शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

धामणगाव तालुक्यातील महाकाय वृक्ष आगीच्या भक्ष्यस्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:12 IST

धुऱ्याला आग लावणे पडते महागात, व्यापारी करतात परस्पर विक्री मोहन राऊत/ धामणगाव रेल्वे : शेतीची मशागतपूर्व तयारी करताना शेतकरी ...

धुऱ्याला आग लावणे पडते महागात, व्यापारी करतात परस्पर विक्री

मोहन राऊत/ धामणगाव रेल्वे : शेतीची मशागतपूर्व तयारी करताना शेतकरी आपल्या धुऱ्याला रात्रीला आग लावतात आणि निवांत घरी जातात. आग रस्त्यावर असलेल्या महाकाय वृक्षांपर्यंत पोहोचून ती अर्धवट जळतात. दुसऱ्या दिवशी व्यापारी येऊन या कोसळलेल्या झाडाची परस्पर विक्री करतात. गत पाच वर्षांत तालुक्यातील महामार्ग व अंतर्गत रस्त्याच्या हद्दीतील दीड हजार महाकाय वृक्ष आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहेत.

धामणगाव तालुक्यात अंजनसिंगी, देवगाव, मंगरुळ दस्तगीर, निंबोली, तळणी, भातकुली रस्ता प्रजिमा-३६ तसेच भिल्ली मार्गे निंभोरा ,वकनाथ पुलगाव, तळेगाव दशासर, शेंदूरजना खुर्द, तिवरा, चांदुर रेल्वे असे सार्वजनिक बांधकाम ,जिल्हा परिषद रस्त्यालगत निंब, वड, चिंच अशा विविध प्रजातीचे हजारो महाकाय वृक्ष आहेत. मागील पाच वर्षांत शेताचे धुरे जाळणारे शेतकरीच या झाडांच्या जिवावर उठले आहेत.

----------------------------

व्यापारी घेतात फायदा

उन्हाळ्यातील फेब्रुवारी ते मे महिन्यापर्यंत हंगामपूर्व मशागतीसाठी शेतकरी धुरे साफ करतात. शेतातील काडी कचरा एकत्र केला जातो, तर धुरे दिवसा वा रात्री पेटवण्यात येतात. ही आग रस्त्यालगतच्या झाडांपर्यंत पोहोचते. हे झाडे अर्धवट पेटल्यानंतर पहाटे झाडे कटाई करणारे व्यापारी आग टॅंकरच्या पाण्याने विझवितात. दुसऱ्या रात्री झाडांची कटाई करून विक्री केली जाते. यात ना तालुका प्रशासनाची परवानगी, ना संबंधित विभागाचा ना-हरकत दाखला घेतला जातो. वडिलोपार्जित आंब्याच्या झाडांची तर खुलेआम कटाई केली जात असल्याचे पाहायला मिळते.

------------------------

प्रशासन हतबल, जबाबदारी स्वीकारणार कोण?

वृक्ष कटाईसाठी महसूल विभागाची ना-हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. या प्रकियेला अधिक दिवस लागतात. त्यात कधी कधी तलाठीही सकारात्मक अहवाल देत नाहीत. त्यामुळे काही शेतकरी शेतातील धुरे जाळताना वृक्षाच्या बुडाशी आग लावण्याची नामी शक्कल लढवित आहेत. त्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्ता अखत्यारीत असलेले अनेक झाडे जाळली जातात. महसूल प्रशासन चौकशीत शेताच्या धुऱ्याला आग लागली म्हणून झाडे जळाली, असा अहवाल देतो.

-----------------------

कोट्यवधीचे वृक्षारोपण पाण्यात

एकीकडे शासनाकडून दरवर्षी वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घेऊन लाखो रोपांची लागवड करण्यात येते. परंतु, काही जण हेतुपुरस्सर वृक्षांची कत्तल करून शासनाच्या धोरणाला अडथळा निर्माण करतात. काही व्यापारी रात्रीच्या वेळी उन्मळून पडलेली झाडे अवैधरीत्या तोडून करून परस्पर विक्री करतात. त्यामुळे शासनाचा महसुल बुडतो, ही वस्तुस्थिती तालुक्याची आहे.

----------------------

तालुक्यातील रस्त्यालगत असलेल्या सर्व शेतकऱ्यांनी हंगामपूर्व मशागतीची कामे करताना शेताचा धुरा जाळायचा असल्यास स्वत: उपस्थित राहून आग नियंत्रित करावी. पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षांना इजा पोहचणार नाही, याची दक्षता घेणे, झाडे आगीपासून वाचविणे गरजेचे आहे.

- जी.पी. रंभाळ, उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, धामणगांव रेल्वे