शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

धामणगाव तालुक्यातील महाकाय वृक्ष आगीच्या भक्ष्यस्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:12 IST

धुऱ्याला आग लावणे पडते महागात, व्यापारी करतात परस्पर विक्री मोहन राऊत/ धामणगाव रेल्वे : शेतीची मशागतपूर्व तयारी करताना शेतकरी ...

धुऱ्याला आग लावणे पडते महागात, व्यापारी करतात परस्पर विक्री

मोहन राऊत/ धामणगाव रेल्वे : शेतीची मशागतपूर्व तयारी करताना शेतकरी आपल्या धुऱ्याला रात्रीला आग लावतात आणि निवांत घरी जातात. आग रस्त्यावर असलेल्या महाकाय वृक्षांपर्यंत पोहोचून ती अर्धवट जळतात. दुसऱ्या दिवशी व्यापारी येऊन या कोसळलेल्या झाडाची परस्पर विक्री करतात. गत पाच वर्षांत तालुक्यातील महामार्ग व अंतर्गत रस्त्याच्या हद्दीतील दीड हजार महाकाय वृक्ष आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहेत.

धामणगाव तालुक्यात अंजनसिंगी, देवगाव, मंगरुळ दस्तगीर, निंबोली, तळणी, भातकुली रस्ता प्रजिमा-३६ तसेच भिल्ली मार्गे निंभोरा ,वकनाथ पुलगाव, तळेगाव दशासर, शेंदूरजना खुर्द, तिवरा, चांदुर रेल्वे असे सार्वजनिक बांधकाम ,जिल्हा परिषद रस्त्यालगत निंब, वड, चिंच अशा विविध प्रजातीचे हजारो महाकाय वृक्ष आहेत. मागील पाच वर्षांत शेताचे धुरे जाळणारे शेतकरीच या झाडांच्या जिवावर उठले आहेत.

----------------------------

व्यापारी घेतात फायदा

उन्हाळ्यातील फेब्रुवारी ते मे महिन्यापर्यंत हंगामपूर्व मशागतीसाठी शेतकरी धुरे साफ करतात. शेतातील काडी कचरा एकत्र केला जातो, तर धुरे दिवसा वा रात्री पेटवण्यात येतात. ही आग रस्त्यालगतच्या झाडांपर्यंत पोहोचते. हे झाडे अर्धवट पेटल्यानंतर पहाटे झाडे कटाई करणारे व्यापारी आग टॅंकरच्या पाण्याने विझवितात. दुसऱ्या रात्री झाडांची कटाई करून विक्री केली जाते. यात ना तालुका प्रशासनाची परवानगी, ना संबंधित विभागाचा ना-हरकत दाखला घेतला जातो. वडिलोपार्जित आंब्याच्या झाडांची तर खुलेआम कटाई केली जात असल्याचे पाहायला मिळते.

------------------------

प्रशासन हतबल, जबाबदारी स्वीकारणार कोण?

वृक्ष कटाईसाठी महसूल विभागाची ना-हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. या प्रकियेला अधिक दिवस लागतात. त्यात कधी कधी तलाठीही सकारात्मक अहवाल देत नाहीत. त्यामुळे काही शेतकरी शेतातील धुरे जाळताना वृक्षाच्या बुडाशी आग लावण्याची नामी शक्कल लढवित आहेत. त्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्ता अखत्यारीत असलेले अनेक झाडे जाळली जातात. महसूल प्रशासन चौकशीत शेताच्या धुऱ्याला आग लागली म्हणून झाडे जळाली, असा अहवाल देतो.

-----------------------

कोट्यवधीचे वृक्षारोपण पाण्यात

एकीकडे शासनाकडून दरवर्षी वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घेऊन लाखो रोपांची लागवड करण्यात येते. परंतु, काही जण हेतुपुरस्सर वृक्षांची कत्तल करून शासनाच्या धोरणाला अडथळा निर्माण करतात. काही व्यापारी रात्रीच्या वेळी उन्मळून पडलेली झाडे अवैधरीत्या तोडून करून परस्पर विक्री करतात. त्यामुळे शासनाचा महसुल बुडतो, ही वस्तुस्थिती तालुक्याची आहे.

----------------------

तालुक्यातील रस्त्यालगत असलेल्या सर्व शेतकऱ्यांनी हंगामपूर्व मशागतीची कामे करताना शेताचा धुरा जाळायचा असल्यास स्वत: उपस्थित राहून आग नियंत्रित करावी. पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षांना इजा पोहचणार नाही, याची दक्षता घेणे, झाडे आगीपासून वाचविणे गरजेचे आहे.

- जी.पी. रंभाळ, उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, धामणगांव रेल्वे