शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

सिद्धक्षेत्र मुक्तागिरीने पांघरला हिरवा शालू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:16 IST

श्रावणात श्रावक, पर्यटकांना भुरळ, धुक्याची चादर करजगाव : परतवाडा शहरालगतच्या व जैनांची काशी म्हणून अवघ्या देशभरात विख्यात असलेल्या मध्यप्रदेशातील ...

श्रावणात श्रावक, पर्यटकांना भुरळ, धुक्याची चादर

करजगाव : परतवाडा शहरालगतच्या व जैनांची काशी म्हणून अवघ्या देशभरात विख्यात असलेल्या मध्यप्रदेशातील सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या मुक्तागिरीने हिरवा शालू पांघरला आहे. ऑगस्ट महिन्यात मुक्तागिरी चोहोबाजूंनी असलेला सातपुडा पर्वत हिरवागार झाला आहे, तर 250 फूट उंचीवरून कोसळणारा धबधबा मन मोहून टाकत आहे. श्रावणात श्रावक व पर्यटक यांची पावले आपसूकच मुक्तागिरीकडे वळतात. गेल्या वर्षी श्रावक व पर्यटक यांचा कोरोनामुळे हिरमोड झाला; परंतु यावर्षी शासनाचे आदेश येईपर्यंत प्रवेश निषिद्ध होता; परंतु सध्या प्रवेश सुरू असल्याने हजारोंच्या वर श्रावक व पर्यटकांची वर्दळ असते. सातपुड्याच्या कुशीत वसलेली शुभ्र रंगाची 52 प्राचीन मंदिरे शिल्पकलेचा अद्वितीय नमुना आहे. ही मंदिरे, हिरवेगार पर्वत, धबधबा, शांत शुभ्र वाहणारी नाग नदी यामुळे अतिशय रमणीय व नयनरम्य मनाला चिरशांती देणारे हे ठिकाण आहे. 250 फुटांवरून कोसळणारा शुभ्र असा धबधबा व त्याचे उडणारे तुषार जैन श्रावक व पर्यटकांना आकर्षित करतात. जैनांची काशी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या मुक्तागिरीला संपूर्ण देशभरातून श्रावक येतात. त्यांच्याकरिता संस्थानतर्फे निवासाची उत्तम व्यवस्था आहे. जेवणाकरिता जैनी मेस आहे. कार्तिकी पौर्णिमेला 52 शुभ्र मंदिरांच्या श्रृंखलेतील दहाव्या क्रमांकाच्या मंदिर व परिसरातील पहाडावर केशरचा पाऊस पडत असल्याची श्रद्धा आहे. करोडो मुनींना मोक्ष प्राप्त झालेल्या मुक्तिगिरीच्या 52 मंदिरांची वंदना करण्याकरिता 250 पायऱ्या चढाव्या लागतात, तर उतरते वेळी 350 उतराव्या लागतात. कार्तिकी पौर्णिमेला येथे रथोत्सव उत्साहात साजरा होतो व यात्राही भरवली जाते.

(प्रतिक्रिया)

गेल्या दीड वर्षापासून शासनाच्या आदेशानुसार प्रवेश बंद होता. तो आदेश प्राप्त झाल्यानंतर श्रावक व पर्यटकांकरिता सुरू करण्यात आला. दिवसभरात एक हजारांवर पर्यटक येथे येतात. शासनाच्या आदेशाचे काटेकोर पालन करून विनामास्क प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. रस्ता व मोबाइल रेंज याकडे शासनाने लक्ष द्यावे, ही माफक अपेक्षा आहे.

-अतुल कळमकर, अध्यक्ष, श्री सिद्ध क्षेत्र मुक्तगिरी संस्थान