शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
3
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
4
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
5
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
6
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
7
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
8
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
9
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
10
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
11
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
12
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
13
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
14
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
15
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
16
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
18
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
19
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
20
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?

धामणगाव तालुक्यातील महाकाय वृक्ष आगीच्या भक्ष्यस्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:12 IST

धुऱ्याला आग लावणे पडते महागात, व्यापारी करतात परस्पर विक्री मोहन राऊत/ धामणगाव रेल्वे : शेतीची मशागतपूर्व तयारी करताना शेतकरी ...

धुऱ्याला आग लावणे पडते महागात, व्यापारी करतात परस्पर विक्री

मोहन राऊत/ धामणगाव रेल्वे : शेतीची मशागतपूर्व तयारी करताना शेतकरी आपल्या धुऱ्याला रात्रीला आग लावतात आणि निवांत घरी जातात. आग रस्त्यावर असलेल्या महाकाय वृक्षांपर्यंत पोहोचून ती अर्धवट जळतात. दुसऱ्या दिवशी व्यापारी येऊन या कोसळलेल्या झाडाची परस्पर विक्री करतात. गत पाच वर्षांत तालुक्यातील महामार्ग व अंतर्गत रस्त्याच्या हद्दीतील दीड हजार महाकाय वृक्ष आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहेत.

धामणगाव तालुक्यात अंजनसिंगी, देवगाव, मंगरुळ दस्तगीर, निंबोली, तळणी, भातकुली रस्ता प्रजिमा-३६ तसेच भिल्ली मार्गे निंभोरा ,वकनाथ पुलगाव, तळेगाव दशासर, शेंदूरजना खुर्द, तिवरा, चांदुर रेल्वे असे सार्वजनिक बांधकाम ,जिल्हा परिषद रस्त्यालगत निंब, वड, चिंच अशा विविध प्रजातीचे हजारो महाकाय वृक्ष आहेत. मागील पाच वर्षांत शेताचे धुरे जाळणारे शेतकरीच या झाडांच्या जिवावर उठले आहेत.

----------------------------

व्यापारी घेतात फायदा

उन्हाळ्यातील फेब्रुवारी ते मे महिन्यापर्यंत हंगामपूर्व मशागतीसाठी शेतकरी धुरे साफ करतात. शेतातील काडी कचरा एकत्र केला जातो, तर धुरे दिवसा वा रात्री पेटवण्यात येतात. ही आग रस्त्यालगतच्या झाडांपर्यंत पोहोचते. हे झाडे अर्धवट पेटल्यानंतर पहाटे झाडे कटाई करणारे व्यापारी आग टॅंकरच्या पाण्याने विझवितात. दुसऱ्या रात्री झाडांची कटाई करून विक्री केली जाते. यात ना तालुका प्रशासनाची परवानगी, ना संबंधित विभागाचा ना-हरकत दाखला घेतला जातो. वडिलोपार्जित आंब्याच्या झाडांची तर खुलेआम कटाई केली जात असल्याचे पाहायला मिळते.

------------------------

प्रशासन हतबल, जबाबदारी स्वीकारणार कोण?

वृक्ष कटाईसाठी महसूल विभागाची ना-हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. या प्रकियेला अधिक दिवस लागतात. त्यात कधी कधी तलाठीही सकारात्मक अहवाल देत नाहीत. त्यामुळे काही शेतकरी शेतातील धुरे जाळताना वृक्षाच्या बुडाशी आग लावण्याची नामी शक्कल लढवित आहेत. त्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्ता अखत्यारीत असलेले अनेक झाडे जाळली जातात. महसूल प्रशासन चौकशीत शेताच्या धुऱ्याला आग लागली म्हणून झाडे जळाली, असा अहवाल देतो.

-----------------------

कोट्यवधीचे वृक्षारोपण पाण्यात

एकीकडे शासनाकडून दरवर्षी वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घेऊन लाखो रोपांची लागवड करण्यात येते. परंतु, काही जण हेतुपुरस्सर वृक्षांची कत्तल करून शासनाच्या धोरणाला अडथळा निर्माण करतात. काही व्यापारी रात्रीच्या वेळी उन्मळून पडलेली झाडे अवैधरीत्या तोडून करून परस्पर विक्री करतात. त्यामुळे शासनाचा महसुल बुडतो, ही वस्तुस्थिती तालुक्याची आहे.

----------------------

तालुक्यातील रस्त्यालगत असलेल्या सर्व शेतकऱ्यांनी हंगामपूर्व मशागतीची कामे करताना शेताचा धुरा जाळायचा असल्यास स्वत: उपस्थित राहून आग नियंत्रित करावी. पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षांना इजा पोहचणार नाही, याची दक्षता घेणे, झाडे आगीपासून वाचविणे गरजेचे आहे.

- जी.पी. रंभाळ, उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, धामणगांव रेल्वे