शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शेतीशी निगडित सहा पेटेंटची एकाच दिवशी नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 01:40 IST

निसर्ग आणि प्रशासनाच्या तडाख्यातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी धामणगावातील प्राध्यापक अमृत रेड्डी गड्डमवार हे धडपडत आहेत. त्यांचे शेतीशी निगडित सहा पेटेंट एकाच दिवशी नोंदविले गेले. या कामगिरीची इंडिया बुक आॅफ रेकॉर्डने घेतली असून, त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । धामणगावच्या प्राध्यापकाची धडाडी, इंडिया बुक आॅफ रेकॉर्डने सन्मानित

मोहन राऊत ।धामणगाव रेल्वे : निसर्ग आणि प्रशासनाच्या तडाख्यातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी धामणगावातील प्राध्यापक अमृत रेड्डी गड्डमवार हे धडपडत आहेत. त्यांचे शेतीशी निगडित सहा पेटेंट एकाच दिवशी नोंदविले गेले. या कामगिरीची इंडिया बुक आॅफ रेकॉर्डने घेतली असून, त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.अमृत रेड्डी यांनी आॅरगॅनिक खत, आॅरगॅनिक तणनाशक, आॅरगॅनिक प्लांट ग्रोथ प्रोमोटर, आॅरगॅनिक फ्लॉवर स्टिम्यूलंट, आॅरगॅनिक माक्रोन्यूट्रिएंट आणि आॅरगॅनिक अमिनो असिड असे सहा संशोधन केले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या अमरावती येथील खत तपासणी व संशोधन केंद्राने त्यांच्या आॅरगॅनिक खताचे नमुने तपासले. त्यामध्ये वनस्पतीला आवश्यक असणारे घटक योग्य प्रमाणात असल्याचा निष्कर्ष दिला. त्यांनी याचा वापर प्रायोगिक तत्त्वावर सावळा (ता. धामणगाव रेल्वे) येथील अमरावती विलास मेटे यांच्या शेतात गवारावर केला असता, त्यांना एकरी १८ क्विंटल उत्पादन मिळाले. धामणदरी (ता. घाटंजी) येथील भोजा रेड्डी यांच्या तिळाच्या शेतात आणि सावंगी (ता. घाटंजी) येथील सुनील रेड्डी यांच्या मुगाच्या पिकातही चांगले परिणाम मिळाले.सध्या छत्तीसगढ येतील शेतकरी मनोहर साहू यांच्या शेतात कारले, दोडका, काकडी, वाल तसेच वांगे या पिकांवर प्रयोग सुरू आहे. अमृत रेड्डी यांनी कापूस, तूर, टरबुज, हरभरा, मिरची, कांदा या पिकावर प्रयोग यशस्वी केले. ही पिके काढणीपश्चात नागपूर येथील केंद्रातून तपासली असता, त्यामध्ये कीटकनाशकांचा अंश आढळला नाही. या संशोधनामुळे इंग्लंड येथील विद्यापीठातून त्यांना पीएचडीसाठी पाचारण करण्यात आले.अमृत गड्डमवार यांच्या आॅरगॅनिक खतनिर्मिती प्रयोगावरदेखील नामांकित प्रयोगशाळेची मोहोर लागली आहे.शेतीतील खर्चाला फाटाशेतातील लागवडीचा खर्च वाढला आहे. लहरी हवामान आणि रासायनिक खताच्या चढ्या किमतीमुळे शेती करणे कठीण होत आहे. उत्पादन कमी व उत्पादनमूल्य जास्त अशा दुष्टचक्रात शेतकरी अडकून आहे. वरील समस्या सोडविता येत असल्याचा दावा अमृत गड्डमवार यांनी केला आहे. आपल्याला या यशस्वी प्रयोगाची प्रेरणा व मार्गदर्शन कारंजा लाड येथील विद्याभारती महाविद्यालयाचे प्राचार्य पी.आर. राजपूत यांच्याकडून मिळाले असल्याचे गड्डमवार यांनी सांगितले. अमरावती येथील बियाणी महाविद्यालयाचे प्राचार्य एन.जी. बेलसरे यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. धामणगाव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरदकुमार अग्रवाल व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य एल.पी. धमांदे यांनी त्यांचे कौतुक केले. अमृत रेड्डी यांनी प्रयोगांची देशपातळीवरील प्रयोगशाळांमध्ये पडताळणी केली आहे. त्यांच्या संशोधक वृत्तीची दखल इंडिया बुक आॅफ रेकॉर्डने घेतली असून, त्यांचे नाव या पुस्तकात नोंदविले गेले आहे.

टॅग्स :agricultureशेती