शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात राेजगार हमी योजनेचे होणार सामाजिक अंकेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:18 IST

गणेश वासनिक अमरावती: राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे सामाजिक अंकेक्षण करण्यात येणार आहे. त्याकरिता १५ फेब्रुवारी ...

गणेश वासनिक

अमरावती: राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे सामाजिक अंकेक्षण करण्यात येणार आहे. त्याकरिता १५ फेब्रुवारी ते २३ मार्च २०२१ हा कालावधी निश्चित करण्यात आला असून, साामाजिक अंकेक्षणासाठी ग्राम, समूह साधन व्यक्ती नियुक्त करण्यात आले आहेत. कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर दक्षता बाळगून हे अंकेक्षण केले जाणार आहे.

सामाजिक अंकेक्षण सोसायटीचे कामकाज हे केंद्र सरकारच्या ग्राम विकास मंत्रालयातंर्ग़त चालते. केंद्रीय ग्राम विकास मंत्रालयाचे सहसचिव यांनी २९ मे २०२० रोजी राज्याच्या सामाजिक अंकेक्षण संचालकांच्या घेतलेल्या व्हिडीओ कॉन्फरसिंगमध्ये मनरेगा अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामाचे कार्योत्तर अंकेक्षण आणि समांतर सामाजिक अंकेक्षण कार्यक्रम हाती घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने १५ फेब्रुवारी ते २३ मार्च २०२१ या दरम्यान राज्यात १३ जिल्ह्यातील ३४ तालुक्यांमध्ये रोहयोचे सामाजिक अंकेक्षण करण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्हा साधन व्यक्तींने किमान ६० ग्राम पंचायतींच्या अंकेक्षणाचे टार्गेट सोपविण्यात आले आहे. या अंकेक्षण प्रक्रियेसाठी लागणारा खर्च तालुकानिहाय वितरित निधीतून करावा लागणार आहे. जिल्हा साधन व्यक्तींच्या नियंत्रणाखाली २० ग्राम साधन व्यक्ती व दोन समूह साधन व्यक्ती दैनंदिन मानधन तत्त्वावर नियुक्त करण्यात येणार आहेत. सन २०१९-२०२० या वर्षातील रोहयोच्या कामांचे सामाजिक अंकेक्षण करण्यात येणार असल्याचे सामाजिक अंकेक्षण उपसंचालक आशिष लोपीस यांनी स्पष्ट केले आहे.

००००००००००००००००००

एका ग्रामपंचायतीसाठी चार दिवसांचा कालावधी

रोहयोचे सामाजिक अंकेक्षण करण्यासाठी एका ग्रामपंचायतीकरिता चार दिवसांचा कालावधी लागेल. यात १०० टक्के जॉब कार्ड, पासबूक आणि १०० टक्के कामांच्या स्थळांची तपासणी, चार रजिस्टर, एमआयएसवरील माहितीची तुलनात्मक तपासणी करण्यात येईल. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी हा अहवाल ग्राम समिती अथवा सरपंच, ग्रामसेवक, दक्षता समितीपुढे कार्यवाहीसाठी सादर करावा लागणार आहे.

----------------------------

कामांचे छायाचित्र, वस्तुस्थिती असेल अहवालात

रोहयोचे सामाजिक अंकेक्षण करताना ज्या ठिकाणी कामे झाली असतील, त्या ठिकाणच्या कामांचे छायाचित्र, वस्तुस्थितीचा अहवाल जिल्हा साधन व्यक्तींना अहवालावातून नमूद करावा लागणार आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता, गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी लागणार आहे. रोहयोच्या कामांची वस्तुनिष्ठ माहिती द्यावी लागणार आहे.