शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
3
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
4
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
5
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
6
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
7
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
8
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
9
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
10
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
11
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
12
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
13
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
14
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
15
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
16
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
17
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
18
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
19
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

क्षणार्धात झाला त्यांच्या स्वप्नांचा चुराडा

By admin | Updated: April 28, 2016 00:10 IST

आयुष्यात प्रत्येक जण पोटाची खळगी भरण्यासाठी धडपडतो. यातून काही बचत झाल्यास कुटुंबासाठी काहीतरी करतो.

तीन कुटुंब उघडयावर : वरुड तालुक्यातील सुरळी येथील घटनासंजय खासबागे वरूडआयुष्यात प्रत्येक जण पोटाची खळगी भरण्यासाठी धडपडतो. यातून काही बचत झाल्यास कुटुंबासाठी काहीतरी करतो. तळहातावरचे जिणे जगताना तालुक्यातील राऊत कुटुंबाने अत्यंत कष्टाने बकरीपालन केले. पुनर्वसन भागातील घरात आपला संसार थाटला. गुरुवारच्या बाजारात बकऱ्या विकून घरात काहीतरी नवीन घ्यावे म्हणून २० हजार रुपयांच्या बकऱ्या विकल्या. यातून धान्य विकत आणल्यास काही रोख रक्कम चरितार्थासाठी ठेवली. काही दिवसांनी कुटुंबाची परिस्थीती रुळावर आली होती. मात्र, नियतीला ते मान्य नव्हते. २२ एप्रिल रोजी दुपारी २.१५ वाजताच्या दरम्यान आग लागली. आगीत डोळयादेखत १५ बकरीची पिल्ले बेचिराख झाली. घरातील साहित्याची राखरांगोळी झाली अन् क्षणार्धात राऊत कुटुंबाच्या स्वप्नांचा चुराडा झाला. राऊत आणि पवार कुटुंबावर दु:खाचे सावट पसरले. शासन व सेवाभावी संस्थानी तात्पुरती मदत केली. मात्र, त्यांच्या निवाऱ्याचे काय? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.आयुष्य हे क्षणभंगूर असते. हे माहिती असतांना अनेकांना कुटुंबासाठी काही करण्याचा हव्यास असतो. मोलमजुरी करुन आपणही चांगले जीवन जगावे, असे प्रत्येकाला वाटते. कष्ट करुन बकरी पालन आणि मोलमजुरी केली. यातून बचत करुन बकऱ्या तयार झाल्या. घरात काही सुखसुविधा असाव्या म्हणून राऊत परिवाराने एक दिवसांपूर्वीच बकऱ्या विकून २० हजार रुपये मिळाले. काल २२ ला दुपारी सव्वा दोन वाजताच्या दरम्यान अचानक घराला आग लागली आगीने रौद्र रुप धारण केले. ही आग शेजारच्या रवींंद्र पवार आणि भागवत पवार यांच्या घरापर्यंत पोहचली. आगीत सर्वकाही संपले. विलास महादेव राऊत यांच्या मालकीचे १५ बकरीचे पिलांचा मृत्यू झाला. कालच विलास राउत यांनी राजुराबाजारात २० हजार रुपयांच्या बकऱ्या विकल्या. मिळालेल्या पैशातून धान्य खरेदी केले. तर पैसा जमवून राउत यांच्या पत्नीने सोन्याचे मंगळसूत्र तयार केले होते. ते सुध्दा आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने राऊत यांचा संसारच उघडयावर आला. या परिवाराला आता कोण सावरणार?, असा सवाल उपस्थित झाला आहे.