शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
5
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
6
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
7
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
8
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
9
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
10
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
11
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
12
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
13
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
14
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
15
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
16
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
17
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
18
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
19
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
20
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप

अमरावतीच्या आरटीओत सन्नाटा, ‘तो’ दलाल पसार, तीन अधिकारी अटकेत

By गणेश वासनिक | Published: May 03, 2024 10:07 PM

चोरीच्या ट्रकची बनावट कागदपत्रांद्वारे नोंदणी प्रकरण, १६ वाहनांचे चेसीस नंबर बदलण्यात आल्याची माहिती

अमरावती : चाेरीच्या ट्रकची बनावट कागदपत्रांद्वारे नोंदणी करून विक्रीप्रकरणी येथील आरटीओच्या गुडबुकमध्ये असलेला ‘तो’ दलाल पसार झाल्याची विश्वसनीय माहिती आहे. नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अमरावती येथील तीन आरटीओंच्या अधिकाऱ्यांना गुरुवारी अटक केली आहे. आतापर्यंत अमरावती आरटीओत १६ वाहनांचे चेसीस नंबर बदलण्यात आल्याची माहिती आहे. याप्रकरणाशी निगडीत आठ वाहनांचे थेट कनेक्शन असलेला दलाल याचा पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून शोध सुरू आहे.अरुणाचल, उत्तर प्रदेश, नागालँड, दिल्ली आणि हरयाणा आदी ठिकाणी चोरलेल्या वाहनांचे चेसीस नंबर बदलून बनावट कागदपत्रांद्वारे अमरावती, नागपूर येथील आरटीओ अधिकाऱ्यांच्या मदतीने हा गोरखधंदा सुरू होता. विशेष दलालांमार्फत चोरीच्या ट्रकची बनावट कागदपत्रांद्वारे नोंदणी करताना ते ट्रक अमरावती आरटीओत प्रत्यक्षात कधीच हजर राहत नव्हते. मात्र, ॲपवर ऑनलाइन नोंदणी दर्शविली जात होती. त्यामुळे ‘त्या’ दलालांकडून आरटीओ अधिकाऱ्यांना ‘जी फॉर्म’ म्हटले की, डोळेझाक करून हे चोरीचे वाहन नोंदणी केले जात होते. यात आरटीओतील कार्यालयीन कर्मचारी ते आरटीओ अधिकारी अशी साखळी असल्याची माहिती आहे.

...असे उघड झाले अमरावती, नागपूर आरटीओ कनेक्शननवी मुंबई गुन्हे शाखेने ४ मार्च २०२४ रोजी मुंबई येथील ट्रक टर्मिनल परिसरात धाडसत्र राबविले. येेथे संशयास्पद ट्रक क्रमांक एमएच ४० सीएम १५६७ आणि एमएच ४० सीएम ३०९८ या क्रमांकाच्या चारचाकी वाहनांचे चेसीस, इंजीन क्रमांकाची तपासणी केली असता या वाहनांचे मालक कमलेश गोपाल मंगे व नीरव ठक्कर हे असल्याचे पुढे आले. त्यामुळे या दोघांनाही मुंबई येथील बेलापूर पोलिस ठाण्यात चाैकशीसाठी बोलावले असता ही वाहने सचिन नवघणे आणि जावेद मणीयार यांना विकल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पाेलिसांनी टाटा कंपनीच्या तज्ञ्जांकडून या वाहनांची तपासणी केली. ही वाहने बाहेरून टाटा कंपनीची असली तरी या वाहनांचे चेसीस नंबर बदलून बनावट कागदपत्रांद्वारे नोंदणी करण्यात आली, असा धक्कादायक अभिप्राय टाटा कंपनीच्या तज्ञ्जांनी दिला. मुंबई पोलिसांनी दोन महिन्यांच्या तपासानंतर ही वाहने अमरावती, नागपूर आरटीओत नोंदणी झाल्याचे उघडकीस आणले. दरम्यान, नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सहा सदस्यीय पथक २४ एप्रिल रोजी नागपूर आरटीओत चौकशीसाठी आल्याची माहिती आहे.

मुंबईत बयानासाठी बोलावले, आरटीओच्या तीन अधिकाऱ्यांना अटकनवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक तपासासाठी नागपूर येथील आरटीओ कार्यालयात १७ एप्रिल रोजी आले होते. याप्रकरणाशी संबंधित अमरावती येथील आरटीओ अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावले होते. त्यानंतर मुंबई पोलिसांनी ३० एप्रिल रोजी बयाण नोंदविण्यासाठी मोटर वाहन निरीक्षक गणेश वरूठे, सहायक परिवहन अधिकारी भाग्यश्री पाटील आणि सहायक मोटर निरीक्षक सिद्धार्थ ठोके यांना बोलावले असता तिघांंनाही मुंबईत अटक केली. 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसAmravatiअमरावती