शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

सहा शैक्षणिक संस्थांना करावे लागणार अन्नपदार्थ तपासणीचे ऑडिट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2019 20:33 IST

एफएसएसएआयची ई-ट्राइड कॅम्पस संकल्पना : अमरावती येथील अन्न व औषध  प्रशासनाकडून पत्र

वैभव बाबरेकर /अमरावती : केंद्र शासनाच्या अन्न सुरक्षा मानदे प्राधिकरणाने ई-ट्राइड कॅम्पस संकल्पना अमलात आणली असून, अमरावती विभागातील सहा मोठ्या शैक्षणिक संस्थांना अन्न व औषध प्रशासनाने पत्र दिले आहे. विद्यार्थ्यांसाठी अन्नपदार्थ बनविताना त्या अन्नाच्या तपासणीची जबाबदारी संस्थांकडे सोपविण्यात आली असून, त्यासंबंधी आॅडिट एफएसएसएआय प्रमाणित करणार आहे. 

    मोठ्या शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना चांगल्या व सकस अन्नपदार्थाचा पुरवठा व्हावा, या उद्देशाने नवी दिल्लीतील एफएसएसएआयकडून ई-ट्राइड कॅम्पस संकल्पना अमलात आणली आहे. मोठ्या शैक्षणिक संस्थांकडे वसतिगृहे, मेस, कॅन्टीन व स्वयंपाकगृहे असतात. तेथे तयार होणाºया अन्नपदार्थांचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेद्वारे तपासणी करण्याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासनाची होती. मात्र, आता मोठ्या शैक्षणिक संस्थांना स्वत:च अन्नपदार्थांची तपासणी करावी लागणार असून, तेथील आस्थापनेचे थर्ड पार्टीकडून आॅडिट करून घ्यावे लागणार आहे. अमरावती परिक्षेत्रात ई-ट्राइड कॅम्पसमध्ये अमरावती विभागातील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अकोल्याचे डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मेहकर (जि. बुलडाणा) तालुक्यातील हिवरा आश्रम येथील स्वामी विवेकानंद आश्रम आणि यवतमाळ येथील जवाहरलाल दर्डा इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनीअरिंग अँड टेक्नालॉजी व जगदंबा कॉलेज आॅफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी या संस्थांचा समावेश केला आहे. त्यांना ई-ट्राइड कॅम्पसच्या निकषाविषयी माहिती व कायद्यातील तरतुदीनुसार चेकलिस्ट देण्यात आली आहे.

अन्न सुरक्षा व स्वच्छतेची पूर्तता करणे, फूड वेस्ट मॅनेजमेंट, सिझनल व लोकल फळे देणे, जनजागृती करणे, सकस आहार देणे असे निकष या संस्थांना पूर्ण करावे लागणार आहेत. अमरावती येथील अन्न व औषधी प्रशासन विभागाने यासंबंधाने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरूंना पत्र दिले आहे. 

केंद्र शासनाच्या एफएसएसआयने ई-ट्राइड कॅम्पस संकल्पना अमलात आणली आहे. मोठ्या संस्थांना अन्नपदार्थांचे थर्ट पार्टीकडून आॅडिट करावे लागणार असून, त्यासंबंधी अहवाल एफएसएसआय प्रमाणित करेल. यासंबंधाने कुलगुरूंसह अमरावती विभागातील सहा संस्थांना पत्र देण्यात आले आहे. त्यांना अन्न सुरक्षा व स्वच्छतेबाबतचे निकष पूर्ण करावे लागणार आहे. - एस.डी. केदार, सहआयुक्त (अन्न)