शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात
2
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
3
"१० दिवसांपूर्वी पाकिस्तानला जाऊन आली,आता काश्मीरकडे..."; ज्योतीच्या हालचालींबद्दल आधीच आलेला संशय!
4
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
5
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका
6
ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
7
Astro Tips: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी सोमवारी करा २ लवंगांचा सोपा उपाय; विसरून जाल सगळे अपाय!
8
 ‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे...
9
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
10
अवकाशातून अत्यंत स्पष्ट फोटो मिळाले असते, पण...; पृथ्वी निरीक्षण उपग्रह प्रक्षेपणाची मोहीम अयशस्वी
11
अबोल वेदना, गोंधळलेली मने : पुरुषांच्या मानसिक आरोग्याची वेळीच दखल घ्या! मानसोपचारतज्ज्ञांचे आवाहन
12
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
13
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
14
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
15
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
16
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
17
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
18
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
19
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
20
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा

मेळघाटातील ‘ती’ सहा गावे प्रकाशापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 05:00 IST

तालुक्यातील रंगूबेली, खामदा, ढोकळा, कुंड, किनीखेडा आणि खोपमार या गावांत स्वातंत्र्याच्या ७३ वर्षांनंतर अंधाराचे साम्राज्य कायम आहे. प्रजासकाकाची ७० वर्षे पूर्ण करणाºया या देशातील धारणी तालुक्यात रात्रीचा काळोख हीच आदिवासींची ओळख ठरली आहे. मेळघाट म्हटले की, डोळ्यांसमोर येतो तो १९९३ मधील कुपोषणाचा उद्रेक. कुपोषणाचे तांडव प्रसिद्धी माध्यमातून उघड झाल्यानंतर शासनाने मेळघाटाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली.

ठळक मुद्देस्वातंत्र्याची ७३ वर्षे : ना वीजजोडणी, ना अन्य सुविधा; प्रशासनाकडून निवेदने बेदखल

श्यामकांत पाण्डेय।लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : सातपुड्याच्या कुशीत आणि तापी नदीच्या खोऱ्यात वसलेल्या मेळघाटातील आदिवासी जनता अद्यापही विकासाच्या प्रवाहापासून कोसोदूर आहे. मेळघाटातील अनेक गावांमध्ये अद्यापही वीज, रस्ते, पाणी या पायाभूत सुविधा पोहोचलेल्या नाहीत. धारणी तालुक्यातील सहा गावे त्याची ज्वलंत उदाहरण ठरली आहेत.तालुक्यातील रंगूबेली, खामदा, ढोकळा, कुंड, किनीखेडा आणि खोपमार या गावांत स्वातंत्र्याच्या ७३ वर्षांनंतर अंधाराचे साम्राज्य कायम आहे. प्रजासकाकाची ७० वर्षे पूर्ण करणाºया या देशातील धारणी तालुक्यात रात्रीचा काळोख हीच आदिवासींची ओळख ठरली आहे.मेळघाट म्हटले की, डोळ्यांसमोर येतो तो १९९३ मधील कुपोषणाचा उद्रेक. कुपोषणाचे तांडव प्रसिद्धी माध्यमातून उघड झाल्यानंतर शासनाने मेळघाटाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. मेळघाटातील अठराविश्वे दारिद्र्य भोगणाºया आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी कुपोषणाचा नावाखाली दरवर्षी विविध विभागांमार्फत कोट्यवधीचा निधी येतो. मध्य प्रदेशातून वीजपुरवठा घेण्याच्या वल्गना केल्या जातात. मात्र, योजनांची अंमलबजावणी नीटशी होत नसल्याने व शासकीय योजनांच्या पाचवीला भ्रष्टाचार पुजला असल्याने आदिवासी खोल गर्तेत अडकला आहे.दैनंदिन गरजेच्या प्रकारात मोडणाºया वीजपुरवठ्याची स्थितीदेखील तशीच आहे. रंगुबेली, खामदा, ढोकळा, कुंड, खोपमार या सहा गावांमध्ये विजेचे खांब पोहोचले नाहीत. त्यामुळे गावात ना मोबाईल, ना वीजेवर चालणारी कुठली उपकरणे. स्वातंत्र्यापूर्वीची खेडीे कशी असावीत, हे या सहा गावांमध्ये भटकंती केल्यास कळू शकेल. गावात पोहोचण्यासाठी रस्तासुद्धा नाही. या सहा गावांमध्ये पोहोचणे म्हणजे तारेवरची कसरत आहे. दुचाकीचा प्रवास मोठ्या मुश्किलीने केला जाऊ शकतो, अशी या गावांची अवस्था आहे. याव्यतिरिक्त गावात पिण्यासाठी स्वच्छ पाणी हे पाणीपुरवठा योजनेअभावी मिळेनासे झाले आहे. त्यामुळे ही गावे मेळघाटातील आहेत का आणि मेळघाट हे अमरावती जिल्ह्यात येते का, असा सवाल विचारला जात आहे. आपल्या खेड्याची परिस्थिती सुधारेल, या आशेवर या सहा गावांतील अनेक पिढ्या जगत राहिल्या. त्यामुळे हे एक स्वप्नच राहील का, असा प्रश्न येथील आदिवासींना सतावत आहे.धारणी तालुक्यातील या सहा गावांव्यतिरिक्त धारणी महावितरण उपविभाग अंतर्गत येणारे चिखलदरा तालुक्यातील रक्षा हे गावसुद्धा विजेविना आहे. महावितरणने आदेश दिल्यास, योजनांना मान्यता मिळाल्यास या गावांना वीजपुरवठा करणे शक्य आहे.-विनय तायडे, उपकार्यकारी अभियंता, महावितरण

टॅग्स :electricityवीज