शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

पेरणी ८० टक्के, कर्जवाटप मात्र २१ टक्केच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 22:43 IST

यंदा खरिपाची पेरणी या आठवड्यात शेवटाला जाणार आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ८० टक्के पेरणी आटोपली असताना पीक कर्जवाटप मात्र २१ टक्क््यांवर अडकले आहे. बँकांचे सहकार्य नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.

ठळक मुद्देबोंडअळी, तूर, हरभऱ्याचे अनुदानही नाही

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदा खरिपाची पेरणी या आठवड्यात शेवटाला जाणार आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ८० टक्के पेरणी आटोपली असताना पीक कर्जवाटप मात्र २१ टक्क््यांवर अडकले आहे. बँकांचे सहकार्य नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.यंदाच्या खरिपात रोहिणी, मृग नक्षत्र कोरडेच गेल्याने शेतकºयांना आर्द्राची कास धरावी लागली. पेरणीस उशीर होत असल्याने बँकांकडून दिलासा मिळेल, या आशेवर शेतकरी होते. अखेर त्यांना उसनवार करावी लागली. बँकांचा मात्र हंगामाचे सुरुवातीपासून नन्नाचा पाढा आहे. पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांनी बँकांच्या नाड्या आवळल्या. जिल्हाधिकाºयांनी त्यांच्या कार्यालयातील एसबीआयची पाच खाती बंद केली. याचा कोणताही असर बँकांच्या कर्जवाटपावर झालेला नाही. यंदाच्या हंगामात राष्ट्रीयीकृत बँकांच्या कर्जवाटपाचा टक्का वाढलाच नाही. जिल्हा बँकेने जून महिन्यात कर्जवाटप सुरू केले. आता मात्र त्यांच्याही कर्जवाटपाची गती मंदावली आहे. जिल्हाधिकारी आठवड्याला बँकांची आढावा बैठक घेत असतानाही कर्जवाटपाचा वेग वाढला नाही. एवढेच नव्हे तर जिल्हा बँकेवरदेखील सहकार विभागाचा अंकुश नसल्याचा आरोप होत आहे.गतवर्षी बोंडअळीच्या संकटाने धास्तावलेल्या शेतकºयांनी यंदा सोयाबीनला प्राधान्य दिले. महाबीजवर विश्वास दर्शविला. मात्र, यंदा महाबीज सोयाबीन बियाण्याची उगवणशक्ती कमी असल्याने काही भागांतील शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.वरूड, धामणगाव, चांदूररेल्वेत सर्वाधिक पेरणीयंदाच्या खरिपामध्ये जिल्ह्यात ७.२८ लाख हेक्टर सरासरी लागवडक्षेत्र असताना सद्यस्थितीत सहा लाख हेक्टरमध्ये पेरणी झालेली आहे. यामध्ये वरूड, धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे तालुक्यांमध्ये ८५ टक्के क्षेत्रात पेरणी आटोपली. दर्यापूर, अचलपूर, अंजनगाव सुर्जी तालुक्यात ६५ ते ७० टक्के पेरणी झालेली आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत २१३ मिमी पाऊस झाला. ही टक्केवारी ११७ आहे. जुलैच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने सरासरी ओलांडल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.अशी आहे कर्जवाटपाची सद्यस्थितीअलाहाबाद बँकेने २.८५ कोटी, आंध्रा बँक ७५ लाख, बँक आॅफ बडोदा १.७६ कोटी, बीओआय ६.७९ कोटी, बँक आॅफ महाराष्ट्र ३६.४०, कॅनरा बँक २.०५ कोटी, सेंट्रल बॅक ४० कोटी, आयसीआयसीआय ४.६७ कोटी, देणा ५.६३ कोटी, आयडीबीआय १.३७ कोटी, इंडियन बँक ४.५७ कोटी, पंजाब नॅशनल ४.११ कोटी, एसबीआय ५९.८० कोटी, युनियन बँक ४५.१६ कोटी, अ‍ॅक्सिस बँक २.३८ कोटी, एचडीएफसी ११.७२ कोटी, विदर्भ कोकण २.३० कोटी व जिल्हा बँकेने १०७.९५ कोटींचे कर्जवाटप केले आहे.जिल्ह्याची ५० पैशांच्या आत पैसेवारी असल्याने २०१७-१८ मधील पीक कर्जाचे पुनर्गठण करण्यात येत आहे. त्यामुळे पीक कर्जाची गती निश्चितच वाढणार आहे. याशिवाय नियमितपणे कर्ज मेळावे आदी उपक्रम गावागावांत राबविण्यात येत आहेत.- संदीप जाधव, जिल्हा उपनिबंधक