शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
3
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
4
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
5
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
6
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
7
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
8
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
9
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
10
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
11
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
12
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
13
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
14
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
15
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
16
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
17
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
18
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
19
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
20
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”

विद्यापीठात ‘कुलगुरू हटाव’चे नारे

By admin | Updated: March 14, 2015 00:34 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात गुरुवारी उघडकीस आलेल्या गुणवाढ प्रकरणाचा निषेध नोंदवीत कुलगुरू मोहन खेडकर यांच्या दालनात शुक्रवारी ‘कुलगुरु हटाव’चे नारे देत ...

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात गुरुवारी उघडकीस आलेल्या गुणवाढ प्रकरणाचा निषेध नोंदवीत कुलगुरू मोहन खेडकर यांच्या दालनात शुक्रवारी ‘कुलगुरु हटाव’चे नारे देत शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला. विद्यापीठाच्या मूल्यांकन विभागात पुन्हा गुणवाढ प्रकरण उघडकीस आले आहे. आंभियांत्रिकी व अन्य विद्याशाखेतील ११ विद्यार्थ्यांनी पैसे देऊन गुणवाढ करून घेतल्याचे सिध्द झाल्यानंतर शिवसैनिकांनी रोष व्यक्त केला. बडनेऱ्यातील युवासेनाध्यक्ष राहुल माटोडे यांच्या नेतृत्वात शहर प्रमुख ललित झंझाळ, प्रवीण दिघाते, शैलेशसिंग चव्हाण, विजय खंडारे, रवी सोनटक्के, निलेशसिंग चव्हाण, अजय सूर्यवंशी, गोलू वानखडे, शक्ती भिसे, आशिष तिडके, अमोल अवघड, पवन लेंडे आदींनी कुलगुरू खेडकर यांच्या दालनात शुक्रवारी धडक दिली. गुणवाढ प्रकरणातील दोषींवर कारवाईची मागणी शिवसैनिकांनी यावेळी रेटून धरली होती. यावेळी कुलगुरूंसह परीक्षा नियंत्रक जे. डी. वडते, प्र-कुलगुरू जयकिरण तिडके, बीसीओडीचे संचालक अजय देशमुख उपस्थित होते. शिवसैनिकांनी सर्वच अधिकाऱ्यांची कानउघाडणी करीत गुणवाढ प्रकरणाचा जाब विचारला. यापूर्वीही अमरावती विद्यापीठात गुणवाढीचे प्रकरण उघडकीस आले होते. मात्र, दोषींवर कारवाई करण्यात मात्र हयगय केली जात असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला. मूल्यांकन अधिकारी मुखर्जी यांना आमच्यासमोर हजर करा, असा आक्रमक पवित्रा शिवसैनिकांनी घेतला. यावेळी प्र-कुलगुरू जयकिरण तिडके यांनी कायद्याच्या चाकोरीतूनच कामे केली जात असल्याचे शिवसैनिकांना सांगितले. या प्रकारामुळे विद्यापीठ परिसरात खळबळ उडाली. शिवसैनिकांनी कुलगुरूंच्या दालनात ‘जय शिवाजी जय भवानी’च्या घोषणा देत ‘कुलगुरू हटाव’ची मागणी केली. गुणवाढ प्रकरण असेच सुरु ठेवायचे असेल तर, विद्यार्थ्यांसाठी तसा विशेष कक्ष स्थापन करण्याचा उपहासात्मक सल्लाही शिवसैनिकांनी यावेळी कुलगुरूंना दिला. तब्बल अर्धा तास कुलगुरूंच्या दालनात हा गोंधळ सुरू होता. (प्रतिनिधी)मूल्यांकनात ३५ हजारात गुणवाढएक महिन्यापूर्वी अमरावती विद्यापीठातील पुनर्मूंल्याकंन विभागातील गुणवाढ प्रकरण उघडकीस आले होते. ती चौकशी फे्रजरपुरा पोलीस करीत आहे. हे प्रकरण शांत होत नाही, तो दुसरे गुणवाढ प्रकरण उघडकीस आले आहे. अंभियात्रिकीच्या ११ विद्यार्थ्यांनी उत्तर पत्रिकेच्या नियमित मूल्यांकनानंतर उत्तर पत्रिकेंमध्ये खोडतोड करुन गुणवाढ केली. या प्रकरणात अभियांत्रिकीच्या ९ विद्यार्थ्यांनी प्रत्येकी ३५ हजार रुपये देवून गुणवाढ केल्याची माहिती परिक्षा नियंत्रक जे. डी. वडते यांनी दिली.