शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
4
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
5
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
6
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
7
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
8
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
9
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
11
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
12
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
13
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
14
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
15
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
16
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
17
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
18
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
19
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
20
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर

सहा शैक्षणिक संस्थांना करावे लागणार अन्नपदार्थ तपासणीचे ऑडिट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2019 20:33 IST

एफएसएसएआयची ई-ट्राइड कॅम्पस संकल्पना : अमरावती येथील अन्न व औषध  प्रशासनाकडून पत्र

वैभव बाबरेकर /अमरावती : केंद्र शासनाच्या अन्न सुरक्षा मानदे प्राधिकरणाने ई-ट्राइड कॅम्पस संकल्पना अमलात आणली असून, अमरावती विभागातील सहा मोठ्या शैक्षणिक संस्थांना अन्न व औषध प्रशासनाने पत्र दिले आहे. विद्यार्थ्यांसाठी अन्नपदार्थ बनविताना त्या अन्नाच्या तपासणीची जबाबदारी संस्थांकडे सोपविण्यात आली असून, त्यासंबंधी आॅडिट एफएसएसएआय प्रमाणित करणार आहे. 

    मोठ्या शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना चांगल्या व सकस अन्नपदार्थाचा पुरवठा व्हावा, या उद्देशाने नवी दिल्लीतील एफएसएसएआयकडून ई-ट्राइड कॅम्पस संकल्पना अमलात आणली आहे. मोठ्या शैक्षणिक संस्थांकडे वसतिगृहे, मेस, कॅन्टीन व स्वयंपाकगृहे असतात. तेथे तयार होणाºया अन्नपदार्थांचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेद्वारे तपासणी करण्याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासनाची होती. मात्र, आता मोठ्या शैक्षणिक संस्थांना स्वत:च अन्नपदार्थांची तपासणी करावी लागणार असून, तेथील आस्थापनेचे थर्ड पार्टीकडून आॅडिट करून घ्यावे लागणार आहे. अमरावती परिक्षेत्रात ई-ट्राइड कॅम्पसमध्ये अमरावती विभागातील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अकोल्याचे डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मेहकर (जि. बुलडाणा) तालुक्यातील हिवरा आश्रम येथील स्वामी विवेकानंद आश्रम आणि यवतमाळ येथील जवाहरलाल दर्डा इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनीअरिंग अँड टेक्नालॉजी व जगदंबा कॉलेज आॅफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी या संस्थांचा समावेश केला आहे. त्यांना ई-ट्राइड कॅम्पसच्या निकषाविषयी माहिती व कायद्यातील तरतुदीनुसार चेकलिस्ट देण्यात आली आहे.

अन्न सुरक्षा व स्वच्छतेची पूर्तता करणे, फूड वेस्ट मॅनेजमेंट, सिझनल व लोकल फळे देणे, जनजागृती करणे, सकस आहार देणे असे निकष या संस्थांना पूर्ण करावे लागणार आहेत. अमरावती येथील अन्न व औषधी प्रशासन विभागाने यासंबंधाने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरूंना पत्र दिले आहे. 

केंद्र शासनाच्या एफएसएसआयने ई-ट्राइड कॅम्पस संकल्पना अमलात आणली आहे. मोठ्या संस्थांना अन्नपदार्थांचे थर्ट पार्टीकडून आॅडिट करावे लागणार असून, त्यासंबंधी अहवाल एफएसएसआय प्रमाणित करेल. यासंबंधाने कुलगुरूंसह अमरावती विभागातील सहा संस्थांना पत्र देण्यात आले आहे. त्यांना अन्न सुरक्षा व स्वच्छतेबाबतचे निकष पूर्ण करावे लागणार आहे. - एस.डी. केदार, सहआयुक्त (अन्न)