शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

जागतिक शांतीसाठी संतसाहित्य नवसंजीवनी

By admin | Updated: January 12, 2016 00:12 IST

असहिष्णुतावाद आणि जागतिक दहशतवादावर संत साहित्य जालीम औषध ठरणार आहे.

संमेलनाचे सूप वाजले : पुढील आयोजन इंदूरमध्येअमरावती : असहिष्णुतावाद आणि जागतिक दहशतवादावर संत साहित्य जालीम औषध ठरणार आहे. देशातील विविध संतांनी जगाला प्रेरक ठरेल, अशी साहित्य निर्मिती केल्याने ते संतसाहित्य जागतिक शांतीसाठी नवसंजीवनी ठरणार असल्याचा सूर येथील सर्व संत साहित्य संमेलनातून निघाला. व्यापक प्रतिसाद लाभलेले पहिले अखिल भारतीय सर्व संत साहित्य संमेलनाचे आज सोमवारी सूप वाजले. येथील संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृहात ९ जानेवारीला संत साहित्य संमेलनाची सुरूवात झाली होती. देशाच्या विविध कानाकोपऱ्यातून आलेल्या संत साहित्याच्या गाढ्या अभ्यासकांनी संत साहित्याची गरज प्रतिपादीत केली.२०१६ चे संत साहित्य संमेलन इंदूर येथेपहिल्या अखिल भारतीय संत साहित्य संमेलनाचा सोमवारी तिसऱ्या दिवशी समारोप झाला. दुसरे संत साहित्य संमेलन जानेवारी २०१७ मध्ये इंदूरमध्ये होणार असल्याची घोषणा सोमवारी करण्यात आली. त्या आयोजनाची जबाबदारी बाबा महाराज तरोळकर, लिला मोरे (इंदूर), मुकुंद डोळे, सुभाष जाऊरकर, बबन मांडवकर यांच्याकडे असल्याची माहिती संमेलनात देण्यात आली. तत्पूर्वी आज सकाळी ‘संत साहित्य दर्शन’ या विषयावर परिसंवाद झाला. यात संत कबीर, महावीर, संत रविदास, सुफी संत, बाबा फरिदी, श्री बसवेश्वर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत नरसी मेहता आणि संत तुलसी यांचा जीवनप्रवास आणि साहित्यावर संजय धोटे, म्हैसुरचे सुयोग निधीजी, इंदूरच्या लीला मोरे, जुल्फी शेख, सुनंदा जामकर, रमेश खंडारे, श्रीकांत गोंधळेकर, ज्योती मंत्री सहभागी झाले. या मान्यवरांनी देशातील संत साहित्यातील बारकावे आणि त्यातील जीवनमूल्यांचे विवेचन केले.परिसंवादांना व्यापक प्रतिसादअमरावती : दुपारी १ च्या सुमारास अ. भा. महानुभाव साहित्य महामंडळाचे अध्यक्ष पुरुषोत्तम नागपुरे, देवळीचे सामाजिक कार्यकर्ते मोहन अग्रवाल आणि माजी प्राचार्य रमेश हुकूम यांचा सत्कार करण्यात आला. तर येथील अनुभूती पाटील यांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे वितरण करण्यात आले. सायंकाळी ६ च्या सुमारास संत कान्होपात्रा हे नाटक सादर करण्यात आले. ९ आणि १० जानेवारीला झालेल्या संत साहित्य संदर्भात वर्तमान जीवनात संत साहित्याचे औचित्य आणि संत साहित्यातून उलगडणारे स्त्रीमनाचे भावविख या तीनही परिसंवादाला व्यापक प्रेक्षकवर्ग लाभला. ९ जानेवारीला ग्रंथदिंडीने सुरू झालेल्या या तीन दिवसीय सर्व संत साहित्य संमेलनाचे सोमवारी नाटक सादर करुन सूप वाजले.