शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

पेरणी ८० टक्के, कर्जवाटप मात्र २१ टक्केच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 22:43 IST

यंदा खरिपाची पेरणी या आठवड्यात शेवटाला जाणार आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ८० टक्के पेरणी आटोपली असताना पीक कर्जवाटप मात्र २१ टक्क््यांवर अडकले आहे. बँकांचे सहकार्य नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.

ठळक मुद्देबोंडअळी, तूर, हरभऱ्याचे अनुदानही नाही

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदा खरिपाची पेरणी या आठवड्यात शेवटाला जाणार आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ८० टक्के पेरणी आटोपली असताना पीक कर्जवाटप मात्र २१ टक्क््यांवर अडकले आहे. बँकांचे सहकार्य नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.यंदाच्या खरिपात रोहिणी, मृग नक्षत्र कोरडेच गेल्याने शेतकºयांना आर्द्राची कास धरावी लागली. पेरणीस उशीर होत असल्याने बँकांकडून दिलासा मिळेल, या आशेवर शेतकरी होते. अखेर त्यांना उसनवार करावी लागली. बँकांचा मात्र हंगामाचे सुरुवातीपासून नन्नाचा पाढा आहे. पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांनी बँकांच्या नाड्या आवळल्या. जिल्हाधिकाºयांनी त्यांच्या कार्यालयातील एसबीआयची पाच खाती बंद केली. याचा कोणताही असर बँकांच्या कर्जवाटपावर झालेला नाही. यंदाच्या हंगामात राष्ट्रीयीकृत बँकांच्या कर्जवाटपाचा टक्का वाढलाच नाही. जिल्हा बँकेने जून महिन्यात कर्जवाटप सुरू केले. आता मात्र त्यांच्याही कर्जवाटपाची गती मंदावली आहे. जिल्हाधिकारी आठवड्याला बँकांची आढावा बैठक घेत असतानाही कर्जवाटपाचा वेग वाढला नाही. एवढेच नव्हे तर जिल्हा बँकेवरदेखील सहकार विभागाचा अंकुश नसल्याचा आरोप होत आहे.गतवर्षी बोंडअळीच्या संकटाने धास्तावलेल्या शेतकºयांनी यंदा सोयाबीनला प्राधान्य दिले. महाबीजवर विश्वास दर्शविला. मात्र, यंदा महाबीज सोयाबीन बियाण्याची उगवणशक्ती कमी असल्याने काही भागांतील शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.वरूड, धामणगाव, चांदूररेल्वेत सर्वाधिक पेरणीयंदाच्या खरिपामध्ये जिल्ह्यात ७.२८ लाख हेक्टर सरासरी लागवडक्षेत्र असताना सद्यस्थितीत सहा लाख हेक्टरमध्ये पेरणी झालेली आहे. यामध्ये वरूड, धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे तालुक्यांमध्ये ८५ टक्के क्षेत्रात पेरणी आटोपली. दर्यापूर, अचलपूर, अंजनगाव सुर्जी तालुक्यात ६५ ते ७० टक्के पेरणी झालेली आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत २१३ मिमी पाऊस झाला. ही टक्केवारी ११७ आहे. जुलैच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने सरासरी ओलांडल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.अशी आहे कर्जवाटपाची सद्यस्थितीअलाहाबाद बँकेने २.८५ कोटी, आंध्रा बँक ७५ लाख, बँक आॅफ बडोदा १.७६ कोटी, बीओआय ६.७९ कोटी, बँक आॅफ महाराष्ट्र ३६.४०, कॅनरा बँक २.०५ कोटी, सेंट्रल बॅक ४० कोटी, आयसीआयसीआय ४.६७ कोटी, देणा ५.६३ कोटी, आयडीबीआय १.३७ कोटी, इंडियन बँक ४.५७ कोटी, पंजाब नॅशनल ४.११ कोटी, एसबीआय ५९.८० कोटी, युनियन बँक ४५.१६ कोटी, अ‍ॅक्सिस बँक २.३८ कोटी, एचडीएफसी ११.७२ कोटी, विदर्भ कोकण २.३० कोटी व जिल्हा बँकेने १०७.९५ कोटींचे कर्जवाटप केले आहे.जिल्ह्याची ५० पैशांच्या आत पैसेवारी असल्याने २०१७-१८ मधील पीक कर्जाचे पुनर्गठण करण्यात येत आहे. त्यामुळे पीक कर्जाची गती निश्चितच वाढणार आहे. याशिवाय नियमितपणे कर्ज मेळावे आदी उपक्रम गावागावांत राबविण्यात येत आहेत.- संदीप जाधव, जिल्हा उपनिबंधक