शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

कोट्यवधींच्या खर्चानंतरही पानगळ सुरूच

By admin | Updated: December 29, 2014 23:35 IST

मेळघाटात मागील आठ महिन्यांत एकूण ३६५ बालकांचे मृत्यू झाल्याचे भयावह वास्तव पुढे आले असून प्रशासनाने बालमृत्यू कमी झाल्याचा केलेला दावा पुन्हा फोल ठरला आहे.

चांदूरबाजार : मेळघाटात मागील आठ महिन्यांत एकूण ३६५ बालकांचे मृत्यू झाल्याचे भयावह वास्तव पुढे आले असून प्रशासनाने बालमृत्यू कमी झाल्याचा केलेला दावा पुन्हा फोल ठरला आहे. १९९६-९७ मध्ये धारणी तालुक्यात झालेल्या हिराबंबई येथील २१ बालमृत्यूमुळे कुपोषणाचा विक्राळ चेहरा सर्वप्रथम जगासमोर आला. तेव्हापासून वर्षाला ५०० ते ६०० बालमृत्यू याप्रमाणे येथे कोवळी पानगळ सुरूच राहिली आहे. यातील अनेक बालके जन्मास आल्यानंतर आपला पहिला वाढदिवस बघण्यासही जिवंत नसतात. हेच येथील मानवतेला लाजविणारे सत्य राहिले आहे. प्रशासनातर्फे येथील कुपोषण निर्मूलनासाठी वर्षाला कोट्यवधींचा खर्च केला जात असल्याने बालमृत्यू दर कमी झाल्याचा दावा आरोग्य विभागाकडून कितीही केला जात असला तरीही राज्यातील बालमृत्यूदरापेक्षा मेळघाटातील बालमृत्यूदर हा बराच अधिक असल्याचे चित्र आहे. राज्याचा दर ३६ हजार बालकामागे असताना मेळघाटात ४२ आहे. जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या अहवालानुसार २०१३-१४ मध्ये मेळघाटात ६ वर्षे वयापर्यंतच्या ६०० बालकांचे मृत्यू शाळेत मागील २०१२-१३ या वर्षातही आकडेवारी ४०९ इतकी होती. त्यामुळे येथील कोट्यवधीच्या खर्चासोबतच आरोग्य यंत्रणेच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.गरोदर मातांचे रुग्णालयामधील प्रसूतीचे प्रमाण वाढवावे, असे राष्ट्रीय मिशन आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडूनही मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य केले जाते. परंतु मेळघाटात हे मिशन अद्यापही प्रभावशाली झाल्याचे दिसून आलेले नाही. येथे कार्यरत असलेल्या विविध शासकीय योजनांवर आतापर्यंत कोट्यवधी रूपयांचा खर्च होऊनही परिस्थितीत का बदल होत नाही हा आता सार्वजनिक विषय बनला आहे. सन २०१३-१४ या वर्षात मेळघाटातील धारणी व चिखलदरा या दोन तालुक्यात अमरावती जिल्ह्यातील इतर १२ तालुक्यातील बालमृत्यूपेक्षा दुप्पट मृत्यू झालेले आहे.त्यातही कमी वजनामुळे होणाऱ्या बालमृत्यूचे प्रमाण हे सर्वाधिक आहे. न्युमोनिया व हायपोयर्मियामुळेही अनेक बालके मरण पावली आहेत. १९८ बालकांना घरीच आपले प्राण गमवावे लागले आहेत.राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य पोषण मिशनच्या अहवालानुसार मेळघाटात मध्यम आणि तीव्र कुपोषित बालकांची संख्या ही ४२ टक्क्यांपर्यंत आहे. गेल्या दोन वर्षांत हे प्रमाण ६ टक्क्यांनी वाढल्याचे निदर्शनास आले आहे. येथील आदिवासींचे रोजगारासाठी होत असलेले स्थानांतरण बघता त्यांच्या भागात रोजगार निर्मिती करण्यास प्रशासनास आलेले अपयशच म्हणावे लागेल. माता-पित्यांसह बालकेही कामाच्या ठिकाणी स्थलांतरित होत असल्याने लहान बाळांची आबाळ होते. आधीच प्रतिकारशक्ती कमी असलेली बालके आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्याने कुपोषणाच्या तीव्र श्रेणीत ढकलली जातात आणि प्राणास मुकतात.