये अमरावती तालुक्यात ६६.५ टक्के, भातकुली ३४.३, नांदगाव खंडेश्वर ४४.२, चांदूर रेल्वे ६४.२, धामणगाव रेल्वे ५९.९, तिवसा ४१.९, मोर्शी ३९.९,वरूड ३२.४, अचलपूर ५८.४, चांदूरबाजार ५५.१, दर्यापूर ४२.२, अंजनगाव सुर्जी ४७.१, धारणी ७१.७ व विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा तालुक्यात ५७.७ टक्केच पाऊस झाला आहे, तर जिल्ह्यात आतापर्यंत झालेला पाऊस वार्षिक सरासरीच्या २२.८ टक्के इतकाच आहे.

टॅग्स :agricultureशेती