शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
3
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
4
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
5
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
6
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
7
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
8
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
9
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
10
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
11
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
12
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
13
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
14
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
15
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
16
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
17
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
18
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
19
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
20
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात

सौर पथदिव्यांत गोलमाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 01:22 IST

जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत सन २०१३-१४ आणि २०१४-१५ मध्ये जिल्हाभरातील ग्रामपंचायत क्षेत्रातील दलितवस्त्यांमध्ये सौर पथदिवे लावण्यात आले होते. याबाबत माहिती देण्याची मागणी आरोग्य व वित्त समितीचे सभापती बळवंत वानखडे यांनी स्थायी समिती सभेत केली होती.

ठळक मुद्देजि.प.स्थायीत मुद्दा गाजला : सदस्यांनी विचारला जाब

ऑनलाईन लोकमतअमरावती : जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत सन २०१३-१४ आणि २०१४-१५ मध्ये जिल्हाभरातील ग्रामपंचायत क्षेत्रातील दलितवस्त्यांमध्ये सौर पथदिवे लावण्यात आले होते. याबाबत माहिती देण्याची मागणी आरोग्य व वित्त समितीचे सभापती बळवंत वानखडे यांनी स्थायी समिती सभेत केली होती. यावर १५ मार्च रोजी अनुपालन अहवालात दिलेली माहिती ही संभ्रम निर्माण करणारी असल्याने झेडपी सदस्य व पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले होते.जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा विविध विषयांना अनुसरून अध्यक्ष नितीन गोंडाणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. सभेला उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, सभापती जयंत देशमुख, बळवंत वानखडे, वनिता पाल, सुशीला कुकडे, सीईओ मनीषा खत्री, काँग्रेसचे गटनेता बबलू देशमुख, विरोधी पक्षनेता रवींद्र मुंदे, सदस्य महेंद्रसिंह गैलवार, बाळासाहेब हिंगणीकर, सुहासिनी ढेपे, सुनील डिके, प्रियंका दगडकर, अभिजित बोके, अतिरिक्त सीईओ विनय ठमके, कॅफो रवींद्र येवले, डेप्युटी सीईओ कैलास घोडके, प्रकल्प संचालक के.एम. अहमद व खातेप्रमुख उपस्थित होते.यावेळी मागील सभेत सर्व बीडीओंनी अमरावती : समाजकल्याण विभागाने सौरदिवे लावण्याबाबतची माहिती नसल्याचे सभागृहात सांगितले होते. त्यानुसार याप्रकरणी माहिती घेऊन त्याचा अहवाल आजच्या सभेत ठेवण्यात आला. मात्र, बीडीओ व समाजकल्याण विभाग तसेच पंचायत विभागाने अनुपालनात दिलेली सर्व माहिती ही गोलगोल असल्याने सदस्य संतापले. यामुळे सभागृहाचे वातावरण तापले होते. अखेर सीईओ मनीषा खत्री यांनी याबाबत चौकशी समिती नेमून पुढील सभेत यावर माहिती देण्याचे मान्य केले. त्यामुळे हा मुद्दा निवळला.चांदूर बाजार तालुक्यातील टाकरखेड पूर्णा येथील ग्रामसेवक उईके यांनी शासकीय निधीत घोळ केल्याबाबत बीडीओंकडे तक्रारीचे काय झाले, याचा जाब बबलू देशमुख यांनी विचारला. चांदूर बाजारचे बीडीओ विशाल शिंदे यांनी संबंधित ग्रामसेवकाला निलंबित केले आहे. त्यांच्याकडील पदभार हा अकोलकर नामक ग्रामसेवकाला सोपविला आहे. मात्र, त्यांना पदभार सोपविण्यास उईके हे टाळाटाळ करीत असल्याने त्यांना तीन कारणे दाखवा नोटीस बजावल्यात. त्यानंतर त्यांनी आता पदभार सोपविला आहे. यानुसार दस्तावेजाची तपासणी करून पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन सभागृहाला मिळाले. नांदगाव तालुक्यातील अडगाव व मांजरी म्हसला येथील सिंचन विहीर घोळप्रकरणी दोषींवर कोणती कारवाई केली, असा मुद्दा सुहासिनी ढेपे यांनी मांडला. यावर वसुली करण्याचे संबंधित लाभार्थींना बजावल्याची माहिती बीडीओ पल्लवी वाडेकर यांनी दिली. यासोबतच दोषींवर कारवाई केल्याचेसुद्धा त्यांनी सभागृहात सांगितले.ग्रामीण भागातील गोरगरिबांना शासनाच्या विविध घरकुल योजनांतून लाभ दिला जातो. मात्र, अनेकांना घरकुलाचा हप्ता मिळाला नाही. पंडित दीनदयाल योजनेतून जागा खरेदीसाठी अनुदान मिळत नाही, सोबतच लाभार्थींचे प्रवर्गसुद्धा बदलले आहेत आदी मुद्द्यांवर बळवंत वानखडे, बबलू देशमुख, रवींद्र मुंदे, बाळासाहेब हिंगणीकर, सुहासिनी ढेपे, सुनील डिके, महेंद्रसिंह गैलवार यांनी प्रश्नांचा भडिमार केला. यावर प्रकल्प संचालक के.एम. अहमद यांनी प्रशासनाची बाजू मांडली. घरकुलांचे काम योग्य व नियमानुसार चालू असल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले.