शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?
2
ऑपरेशन सिंदूरमधील नामुष्कीनंतर पाकिस्तान सुधरेना, अण्वस्त्रांबाबत रचतोय भयंकर डाव, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट
3
GT चं काही खरं नाही; तळाला असलेल्या CSK च्या बॅटर्संनी केला मोठा धमाका
4
रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला, ३६७ ड्रोन, क्षेपणास्त्रे डागली
5
Tejashwi Yadav : “मला हे आवडत नाही आणि मी ते सहनही करू शकत नाही”; तेजस्वी यादव यांनी स्पष्टच सांगितलं
6
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
7
'आमच्या 24 कोटी लोकांचे जीवन...', पाकिस्तानची सिंधू पाणी करारासाठी UN मध्ये धाव
8
सोन्याच्या तेजीचा फायदा घ्यायचाय? दागिन्यांऐवजी नाणे खरेदी करा; 'हे' आहेत ८ मोठे फायदे
9
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
10
...ती पोस्ट नडली, तेजप्रताप यादव यांची RJDमधून हकालपट्टी, वडील लालूप्रसाद यादव यांनी केली कारवाई
11
Harsha Richhariya : “महाकुंभमुळे माझं आयुष्य पूर्णपणे बदललं, कधी कल्पनाही...”; असं का म्हणाली हर्षा रिछारिया?
12
भयावह! शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला, १३ जणांचा मृत्यू
13
महिलांसाठी खुशखबर! पोस्ट ऑफिसच्या 'या' ५ योजनांमध्ये करा गुंतवणूक, बँकांपेक्षाही जास्त व्याज आणि सुरक्षित भविष्य!
14
एअरटेलच्या वारसदाराने युके सोडले! श्रीमंतावर कर लादला म्हणून? अरबांच्या देशात शिफ्ट झाले...
15
"१० वर्षांपूर्वी माझा घटस्फोट झाला, त्यानंतर...", Divorce बद्दल अपूर्वा नेमळेकरचं भाष्य, म्हणाली- "मी अजूनही सिंगल..."
16
पाकिस्तानच्या २ गद्दारांना अमेरिकेतून अटक, बनावट कंपनीच्या नावाखाली सरकारलाही फसवत होते!
17
वरमाला घालतेवेळी नवऱ्याचे हात पाहून नवरीला आला संशय! संतापत लग्न करण्यास दिला नकार
18
फक्त हॉटेल्सच नाही, आता तुमचं घरही 'ओयो' भाड्याने देणार! कंपनीचा 'हा' प्लॅन ठरणार गेम चेंजर?
19
हुंड्यासाठी तगादा, चारचाकी गाडीची मागणी..! त्रासलेल्या विवाहितेचा टोकाचा निर्णय

शासकीय कार्यालयात सन्नाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 06:01 IST

देशासह राज्यात कोरोनाबाधित व संशयितांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्याचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. काही कठोर निर्णय घेण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज्य शासनाने राज्यातील शासकीय कार्यालयांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या सुरुवातीला ५० टक्के, त्यानंतर ७५ टक्के आता तर ९५ टक्क्यांनी घटली आहे.

ठळक मुद्देपाच टक्केच उपस्थिती : अभ्यागतांसह नागरिकांना बंदी, सर्वत्र शुकशुकाट

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने शासकीय कार्यालयांतील अधिकारी- कर्मचाऱ्यांची संख्या ५ टक्क्यांवर आणली. नागरिक आणि अभ्यागतांना कार्यालयात बंदी घातली आहे. त्यामुळे सोमवार, २३ मार्चपासून शासकीय कार्यालयांमध्ये सर्वत्र शुकशुकाट दिसून येत आहे. शासकीय कार्यालयांतील गर्दी ओसरल्याने जिल्हा प्रशासनाकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.देशासह राज्यात कोरोनाबाधित व संशयितांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्याचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. काही कठोर निर्णय घेण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज्य शासनाने राज्यातील शासकीय कार्यालयांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या सुरुवातीला ५० टक्के, त्यानंतर ७५ टक्के आता तर ९५ टक्क्यांनी घटली आहे. एका दिवसात केवळ ५ टक्के कर्मचारी उपस्थित राहतील, असे नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाकडून पाच टक्के उपस्थितीच्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. कार्यालयांमध्ये केवळ ५ टक्के उपस्थिती ठेवण्याबाबत निर्देश जिल्हा प्रशासनाकडून संबंधित अधिकाºयांना देण्यात आले आहे. हे कार्यालयातील महत्त्वाच्या व प्रलंबित कामे पार पाडण्यासाठी रोटेशन पद्धतीने अधिकारी, कर्मचाºयांना उपस्थित राहण्याची सूचना करण्यात आली आहे. काही अधिकारी, कर्मचाºयांना 'वर्क फ्रॉम होम'ची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे कार्यालयातील गर्दी कमी झाल्याचे चित्र आहे. दुसरीकडे संपूर्ण राज्यात ३१ मार्चपर्यंत जमाबंदी करण्यात आल्याने शासकीय कार्यालयामध्ये कामानिमित्त येणाºया नागरिकांची संख्या रोडावली आहे. जमावबंदी उठेपर्यंत कोणतेही काम होणार नसल्याने नागरिकांनी घरी थांबणे पसंत केले होते. त्यातच एसटी महामंडळाने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. दरम्यान ३१ मार्चपर्यंत शासकीय कार्यालयांमध्ये ५ टक्के उपस्थिती राहणार आहे. अनावश्यक कामानिमित्त नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसGovernmentसरकार