दुर्लक्ष : नगरसेविकेची परिवहन विभागाकडे तक्रार, कारवाईकडे लागलेय लक्षवरुड : स्थानिक नगरपरिषदेने सन २०१०-११ या वित्तीय वर्षात घनकचरा वाहून नेण्यासाठी पाच मालवाहू आॅटोरिक्षा खरेदी केले होते. तेव्हापासून या आॅटोरिक्षांची नोंदणी परिवहन विभागाकडे करण्यात आली नाही. शासकीय सेवेतील वाहनांची परिवहन अधिकाऱ्यांकडे नोंदणी नसताना ही वाहने गैरकायदेशीररीत्या रस्त्यावर धावत आहेत. मात्र, नगरपरिषदेचे याकडे दुर्लक्ष का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.खासगी वाहतूक करणारी वाहने नोंदणीकृत नसली, त्यांची कागदपत्रे आणि विमा नसला तरी पोलीस तसेच परिवहन विभागाचे अधिकारी त्यांच्यावर कारवाई करतात. मात्र, खुद्द नगरपरिषदेने सन २०१०-११ या वित्तीय वर्षात घनकचरा वाहून नेण्याकरिता पाच मालवाहू आॅटोरिक्षा खरेदी केल्यात. परंतु अद्याप परिवहन अधिकाऱ्यांकडे नोंदणी झालेली नाही. घनकचरा नेऊन टाकण्याकरिता या आॅटोरिक्षांचा वापर नियमित सुरु आहे. या वाहनांमुळे अपघात झाल्यास जबाबदार कोण, हा प्रश्न उपस्थित होत आहे. यापूर्वी या आॅटारिक्षाचे अपघातसुध्दा झाले. नगरसेविका प्रतिभा तिवारी यांनी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करुन वाहनांची नोंदणी करण्यास भाग पाडावे, आली आहे. (तालुका प्रतिनिधी)
पाच वर्षांपासून विनानोंदणी धावतेय घनकचऱ्याची आॅटोरिक्षा
By admin | Updated: May 30, 2015 00:36 IST