शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

सहा लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 01:20 IST

जिल्ह्यात सरासरीच्या ५० टक्के पाऊस असताना ९१ टक्के क्षेत्रात खरिपाची पेरणी झाल्याची कृषी विभागाची माहिती आहे. पावसाच्या खंडामुळे किमान १० टक्के क्षेत्रात दुबार पेरणीचे संकट ओढावल्याचे या विभागाने सांगितले.

ठळक मुद्देकृषी विभागाची माहिती : १० टक्के क्षेत्रात दुबार पेरणीला दुजोरा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात सरासरीच्या ५० टक्के पाऊस असताना ९१ टक्के क्षेत्रात खरिपाची पेरणी झाल्याची कृषी विभागाची माहिती आहे. पावसाच्या खंडामुळे किमान १० टक्के क्षेत्रात दुबार पेरणीचे संकट ओढावल्याचे या विभागाने सांगितले. आणखी दोन दिवस पावसाच्या स्थितीत सुधार नसल्याने दुबार पेरणीचे क्षेत्र वाढणार असल्याचे वास्तव आहे.यंदा खरीप हंगामाचे सुरूवातीपासूनच पावसाचे प्रमाण कमी आहे. २४ जून रोजी मान्सून सुरू झाल्यानंतर आठ दिवसांचा खंड, २ जुलै रोजी पुनरागमन केल्यानंतर ४ पासून आतापर्यंत खंड आहे. दरम्यान केवळ दोन दिवस हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. आता २५ जुलैनंतर हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३६० मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात १८६ मिमी पाऊस पडला. ही ५१ टक्केवारी आहे. अपेक्षित सरासरीच्या निम्माही पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांवर अरिष्ट कोसळले आहे.यंदाच्या खरिपात सात लाख २८ हजार ११२ हेक्टर क्षेत्र सरासरी क्षेत्र आहे. त्यातुलनेत ६ लाख ६८ हजार ८८६ हेक्टरमध्ये सद्यस्थितीत पेरणी झालेली आहे. ही ९१ टक्केवारी आहे. अद्यापही ६० हजार हेक्टर क्षेत्र नापेर आहे. खरीप हंगामाचे दोन महिने संपत आले आहे. २५ जुलैैनंतर सोयाबीनची पेरणी करू नये, अशी कृषी विद्यापीठाची शिफारस आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत धान ५,६०३ हेक्टर, ज्वारी १३,०६५, बाजरी १, मका ८६३२, तूर १,०६,४९५, मूग १२,४२३, उडीद ५६३४, सोयाबीन २,४३,१९२, भुईमूग ५५२, तीळ ७८, सूर्यफूल निरंक, कपाशी २,६६,११६ व हळदीचे ३५४ हेक्टर क्षेत्रात पेरणी झालेली आहे.मान्सूनचा अक्ष त्याच्या स्थितीपासून दक्षिणेकडे सरकरण्याची शक्यता असल्याने मध्यभारतात २५ जुलैपासून पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. ३० जुलैपर्यंत मध्य भारतात हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे.- अनिल बंड, हवामानतज्ञविदर्भाचे नंदनवन पावसात माघारलेयंदाच्या खरिपात सद्यस्थितीत अपेक्षित सरासरीच्या निम्माच म्हणजेच ५१ टक्केच पाऊस आतापर्यंत झालेला आहे. यामध्ये अमरावती तालुक्यात ६६.५ टक्के, भातकुली ३४.३, नांदगाव खंडेश्वर ४४.२, चांदूर रेल्वे ६४.२, धामणगाव रेल्वे ५९.९, तिवसा ४१.९, मोर्शी ३९.९,वरूड ३२.४, अचलपूर ५८.४, चांदूरबाजार ५५.१, दर्यापूर ४२.२, अंजनगाव सुर्जी ४७.१, धारणी ७१.७ व विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा तालुक्यात ५७.७ टक्केच पाऊस झाला आहे, तर जिल्ह्यात आतापर्यंत झालेला पाऊस वार्षिक सरासरीच्या २२.८ टक्के इतकाच आहे.

टॅग्स :agricultureशेती