शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

सौर पथदिव्यांत गोलमाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 01:22 IST

जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत सन २०१३-१४ आणि २०१४-१५ मध्ये जिल्हाभरातील ग्रामपंचायत क्षेत्रातील दलितवस्त्यांमध्ये सौर पथदिवे लावण्यात आले होते. याबाबत माहिती देण्याची मागणी आरोग्य व वित्त समितीचे सभापती बळवंत वानखडे यांनी स्थायी समिती सभेत केली होती.

ठळक मुद्देजि.प.स्थायीत मुद्दा गाजला : सदस्यांनी विचारला जाब

ऑनलाईन लोकमतअमरावती : जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत सन २०१३-१४ आणि २०१४-१५ मध्ये जिल्हाभरातील ग्रामपंचायत क्षेत्रातील दलितवस्त्यांमध्ये सौर पथदिवे लावण्यात आले होते. याबाबत माहिती देण्याची मागणी आरोग्य व वित्त समितीचे सभापती बळवंत वानखडे यांनी स्थायी समिती सभेत केली होती. यावर १५ मार्च रोजी अनुपालन अहवालात दिलेली माहिती ही संभ्रम निर्माण करणारी असल्याने झेडपी सदस्य व पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले होते.जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा विविध विषयांना अनुसरून अध्यक्ष नितीन गोंडाणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. सभेला उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, सभापती जयंत देशमुख, बळवंत वानखडे, वनिता पाल, सुशीला कुकडे, सीईओ मनीषा खत्री, काँग्रेसचे गटनेता बबलू देशमुख, विरोधी पक्षनेता रवींद्र मुंदे, सदस्य महेंद्रसिंह गैलवार, बाळासाहेब हिंगणीकर, सुहासिनी ढेपे, सुनील डिके, प्रियंका दगडकर, अभिजित बोके, अतिरिक्त सीईओ विनय ठमके, कॅफो रवींद्र येवले, डेप्युटी सीईओ कैलास घोडके, प्रकल्प संचालक के.एम. अहमद व खातेप्रमुख उपस्थित होते.यावेळी मागील सभेत सर्व बीडीओंनी अमरावती : समाजकल्याण विभागाने सौरदिवे लावण्याबाबतची माहिती नसल्याचे सभागृहात सांगितले होते. त्यानुसार याप्रकरणी माहिती घेऊन त्याचा अहवाल आजच्या सभेत ठेवण्यात आला. मात्र, बीडीओ व समाजकल्याण विभाग तसेच पंचायत विभागाने अनुपालनात दिलेली सर्व माहिती ही गोलगोल असल्याने सदस्य संतापले. यामुळे सभागृहाचे वातावरण तापले होते. अखेर सीईओ मनीषा खत्री यांनी याबाबत चौकशी समिती नेमून पुढील सभेत यावर माहिती देण्याचे मान्य केले. त्यामुळे हा मुद्दा निवळला.चांदूर बाजार तालुक्यातील टाकरखेड पूर्णा येथील ग्रामसेवक उईके यांनी शासकीय निधीत घोळ केल्याबाबत बीडीओंकडे तक्रारीचे काय झाले, याचा जाब बबलू देशमुख यांनी विचारला. चांदूर बाजारचे बीडीओ विशाल शिंदे यांनी संबंधित ग्रामसेवकाला निलंबित केले आहे. त्यांच्याकडील पदभार हा अकोलकर नामक ग्रामसेवकाला सोपविला आहे. मात्र, त्यांना पदभार सोपविण्यास उईके हे टाळाटाळ करीत असल्याने त्यांना तीन कारणे दाखवा नोटीस बजावल्यात. त्यानंतर त्यांनी आता पदभार सोपविला आहे. यानुसार दस्तावेजाची तपासणी करून पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन सभागृहाला मिळाले. नांदगाव तालुक्यातील अडगाव व मांजरी म्हसला येथील सिंचन विहीर घोळप्रकरणी दोषींवर कोणती कारवाई केली, असा मुद्दा सुहासिनी ढेपे यांनी मांडला. यावर वसुली करण्याचे संबंधित लाभार्थींना बजावल्याची माहिती बीडीओ पल्लवी वाडेकर यांनी दिली. यासोबतच दोषींवर कारवाई केल्याचेसुद्धा त्यांनी सभागृहात सांगितले.ग्रामीण भागातील गोरगरिबांना शासनाच्या विविध घरकुल योजनांतून लाभ दिला जातो. मात्र, अनेकांना घरकुलाचा हप्ता मिळाला नाही. पंडित दीनदयाल योजनेतून जागा खरेदीसाठी अनुदान मिळत नाही, सोबतच लाभार्थींचे प्रवर्गसुद्धा बदलले आहेत आदी मुद्द्यांवर बळवंत वानखडे, बबलू देशमुख, रवींद्र मुंदे, बाळासाहेब हिंगणीकर, सुहासिनी ढेपे, सुनील डिके, महेंद्रसिंह गैलवार यांनी प्रश्नांचा भडिमार केला. यावर प्रकल्प संचालक के.एम. अहमद यांनी प्रशासनाची बाजू मांडली. घरकुलांचे काम योग्य व नियमानुसार चालू असल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले.