शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

शेतीशी निगडित सहा पेटेंटची एकाच दिवशी नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 01:40 IST

निसर्ग आणि प्रशासनाच्या तडाख्यातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी धामणगावातील प्राध्यापक अमृत रेड्डी गड्डमवार हे धडपडत आहेत. त्यांचे शेतीशी निगडित सहा पेटेंट एकाच दिवशी नोंदविले गेले. या कामगिरीची इंडिया बुक आॅफ रेकॉर्डने घेतली असून, त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । धामणगावच्या प्राध्यापकाची धडाडी, इंडिया बुक आॅफ रेकॉर्डने सन्मानित

मोहन राऊत ।धामणगाव रेल्वे : निसर्ग आणि प्रशासनाच्या तडाख्यातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी धामणगावातील प्राध्यापक अमृत रेड्डी गड्डमवार हे धडपडत आहेत. त्यांचे शेतीशी निगडित सहा पेटेंट एकाच दिवशी नोंदविले गेले. या कामगिरीची इंडिया बुक आॅफ रेकॉर्डने घेतली असून, त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.अमृत रेड्डी यांनी आॅरगॅनिक खत, आॅरगॅनिक तणनाशक, आॅरगॅनिक प्लांट ग्रोथ प्रोमोटर, आॅरगॅनिक फ्लॉवर स्टिम्यूलंट, आॅरगॅनिक माक्रोन्यूट्रिएंट आणि आॅरगॅनिक अमिनो असिड असे सहा संशोधन केले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या अमरावती येथील खत तपासणी व संशोधन केंद्राने त्यांच्या आॅरगॅनिक खताचे नमुने तपासले. त्यामध्ये वनस्पतीला आवश्यक असणारे घटक योग्य प्रमाणात असल्याचा निष्कर्ष दिला. त्यांनी याचा वापर प्रायोगिक तत्त्वावर सावळा (ता. धामणगाव रेल्वे) येथील अमरावती विलास मेटे यांच्या शेतात गवारावर केला असता, त्यांना एकरी १८ क्विंटल उत्पादन मिळाले. धामणदरी (ता. घाटंजी) येथील भोजा रेड्डी यांच्या तिळाच्या शेतात आणि सावंगी (ता. घाटंजी) येथील सुनील रेड्डी यांच्या मुगाच्या पिकातही चांगले परिणाम मिळाले.सध्या छत्तीसगढ येतील शेतकरी मनोहर साहू यांच्या शेतात कारले, दोडका, काकडी, वाल तसेच वांगे या पिकांवर प्रयोग सुरू आहे. अमृत रेड्डी यांनी कापूस, तूर, टरबुज, हरभरा, मिरची, कांदा या पिकावर प्रयोग यशस्वी केले. ही पिके काढणीपश्चात नागपूर येथील केंद्रातून तपासली असता, त्यामध्ये कीटकनाशकांचा अंश आढळला नाही. या संशोधनामुळे इंग्लंड येथील विद्यापीठातून त्यांना पीएचडीसाठी पाचारण करण्यात आले.अमृत गड्डमवार यांच्या आॅरगॅनिक खतनिर्मिती प्रयोगावरदेखील नामांकित प्रयोगशाळेची मोहोर लागली आहे.शेतीतील खर्चाला फाटाशेतातील लागवडीचा खर्च वाढला आहे. लहरी हवामान आणि रासायनिक खताच्या चढ्या किमतीमुळे शेती करणे कठीण होत आहे. उत्पादन कमी व उत्पादनमूल्य जास्त अशा दुष्टचक्रात शेतकरी अडकून आहे. वरील समस्या सोडविता येत असल्याचा दावा अमृत गड्डमवार यांनी केला आहे. आपल्याला या यशस्वी प्रयोगाची प्रेरणा व मार्गदर्शन कारंजा लाड येथील विद्याभारती महाविद्यालयाचे प्राचार्य पी.आर. राजपूत यांच्याकडून मिळाले असल्याचे गड्डमवार यांनी सांगितले. अमरावती येथील बियाणी महाविद्यालयाचे प्राचार्य एन.जी. बेलसरे यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. धामणगाव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरदकुमार अग्रवाल व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य एल.पी. धमांदे यांनी त्यांचे कौतुक केले. अमृत रेड्डी यांनी प्रयोगांची देशपातळीवरील प्रयोगशाळांमध्ये पडताळणी केली आहे. त्यांच्या संशोधक वृत्तीची दखल इंडिया बुक आॅफ रेकॉर्डने घेतली असून, त्यांचे नाव या पुस्तकात नोंदविले गेले आहे.

टॅग्स :agricultureशेती