शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

एसआयटीचे पुनर्गठण, बीटीचे अवैध उत्पादन, विक्रीची चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2018 16:25 IST

बीटी कपाशी बियाण्यांमध्ये परवानगी नसलेले व तणनाशकाला सहनशील (ट्रास्जेस्टिक हर्बिसाइड ग्लायकोसेट टॉलरन्स ट्रेट) जीन वापरून अनेक बियाणे उत्पादक कंपन्यांनी अवैधपणे बियाण्यांचे उत्पादन व विक्री केल्याची बाब  निदर्शनास आल्याने चौकशीसाठी शासनाने ७ फेब्रुवारीला दोन सदस्यीय विशेष तपास पथकाचे (एसआयटी) गठण केले.

अमरावती : बीटी कपाशी बियाण्यांमध्ये परवानगी नसलेले व तणनाशकाला सहनशील (ट्रास्जेस्टिक हर्बिसाइड ग्लायकोसेट टॉलरन्स ट्रेट) जीन वापरून अनेक बियाणे उत्पादक कंपन्यांनी अवैधपणे बियाण्यांचे उत्पादन व विक्री केल्याची बाब  निदर्शनास आल्याने चौकशीसाठी शासनाने ७ फेब्रुवारीला दोन सदस्यीय विशेष तपास पथकाचे (एसआयटी) गठण केले. मात्र, अध्यक्षपदी नियुक्त राज्य गुप्त वार्ता विभागाचे अध्यक्ष संजय बर्वे यांच्याऐवजी आता विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्णप्रकाश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अमरावतीचे विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे हे समितीचे सदस्य सचिव आहेत. बीटी बियाण्यांमध्ये परवानगी नसलेले व तणनाशकाला सहनशील जनुकांचा वापर करून अनेक कंपन्याद्वारा बियाण्यांचे उत्पादन व विक्री होत असल्याच्या तक्रारी शासनाला प्राप्त झाल्या तसेच नागपूरच्या ‘सीआयसीआर’  या केंद्राच्या संस्थेकडून प्राप्त अहवालानुसार जादू, एटीएम, बलभद्र, अर्जुन व कृष्णा गोल्ड या बियाण्यांमध्ये हे जनुक आढळून आले आहे. यामुळे पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ च्या नियमांचे उल्लंघन झाले आहे. अशाच प्रकारच्या बियाण्यांचे उत्पादन अनेक राज्यात अनधिकृतपणे होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले. यासंदर्भात २५ आॅक्टोबरला नागपूर जिल्ह्यातील पारशिवणी येथे ‘एफआयआर’देखील दाखल झालेला आहे. अशाप्रकारे बियाण्यांचे उत्पादन करणारी टोळीच अनेक राज्यात कार्यरत आहे. याच्या चौकशीसाठी राज्याचे मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे सीबीआय चौकशीची मागणी १३ आॅक्टोबर २०१७ ला केली होती. त्या अनुषंगाने राज्य शासनानेदेखील स्वतंत्र तपासासाठी आता विशेष तपास समितीचे गठण करून एक महिन्याच्या आत अहवाल मागविला आहे.

कंपण्यावर कारवाईसाठी करणार शिफारसमोन्सँटो, महिको व मोन्सँटो होल्डिंग्ज या बियाणे कंपन्या व काही अनधिकृत कंपन्या विनापरवाना जनुक वापरून महाराष्ट्रात अनधिकृतपणे उत्पादन, साठवणूूक व विक्री यामधील सहभाग व भुमिकेची चौकशी करणे, याप्रकरणी दोषी कंपन्यांवर कारवाई करण्याबाबत शासनाला शिफारस करणे, दाखल गुन्हासंदर्भात कागदपत्राची चाचणी करून अहवाल सादर करणे, बियाण्यांच्या अवैध विक्रीसाठी कारणीभूत बाबी निश्चित करून प्रतिबंधात्मक शिफारस देणे व भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी शिफारसी करून शासनाला एक महिन्याच्या आत अहवाल देणे आदी समितीची कार्यकक्षा आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती