शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
ईशनंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटंबाचा धक्कादायक खुलासा
3
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
4
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
5
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
6
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
7
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
8
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
9
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
10
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
11
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
12
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
13
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
14
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
15
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
16
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
17
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
18
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
19
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
20
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी जोपासले सामाजिक कर्तव्य

By admin | Updated: November 14, 2015 00:14 IST

भीक मागणे.. उष्टे खाणे.. उघड्यावर उदरनिर्वाह.. प्लास्टिक वेचणे... भंगार विकणे.. कसेबसे राहणे.. हे चित्र आहे शहरातील निराश्रित पारधी बांधवांचे.

अमरावती : भीक मागणे.. उष्टे खाणे.. उघड्यावर उदरनिर्वाह.. प्लास्टिक वेचणे... भंगार विकणे.. कसेबसे राहणे.. हे चित्र आहे शहरातील निराश्रित पारधी बांधवांचे. मात्र, पोलीस प्रशासनाने या निराश्रित पारधी बांधवांसमवेत शुक्रवारी भाऊबीज साजरी करून सामाजिक कर्तव्याचा परिचय करून दिला. नवीन कपडे, मिठाई व मिष्ठान्नाचे वाटप करून तुम्हीसुद्धा माणूस आहात, ही जाणीव निराश्रित पारधी बांधवांना पोलिसांनी करून दिली. एरव्ही शहरातील निराश्रित पारधी बांधव म्हटले की, किळसवाणे चित्र नजरेसमारे उभे राहते. दुसरीकडे शहरात दिवाळीत सर्वत्र झगमगाट, लखलखणारे प्रकाश दिवे, फटक्यांची आतषबाजी, नवीन कपडे परिधान करून ऐकमेकांना शुभेच्छा देतानाचे चित्र होते. पारधीबांधवांना भाऊबीज भेटअमरावती : मात्र शहरात उड्डाणपूल, रस्त्याच्या कडेला, उघड्यावरील निराश्रीत पारधी बांधव हे सगळे मूकपणे बघत होते. स्वातंत्र्यांच्या अनेक वर्षांनंतरही पारधी बांधवांना सामाजिक न्याय मिळू नये, ही बाब कोतवालीचे ठाणेदार दिलीप पाटील यांच्या मनाला स्पर्श करुन गेली. परिणामी ठाणेदार पाटील यांनी निराश्रीत पारधी बांधवासमेवत भाऊबीज साजरी करण्याचे नियोजन केले. पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर यांना हा उपक्रम साजरा करण्याबाबतची माहिती ठाणेदार दिलीप पाटीेल यांनी दिली. त्यानुसार सिटी कोतवालीत शुक्रवारी भाऊबीज साजरी करण्यात आली. यावेळी निराश्रीत १३५ पारधी बांधवांना नवीन कापड, मिठाई वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे, सहायक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील, गुन्हे शाखेचे निरिक्षक प्रमेश आत्राम, शहर कोतवालीचे ठाणेदार दिलीप पाटील, पप्पू गगलानी, सुरेश रतावा, बिलाल भाई, रश्मी नावंदर आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी निराश्रीत पारधी बांधवांना त्यांचे हक्क, अधिकाराची जाणीव करुन देताना भीक मागून येणारी पिढी बर्बाद करु नका, असे कळकळीचे आवाहन केले. पारधी समाज हा सुद्धा या देशातील प्रमुख घटक आहे. भारतीय राज्य घटनेने अधिकार प्रदान केले असून शिकून हे अधिकार काबीज करण्याचा सल्ला त्यांनी दिला. सन्मानाने रोजगार मिळवा, परंतु भीक मागू नका, व्यसनापासून दूर रहा, भंगार वेचणे बंद करा असे आवाहन घार्गे यांनी पारधी बांधवांना केले. पोलीस प्रशासनाने निराश्रीत पारधी बांधवांसमवेत भाऊबीज साजरी करण्याचा उद्देश म्हणजे या समाजाला मुख्य प्रवाहात आणणे होय, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)