शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

लघु प्रकल्पात अत्यल्प जलसाठा, आठवड्यात १० दलघमीने घट

By admin | Updated: April 23, 2016 23:57 IST

जून ते सप्टेंबर १५ दरम्यान जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाल्याने त्याचा फटका जलप्रकल्पांना बसला आहे. तूर्तास जिल्ह्यातील ७५ लघु प्रकल्पात महिनाभर पुरेल इतका जलसाठा शिल्लक आहे.

प्रदीप भाकरे अमरावतीजून ते सप्टेंबर १५ दरम्यान जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाल्याने त्याचा फटका जलप्रकल्पांना बसला आहे. तूर्तास जिल्ह्यातील ७५ लघु प्रकल्पात महिनाभर पुरेल इतका जलसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील ७५ लघु प्रकल्पांची प्रकल्पीय जलक्षमता १६७.४६ दलघमी असताना २१ एप्रिल अखेर या प्रकल्पात केवळ ३०.८३ दलघमी (१८.४१ टक्के) जलसाठा शिल्लक आहे. दर आठवड्याला जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पातील जलसाठ्यात सरासरी ७ ते १० दशलक्ष घनमीटरची घसरण होत आहे. संपूर्ण जिल्हा दुष्काळात होरपळत असताना अनेक भागात पाणी टंचाईची धग जाणवत आहे. नदीनाले व विहिरी सुकू लागल्या आहेत. याशिवाय भूजल पातळीत कमालीची घसरण पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील मोठे, मध्यम व लघु प्रकल्पात २१ एप्रिलअखेर सरासरी २४४.५७ दलघमी (२७.३९ टक्के) जलसाठा शिल्लक आहे. २०१५ साली एप्रिल महिन्यात हाच जलसाठा ३५२.६५ दलघमी होता. तर २०१४ साली ३८६.४९ दलघमी असा उच्चांकी होता. मागील ७ दिवसात जिल्ह्यातील ८० प्रकल्पांमधील जलसाठ्यात सरासरी ११ दशलक्ष घनमीटरने घसरण झाली आहे. वाढत्या उष्म्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला असताना पेयजलाच्या मागणीत वाढ झाली आहे. जिल्ह्यातील ८० सिंचन प्रकल्पाची एकूण प्रकल्पीय क्षमता ८९२.७७ दलघमी असताना तुर्तास या प्रकल्पात २४४.५७ दलघमी पाणी शिल्लक आहे. मेळघाट भागात पाण्यासाठी हाहाकार माजला आहे. चिखलदऱ्यातील खडीमल, पाचडोंगरी, कोयलारी, मोथाखेडा, आवागड, तारूबांदा, कुलंगणा, भार्द्रा, ढोमणबढी, कालापाणी, पस्तलाई येथे टँकरने पेयजलाचा पुरवठा केला जात आहे. एप्रिलअखेर त्यात मोठी वाढ होणार आहे. याशिवाय वरुड व अन्य काही तालुक्यातील गावांमध्ये पेयजलाचे संकट उद्भवले आहे. (प्रतिनिधी)पूर्णा प्रकल्पात लघुत्तम साठाजिल्ह्यासाठी वरददायिनी ठरलेल्या अप्पर वर्धा प्रकल्पात २१ एप्रिलअखेर १४७.९१ दलघमी (२६.२२ टक्के) जलसाठा शिल्लक आहे. शहानूरमध्ये २१.१८ दलघमी (४६ टक्के), चंद्रभागा मध्यम प्रकल्पामध्ये १६.८३ दलघमी (४०.८० टक्के), पूर्णा प्रकल्पात ९.१० दलघमी (२५.७३ टक्के) व सपन प्रकल्पात १८.७२ अर्थात ४८.५० टक्के जलसाठा आहे.