शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

मेळघाटात उपसा सिंचन योजनेला सौर ऊर्जेचे बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 23:21 IST

धारणी तालुक्यातील आदिवासीबहुल भागात नदी व बंधाऱ्यातून सोलर पंपाच्या माध्यमातून पाण्याचा उपसा करून ते पाणी उंच शेततळ्यात साठविण्यात येणार आहे. त्याचा आदिवासी शेतकऱ्यांना सिंचनासाठी लाभ होण्याच्यादृष्टीने हा प्रकल्प जलसंपदा विभागाच्यावतीने राबविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देराज्यात ठरणार मॉडेल : २५ हेक्टर शेती येणार सिंचनाखाली

संदीप मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : धारणी तालुक्यातील आदिवासीबहुल भागात नदी व बंधाऱ्यातून सोलर पंपाच्या माध्यमातून पाण्याचा उपसा करून ते पाणी उंच शेततळ्यात साठविण्यात येणार आहे. त्याचा आदिवासी शेतकऱ्यांना सिंचनासाठी लाभ होण्याच्यादृष्टीने हा प्रकल्प जलसंपदा विभागाच्यावतीने राबविण्यात येणार आहे. मेळघाटात राबविला जाणारा हा राज्यातील पहिलाच प्रयोग असावा. तो यशस्वी झाल्यास हा प्रकल्प राज्यभर राबविण्यात येणार आहे. तो मॉडेल म्हणून राबविला जाणार आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता रमेश ढवळे यांनी दिली.दिया गावात राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी शासनाने २१.९३ लाख रूपये मंजूर केले आहे. यातून आदिवासी बांधवांच्या २५ हेक्टरपर्यंत शेतीला यातून संरक्षित सिंचन मिळणार आहे. सदर योजनेचा लाभ हा दारिद्ररेषखालील येणाऱ्या कुटुंबास मिळणार आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांना मुबलक पाणी उपलब्ध झाल्यानंतर शेतकºयांना ३ पिके घेण्याची संधी मिळणार आहे. मेळघाटातील आदिवासी शेतकºयांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाने ही योजना मंजूर केली आहे. अमरावती मध्यम प्रकल्प विभागांतर्गत लघु पाटबंधारे उपविभाग धारणीअंतर्गत सदर कामे करण्यात येणार आहे. यासाठी दारिद्ररेषेखाली कुटुंबांचे सर्व्हे करून २५ हेक्टर सिंचनाकरिता शेतीला त्याचा उपयोग होणार असल्याची माहिती आहे. अतिदुर्गम भागातील आदिवासी व दारिद्ररेषेखालील शेतकरी या योजनेचे लाभार्थी राहील, अशी संकल्पना अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांनी सर्वप्रथम मांडली होती व पी. एल. बोंगिरवार यांनी या संदर्भात परिपत्रक तयार केले होते.रबी हंगामासाठी अदिवासींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या भागातील डोंगराळ व उतारपाट असल्याने शेतकºयांना शेती करणे कठीण जाते. वेळेत पाणी मिळत नसल्याने शेती पिके खराब होतात व या भागात पिण्याच्या पाण्याचीही टंचाई निर्माण होते. विशेषत: या ठिकाणी पाण्याचे मुबलक स्त्रोत कुठेही नसतात. त्यामुळे शेतीला पाणी मिळत नाही. पावसाळ्यातही येथील पाणी वाहून जाते. त्यामुळे या भागातील शेतकºयांना त्याचा फायदा होत नाही. या भागात नदीला वाहते पाणी असते. त्यामुळे ही योजना जलसंपदा विभागाच्यावतीने मॉडेल म्हणून धारणी तालुक्यात राबविण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे.दिया गावाला लाभधारणीपासूृन दिया हे गाव ४ किमीवर डोंगराळ भागात आहे. तेथून सिपना नदी वाहते. बाजूने धारणी ते बैरागड रस्ता असून धारणी तालुक्यातील २५ खेडी या रस्त्याने जोडण्यात आलेली आहे. सन १९९४ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग अचलपूरतर्फे सदर नदीवर पूल वजा बंधारा उभारण्यात आले होते. त्यामध्ये लोखंडी फळ्या टाकून पाणी अडविण्यात येते. गावालगत सन १९७३ मध्ये जलसंपदा विभागामार्फत उपसासिंचन योजनेअंतर्गत पाणी पुरवठ्याची विहीर बांधण्यात आली होती. तेथूनच विजेव्दारे पाणी उपसा करून शेतकºयांना सिंचनासाठी देण्यात येत होते. परंतु धारणीसारख्या अतिदुर्गम भागात विजेची शाश्वती नसल्यामुळे व शेतकºयांची आर्थिक स्थिी लक्षात घेता. शेतकरी देयकांचा भरणा करू शकले नाही. त्यामुळे विद्युत प्रवाह खंडित करण्यात आला. सदर उपसा सिंचन योजना बंद पडली. त्यामुळे शेतकरी सिंचनापासून वंचित राहिले. सोलरपंपाव्दारे पाण्याची योजना राबविण्यात येणार असल्याने या भागातील आदिवासी शेतकºयांना सिंचनाची व्यवस्था होणार आहे.२१ बाय २१ चे शेततळेराबविण्यात येणाऱ्या या नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत २१ बाय २१ मीटर या प्रकाराचे शेततळे शासकीय जमिनीवर खादून त्यामध्ये प्लास्टिक अंथरूण मातीत झाकून यामध्ये सौर ऊर्जेच्या पंपाव्दारे बंधाऱ्यामधील पाण्याचा उपसा केला जाईल. ते पाणी शेततळ्यात साठविण्यात येणार आहे. त्यानंतर गुरूत्वाकर्षणाच्या साह्याने पाईपलाऊनव्दारे शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी पोहोचविण्यात येणार आहे. सदर योजना ही प्रायोगिक तत्त्वावर त्राबविण्याचे नियोजन असून यापासून २५ हेक्टर शेती सिंचनाखाली येणार आहे. तसेच सदर योजनेवर पाणी संस्था व्यवस्थापन करून सदर हस्तांतरित करण्यात येईल. ही योजना यशस्वी झाल्यास संपूर्ण राज्यामध्ये मॉडल म्हणून राबविण्यात येणार आहे.ही अतिशय चांगली योजना आहे. यामुळे आदिवासीबहुल भागातील शेतकºयांच्या शेतीला सिंचनाची व्यवस्था होणार आहे. योजना यशस्वी झाल्यानंतर पुढे राज्यभर मॉडेल म्हणून राबविण्याचा शासनाचा मानस आहे.- रमेश ढवळे,अधीक्षक अभियंता, अमरावती