शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

- तर दीड हजारावर गावात होऊ शकते शाळा सुरू?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:10 IST

ग्रामपंचायतींचा ठराव अनिवार्य : आठवी ते बारावीचे भरणार वर्ग, कोरोनामुक्त गावांना प्राधान्य अमरावती : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दीड वर्षांपासून शाळा ...

ग्रामपंचायतींचा ठराव अनिवार्य : आठवी ते बारावीचे भरणार वर्ग, कोरोनामुक्त गावांना प्राधान्य

अमरावती : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दीड वर्षांपासून शाळा महाविद्यालये बंद आहेत. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्याकरिता ऑनलाईन शिक्षण सुरू झाले आहे. यंदा नवीन शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली असली तरी अद्याप विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावलेली नाही. त्यामुळे ऑनलाईनवर शाळांचा डोलारा सुरू आहे. मात्र, कोरोनाचा संसर्ग आता आटोक्यात आल्यामुळे काही दिवसात इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू होऊ शकतात. यासाठी कोरोनामुक्त गावांना प्राधान्य राहील.

शाळा सुरू करण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींचा ठराव व गावस्तरावर गठित केलेल्या समितीची मंजुरी तसेच पालकांची सहमती मिळाल्यावर शाळा सुरू केली जाणार आहे. यासाठी गावस्तरावर सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली आहे. ग्रामसेवक हे समितीचे सदस्य सचिव आहेत. याशिवाय शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, तालुका आरोग्य अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापकांचा समावेश आहे. या समितीच्या माध्यमातून गावस्तरावर निर्णय घेऊन तसा प्रस्ताव जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर इयत्ता आठवी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू केले जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून तयारी सुरू आहे.

बॉक्स

जिल्ह्यातील एकूण शाळा -२८८५

जिल्हा परिषद शाळा -१५८३

अनुदानित -७३८

कायम विनाअनुदानित शाळा -३७१

जिल्ह्यातील एकूण गावे -१६८७

कोरोना मुक्त असलेली गावे -१५३६

बॉक्स

१५३६ शाळा आहेत सज्ज

नवीन शैक्षणिक सत्राला २८ जून पासून सुरुवात झाली. त्याच धर्तीवर सर्व शाळा सुरू करण्यासाठी सज्ज ठेवण्यात आल्या होत्या.

इयत्ता आठवी ते बारावी पर्यतचे वर्ग सुरू शासनाच्या निर्णयानुसार दिड हजारावर शाळा सज्ज आहेत.

शालेय परिसर वर्गखोल्यांची साफसफाई आणि रंगरंगोटी सुद्धा करून ठेवण्यात आली आहे.

कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजना सुद्धा करण्यात सूचना दिल्या आहेत.

बॉक्स

आतापर्यंत एकाही ग्रामपंचायतीचा ठराव नाही

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला आहे. विविध तालुक्यातील अनेक गावे कोरोनामुक्त झाली आहेत. त्यानुसार गत दीड वर्षापासून शाळा बंद असल्याने पालकांची सुद्धा चिंता वाढली आहे. त्यामुळे आता कोरोना मुक्त गावे झाल्यामुळे शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्ह्यातील आजघडीला एकाही ग्रामपंचायतीने शाळा सुरू करणेबाबतचा ठराव शिक्षण विभागाकडे सादर केलेला नाही.

बॉक्स

कोट

मुलांचे शैक्षणिक नुकसान पाहता शाळा सुरू करणे गरजेचे आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याने शासनाने घेतलेला निर्णय योग्य आहे. परंतु, मुलांच्या सुरक्षेबाबतही आवश्यक ती दक्षता घेणे तितकेच गरजेचे आहे.

- आशिष गावंडे, पालक

कोट

जिल्ह्यात आता कोरोचा संसर्ग आटोक्यात आला आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून आणि योग्य काळजी घेऊन शाळा सुरू करण्यास काहीच हरकत नाही. मुले घरच्या घरी राहून त्रस्त झाले आहेत. त्यामुळे शाळा सुरू झाल्यास पाल्यांना शाळेत पाठवा.

- हर्षिता कावरे,

पालक

कोट

शासनाने आठवी ते बारावीचे वर्ग ऑफलाइन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ग्रामपंचायत ठराव आणि पालकांची एनओसी आवश्यक आहे. यासाठी एक समितीदेखील तयार करण्यात आली आहे. समितीच्या माध्यमातून ठराव प्राप्त झाल्यानंतर शाळा सुरू करण्यात येतील. सोबत शिक्षकांचे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण शंभर टक्के होणे आवश्यक आहे.

- एजाज खान, शिक्षणाधिकारी प्राथमिक

बॉक्स

तालुकानिहाय कोरोनामुक्त गावांची संख्या

अमरावती - १२९

भातकुली - १२३

मोर्शी - १०१

वरूड - १०६

अंजनगाव सुर्जी - ८५

अचलपूर - ९४

चांदूर रेल्वे - ७९

चांदूर बाजार - १२७

चिखलदरा - १६५

धारणी - १५३

दयार्पूर - १०५

धामणगाव रेल्वे - ८२

तिवसा - ६६

नांदगाव खंडेश्वर - १२१