शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

पेरणी ८० टक्के, कर्जवाटप मात्र २१ टक्केच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 22:43 IST

यंदा खरिपाची पेरणी या आठवड्यात शेवटाला जाणार आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ८० टक्के पेरणी आटोपली असताना पीक कर्जवाटप मात्र २१ टक्क््यांवर अडकले आहे. बँकांचे सहकार्य नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.

ठळक मुद्देबोंडअळी, तूर, हरभऱ्याचे अनुदानही नाही

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदा खरिपाची पेरणी या आठवड्यात शेवटाला जाणार आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ८० टक्के पेरणी आटोपली असताना पीक कर्जवाटप मात्र २१ टक्क््यांवर अडकले आहे. बँकांचे सहकार्य नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.यंदाच्या खरिपात रोहिणी, मृग नक्षत्र कोरडेच गेल्याने शेतकºयांना आर्द्राची कास धरावी लागली. पेरणीस उशीर होत असल्याने बँकांकडून दिलासा मिळेल, या आशेवर शेतकरी होते. अखेर त्यांना उसनवार करावी लागली. बँकांचा मात्र हंगामाचे सुरुवातीपासून नन्नाचा पाढा आहे. पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांनी बँकांच्या नाड्या आवळल्या. जिल्हाधिकाºयांनी त्यांच्या कार्यालयातील एसबीआयची पाच खाती बंद केली. याचा कोणताही असर बँकांच्या कर्जवाटपावर झालेला नाही. यंदाच्या हंगामात राष्ट्रीयीकृत बँकांच्या कर्जवाटपाचा टक्का वाढलाच नाही. जिल्हा बँकेने जून महिन्यात कर्जवाटप सुरू केले. आता मात्र त्यांच्याही कर्जवाटपाची गती मंदावली आहे. जिल्हाधिकारी आठवड्याला बँकांची आढावा बैठक घेत असतानाही कर्जवाटपाचा वेग वाढला नाही. एवढेच नव्हे तर जिल्हा बँकेवरदेखील सहकार विभागाचा अंकुश नसल्याचा आरोप होत आहे.गतवर्षी बोंडअळीच्या संकटाने धास्तावलेल्या शेतकºयांनी यंदा सोयाबीनला प्राधान्य दिले. महाबीजवर विश्वास दर्शविला. मात्र, यंदा महाबीज सोयाबीन बियाण्याची उगवणशक्ती कमी असल्याने काही भागांतील शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.वरूड, धामणगाव, चांदूररेल्वेत सर्वाधिक पेरणीयंदाच्या खरिपामध्ये जिल्ह्यात ७.२८ लाख हेक्टर सरासरी लागवडक्षेत्र असताना सद्यस्थितीत सहा लाख हेक्टरमध्ये पेरणी झालेली आहे. यामध्ये वरूड, धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे तालुक्यांमध्ये ८५ टक्के क्षेत्रात पेरणी आटोपली. दर्यापूर, अचलपूर, अंजनगाव सुर्जी तालुक्यात ६५ ते ७० टक्के पेरणी झालेली आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत २१३ मिमी पाऊस झाला. ही टक्केवारी ११७ आहे. जुलैच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने सरासरी ओलांडल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.अशी आहे कर्जवाटपाची सद्यस्थितीअलाहाबाद बँकेने २.८५ कोटी, आंध्रा बँक ७५ लाख, बँक आॅफ बडोदा १.७६ कोटी, बीओआय ६.७९ कोटी, बँक आॅफ महाराष्ट्र ३६.४०, कॅनरा बँक २.०५ कोटी, सेंट्रल बॅक ४० कोटी, आयसीआयसीआय ४.६७ कोटी, देणा ५.६३ कोटी, आयडीबीआय १.३७ कोटी, इंडियन बँक ४.५७ कोटी, पंजाब नॅशनल ४.११ कोटी, एसबीआय ५९.८० कोटी, युनियन बँक ४५.१६ कोटी, अ‍ॅक्सिस बँक २.३८ कोटी, एचडीएफसी ११.७२ कोटी, विदर्भ कोकण २.३० कोटी व जिल्हा बँकेने १०७.९५ कोटींचे कर्जवाटप केले आहे.जिल्ह्याची ५० पैशांच्या आत पैसेवारी असल्याने २०१७-१८ मधील पीक कर्जाचे पुनर्गठण करण्यात येत आहे. त्यामुळे पीक कर्जाची गती निश्चितच वाढणार आहे. याशिवाय नियमितपणे कर्ज मेळावे आदी उपक्रम गावागावांत राबविण्यात येत आहेत.- संदीप जाधव, जिल्हा उपनिबंधक