शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
5
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
6
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
7
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
8
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
9
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
10
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
11
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
12
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
13
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
14
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
15
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
16
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
17
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
18
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
19
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बांगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
20
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक शांतीसाठी संतसाहित्य नवसंजीवनी

By admin | Updated: January 12, 2016 00:12 IST

असहिष्णुतावाद आणि जागतिक दहशतवादावर संत साहित्य जालीम औषध ठरणार आहे.

संमेलनाचे सूप वाजले : पुढील आयोजन इंदूरमध्येअमरावती : असहिष्णुतावाद आणि जागतिक दहशतवादावर संत साहित्य जालीम औषध ठरणार आहे. देशातील विविध संतांनी जगाला प्रेरक ठरेल, अशी साहित्य निर्मिती केल्याने ते संतसाहित्य जागतिक शांतीसाठी नवसंजीवनी ठरणार असल्याचा सूर येथील सर्व संत साहित्य संमेलनातून निघाला. व्यापक प्रतिसाद लाभलेले पहिले अखिल भारतीय सर्व संत साहित्य संमेलनाचे आज सोमवारी सूप वाजले. येथील संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृहात ९ जानेवारीला संत साहित्य संमेलनाची सुरूवात झाली होती. देशाच्या विविध कानाकोपऱ्यातून आलेल्या संत साहित्याच्या गाढ्या अभ्यासकांनी संत साहित्याची गरज प्रतिपादीत केली.२०१६ चे संत साहित्य संमेलन इंदूर येथेपहिल्या अखिल भारतीय संत साहित्य संमेलनाचा सोमवारी तिसऱ्या दिवशी समारोप झाला. दुसरे संत साहित्य संमेलन जानेवारी २०१७ मध्ये इंदूरमध्ये होणार असल्याची घोषणा सोमवारी करण्यात आली. त्या आयोजनाची जबाबदारी बाबा महाराज तरोळकर, लिला मोरे (इंदूर), मुकुंद डोळे, सुभाष जाऊरकर, बबन मांडवकर यांच्याकडे असल्याची माहिती संमेलनात देण्यात आली. तत्पूर्वी आज सकाळी ‘संत साहित्य दर्शन’ या विषयावर परिसंवाद झाला. यात संत कबीर, महावीर, संत रविदास, सुफी संत, बाबा फरिदी, श्री बसवेश्वर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत नरसी मेहता आणि संत तुलसी यांचा जीवनप्रवास आणि साहित्यावर संजय धोटे, म्हैसुरचे सुयोग निधीजी, इंदूरच्या लीला मोरे, जुल्फी शेख, सुनंदा जामकर, रमेश खंडारे, श्रीकांत गोंधळेकर, ज्योती मंत्री सहभागी झाले. या मान्यवरांनी देशातील संत साहित्यातील बारकावे आणि त्यातील जीवनमूल्यांचे विवेचन केले.परिसंवादांना व्यापक प्रतिसादअमरावती : दुपारी १ च्या सुमारास अ. भा. महानुभाव साहित्य महामंडळाचे अध्यक्ष पुरुषोत्तम नागपुरे, देवळीचे सामाजिक कार्यकर्ते मोहन अग्रवाल आणि माजी प्राचार्य रमेश हुकूम यांचा सत्कार करण्यात आला. तर येथील अनुभूती पाटील यांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे वितरण करण्यात आले. सायंकाळी ६ च्या सुमारास संत कान्होपात्रा हे नाटक सादर करण्यात आले. ९ आणि १० जानेवारीला झालेल्या संत साहित्य संदर्भात वर्तमान जीवनात संत साहित्याचे औचित्य आणि संत साहित्यातून उलगडणारे स्त्रीमनाचे भावविख या तीनही परिसंवादाला व्यापक प्रेक्षकवर्ग लाभला. ९ जानेवारीला ग्रंथदिंडीने सुरू झालेल्या या तीन दिवसीय सर्व संत साहित्य संमेलनाचे सोमवारी नाटक सादर करुन सूप वाजले.