शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

क्षणार्धात झाला त्यांच्या स्वप्नांचा चुराडा

By admin | Updated: April 28, 2016 00:10 IST

आयुष्यात प्रत्येक जण पोटाची खळगी भरण्यासाठी धडपडतो. यातून काही बचत झाल्यास कुटुंबासाठी काहीतरी करतो.

तीन कुटुंब उघडयावर : वरुड तालुक्यातील सुरळी येथील घटनासंजय खासबागे वरूडआयुष्यात प्रत्येक जण पोटाची खळगी भरण्यासाठी धडपडतो. यातून काही बचत झाल्यास कुटुंबासाठी काहीतरी करतो. तळहातावरचे जिणे जगताना तालुक्यातील राऊत कुटुंबाने अत्यंत कष्टाने बकरीपालन केले. पुनर्वसन भागातील घरात आपला संसार थाटला. गुरुवारच्या बाजारात बकऱ्या विकून घरात काहीतरी नवीन घ्यावे म्हणून २० हजार रुपयांच्या बकऱ्या विकल्या. यातून धान्य विकत आणल्यास काही रोख रक्कम चरितार्थासाठी ठेवली. काही दिवसांनी कुटुंबाची परिस्थीती रुळावर आली होती. मात्र, नियतीला ते मान्य नव्हते. २२ एप्रिल रोजी दुपारी २.१५ वाजताच्या दरम्यान आग लागली. आगीत डोळयादेखत १५ बकरीची पिल्ले बेचिराख झाली. घरातील साहित्याची राखरांगोळी झाली अन् क्षणार्धात राऊत कुटुंबाच्या स्वप्नांचा चुराडा झाला. राऊत आणि पवार कुटुंबावर दु:खाचे सावट पसरले. शासन व सेवाभावी संस्थानी तात्पुरती मदत केली. मात्र, त्यांच्या निवाऱ्याचे काय? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.आयुष्य हे क्षणभंगूर असते. हे माहिती असतांना अनेकांना कुटुंबासाठी काही करण्याचा हव्यास असतो. मोलमजुरी करुन आपणही चांगले जीवन जगावे, असे प्रत्येकाला वाटते. कष्ट करुन बकरी पालन आणि मोलमजुरी केली. यातून बचत करुन बकऱ्या तयार झाल्या. घरात काही सुखसुविधा असाव्या म्हणून राऊत परिवाराने एक दिवसांपूर्वीच बकऱ्या विकून २० हजार रुपये मिळाले. काल २२ ला दुपारी सव्वा दोन वाजताच्या दरम्यान अचानक घराला आग लागली आगीने रौद्र रुप धारण केले. ही आग शेजारच्या रवींंद्र पवार आणि भागवत पवार यांच्या घरापर्यंत पोहचली. आगीत सर्वकाही संपले. विलास महादेव राऊत यांच्या मालकीचे १५ बकरीचे पिलांचा मृत्यू झाला. कालच विलास राउत यांनी राजुराबाजारात २० हजार रुपयांच्या बकऱ्या विकल्या. मिळालेल्या पैशातून धान्य खरेदी केले. तर पैसा जमवून राउत यांच्या पत्नीने सोन्याचे मंगळसूत्र तयार केले होते. ते सुध्दा आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने राऊत यांचा संसारच उघडयावर आला. या परिवाराला आता कोण सावरणार?, असा सवाल उपस्थित झाला आहे.