शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

तर राजकीय नेत्यांच्या सभेचे भोंगेही बंद करा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2022 07:45 IST

Amravati News कुण्या एका धार्मिक स्थळावरील भोंगे बंद करत असाल, तर सर्वच भोंगे बंद केले पाहिजेत, जाहीर सभा घेणाऱ्या नेत्यांचे भोंगेही बंद करा, अशी आक्रमक भूमिका राज्यमंत्री तथा अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी घेतली आहे.

ठळक मुद्देभोंग्याच्या राजकारणावर कडाडून हल्ला

अमरावती : कुण्या एका धार्मिक स्थळावरील भोंगे बंद करत असाल, तर सर्वच भोंगे बंद केले पाहिजेत, जाहीर सभा घेणाऱ्या नेत्यांचे भोंगेही बंद करा, अशी आक्रमक भूमिका राज्यमंत्री तथा अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी घेतली आहे. भोंग्याच्या मुद्यावरून अचलपूर परतवाडा शहरात संचारबंदी लागू करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री कडू यांनी धार्मिक तेढ निर्माण करू पाहणाऱ्यांच्या भूमिकेवर कडाडून हल्ला केला.

             मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे हटवण्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. यानंतर राज्यात भोंग्याचा वाद चांगलाच पेटला आहे. त्यातच आता राज्यमंत्री बच्चू कडू यांनी भोंग्यावर मोठे विधान केले आहे. दोन वर्षे कोरोनामुळे सर्व मंदिरे, बौद्ध विहार,मशिदीमधील भोंगे बंद होते. त्यावेळी फक्त रुग्णवाहिकेचा भोंगा सुरू होता. देश सध्या कुठल्या परिस्थितीत जात आहे. ते सर्वांना ज्ञात आहे. त्यामुळे इतर मुद्दे बाजूला सारून जातीय तेढ निर्माण करणाऱ्या मुद्यांना हवा दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. भोंगे बंद करायचे असेल तर सर्वच भोंगे बंद केले पाहिजेत, अशी थेट भूमिका बच्चू कडूंनी घेतली. निवडणुकीत राजकीय लोकांचे भोंगे बंद करून भोंगा नावाचा शब्दच बंद करावा, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडू