शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

क्षणार्धात झाला त्यांच्या स्वप्नांचा चुराडा

By admin | Updated: April 28, 2016 00:10 IST

आयुष्यात प्रत्येक जण पोटाची खळगी भरण्यासाठी धडपडतो. यातून काही बचत झाल्यास कुटुंबासाठी काहीतरी करतो.

तीन कुटुंब उघडयावर : वरुड तालुक्यातील सुरळी येथील घटनासंजय खासबागे वरूडआयुष्यात प्रत्येक जण पोटाची खळगी भरण्यासाठी धडपडतो. यातून काही बचत झाल्यास कुटुंबासाठी काहीतरी करतो. तळहातावरचे जिणे जगताना तालुक्यातील राऊत कुटुंबाने अत्यंत कष्टाने बकरीपालन केले. पुनर्वसन भागातील घरात आपला संसार थाटला. गुरुवारच्या बाजारात बकऱ्या विकून घरात काहीतरी नवीन घ्यावे म्हणून २० हजार रुपयांच्या बकऱ्या विकल्या. यातून धान्य विकत आणल्यास काही रोख रक्कम चरितार्थासाठी ठेवली. काही दिवसांनी कुटुंबाची परिस्थीती रुळावर आली होती. मात्र, नियतीला ते मान्य नव्हते. २२ एप्रिल रोजी दुपारी २.१५ वाजताच्या दरम्यान आग लागली. आगीत डोळयादेखत १५ बकरीची पिल्ले बेचिराख झाली. घरातील साहित्याची राखरांगोळी झाली अन् क्षणार्धात राऊत कुटुंबाच्या स्वप्नांचा चुराडा झाला. राऊत आणि पवार कुटुंबावर दु:खाचे सावट पसरले. शासन व सेवाभावी संस्थानी तात्पुरती मदत केली. मात्र, त्यांच्या निवाऱ्याचे काय? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.आयुष्य हे क्षणभंगूर असते. हे माहिती असतांना अनेकांना कुटुंबासाठी काही करण्याचा हव्यास असतो. मोलमजुरी करुन आपणही चांगले जीवन जगावे, असे प्रत्येकाला वाटते. कष्ट करुन बकरी पालन आणि मोलमजुरी केली. यातून बचत करुन बकऱ्या तयार झाल्या. घरात काही सुखसुविधा असाव्या म्हणून राऊत परिवाराने एक दिवसांपूर्वीच बकऱ्या विकून २० हजार रुपये मिळाले. काल २२ ला दुपारी सव्वा दोन वाजताच्या दरम्यान अचानक घराला आग लागली आगीने रौद्र रुप धारण केले. ही आग शेजारच्या रवींंद्र पवार आणि भागवत पवार यांच्या घरापर्यंत पोहचली. आगीत सर्वकाही संपले. विलास महादेव राऊत यांच्या मालकीचे १५ बकरीचे पिलांचा मृत्यू झाला. कालच विलास राउत यांनी राजुराबाजारात २० हजार रुपयांच्या बकऱ्या विकल्या. मिळालेल्या पैशातून धान्य खरेदी केले. तर पैसा जमवून राउत यांच्या पत्नीने सोन्याचे मंगळसूत्र तयार केले होते. ते सुध्दा आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने राऊत यांचा संसारच उघडयावर आला. या परिवाराला आता कोण सावरणार?, असा सवाल उपस्थित झाला आहे.