शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाईन फ्लू’चे सहा बळी

By admin | Updated: April 19, 2017 00:04 IST

संसर्गजन्य ‘स्वाईन फ्लू’ने आतापर्यंत अमरावती जिल्ह्यात चार बळी घेतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात या आजाराने बाधित १७ संशयितांवर उपचार सुरू आहेत.

संसर्गजन्य आजार : आरोग्य विभाग अलर्ट, शासकीय रूग्णालयांमध्ये उपचार सुविधाअमरावती : संसर्गजन्य ‘स्वाईन फ्लू’ने आतापर्यंत अमरावती जिल्ह्यात चार बळी घेतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात या आजाराने बाधित १७ संशयितांवर उपचार सुरू आहेत. ‘स्वाईन फ्लू’चा वाढता प्रसार पाहता उपाययोजनेबाबत आरोग्य विभागही अलर्ट झाला आहे.‘स्वाईन फ्लू’मुळे वंदना इंगोले (विलासनगर), विश्वनाथ खंडारे (कपीलवस्तूनगर),गजानन डोईफोडे (गगलानीनगर), मुकद्दर शाह अयुब शहा (रोशननगर), गणेश पिंपळकर (शिरजगाव कसबा) व सोमय्या परवीन (नांदगावपेठ) यांचा मृत्यू झाल्याची पृष्टी महापालिकेच्या आरोग्य विभागाने केली आहे. ५० संशयितांचे घेतले "स्वॅब"अमरावती : ‘स्वाईन फ्लू’मुळे पुणे, मुंबई, नाशिक व अकोला शहरात बळी गेले असून प्रवासातून ‘स्वाईन फ्लू’चा सर्वाधिक प्रसार झाल्याचे निदर्शनास आले आहे. जिल्ह्यातही ‘स्वाईन फ्लू’वेगाने पाय पसरत आहे. आतापर्यंत ६ बळी गेल्याची माहिती आहे. इर्विनमध्ये आतापर्यंत ५० संशयितांचे स्वॅब घेण्यात आले असून १० रूग्ण स्वाईन फ्लू पॉझिटिव्ह आले आहेत. इर्विन रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ९ मध्ये दाखल केलेल्या ‘त्या’ मातेची २३ दिवसांची चिमुकली ‘स्वाईन फ्लू’ पॉझिटिव्ह आली होती.असा झाला संसर्ग गजानन डोईफोडे : गगलानीनगरातील रहिवासी गजानन डोईफोडे हे ६ फेब्रुवारी रोजी जबलपूर येथे गेले होते. १६ फेब्रुवारीला परत आल्यावर त्यांना ताप,सर्दी, खोकला व घसा दुखण्याचा त्रास जाणवला. त्यांनी प्राथमिक उपचार म्हणून ‘पॅरॅसिटीमॉल’ गोळ्या घेतल्या. त्यांना खासगी रुग्णालयात दाखविण्यात आले. मात्र, तरीही त्यांची प्रकृती खालावत असल्याचे पाहून नातेवाईकांनी महिन्याभरापूर्वी अकोला येथील ओझोन हॉस्पीटलला भरती केले. तेथे उपचारादरम्यान १३ एप्रिलला त्यांचा मृत्यू झाला. गणेश पिंपळकर : गगलानीनगरातील गणेश पिंपळकर हे शिरजगाव कसबा येथे कार्यरत होते. ते २१ जानेवारीला चिखलदऱ्याला गेले होते. ९ फेब्रुवारीला ते परतले. त्यानंतर ताप, सर्दी व श्वास घेण्यास त्रास जाणवला. त्यांनी परतवाड्यात आठवडाभर उपचार घेतले. त्यानंतर अमरावती येथे खासगी रुग्णालयात उपचार केलेत. त्यानंतर नागपूरला १८ मार्चला ते मरण पावले.वंदना इंगोले : विलासनगरातील रहिवासी वंदना इंगोले यांना २५ मार्च रोजी हलका ताप आला होता.खोकला असल्याने डॉक्टरांनी निमोनियाचा अंदाज वर्तवला. मात्र, २९ मार्च रोजी त्रास वाढल्याने त्यांना इर्विनमध्ये दाखल केले. मात्र, ३० मार्च रोजी त्यांचा मृत्यू झाला. जानेवारी महिन्यात पुण्याला गेले असताना प्रवासादरम्यान त्यांना या रोगाची लागण झाली असावी.सोमय्या परवीन : ७ जून २०१६ रोजी प्रसूतीसाठी नांदगाव पेठ येथे माहेरी गेल्या होत्या. ३ एप्रिलला त्यांना डफरीनमध्ये दाखल करण्यात आले. प्रसूतीनंतर त्यांना ताप, सर्दी झाली. ५ एप्रिलला त्यांना इर्विनमध्ये हलविण्यात आले. ६ एप्रिलला त्यांचा स्वॅब प्रयोगशाळेत पाठविण्यात आला. अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले. १० एप्रिलला नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मुक्कदर शाह :रोशननगर येथील मुक्कदर शाह यांनी १० एप्रिल रोजी सर्दी-खोकला झाल्याने खासगी रुग्णालयात उपचार घेतले. मात्र, प्रकृतीत सुधारणा न झाल्याने ते १३ एप्रिल रोजी अन्य खासगी रुग्णालयात गेले. डॉक्टरांना स्वाईन फ्लूची लक्षणे आढळल्याने १४ एप्रिल रोजी मुक्कदर शाह इर्विनला भरती झाले. त्यांचे स्वॅब पॉझिटिव्ह आले. १७ एप्रिलला त्यांचा मृत्यू झाला. विश्वनाथ खंडारे : कपीलवस्तूनगर येथील ६० वर्षीय विश्वनाथ खंडारे यांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला. त्यांना स्वाईन फ्लू संशयित म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या विशेष कक्षामध्ये हलविण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांना स्वाईन फ्लूची बाधा नेमकी कशी झाली, याबाबतची माहिती मिळू शकली नाही. चार दिवसांपूर्वी त्यांना तापामुळे खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, तेथे त्यांनी उपचाराला दाद दिली नाही. ‘स्वाईन फ्लू’चे आतापर्यंत १४ पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. या रोगावरील प्रतिबंधात्मक औषधांची सुविधा सर्व जिल्हा रुग्णालयात उपलब्ध करुन देण्यात आली आहे.-नितीन अंबाडेकर, आरोग्य उपसंचालक