शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

 ...तर आगामी काळात निवडणुकाच होणार नाहीत; 'अंनिस'च्या श्याम मानव याचं भाकीत

By उज्वल भालेकर | Updated: December 2, 2023 19:29 IST

संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या सामाजिक मूल्यांचा ऱ्हास होत आहे.

अमरावती : संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या सामाजिक मूल्यांचा ऱ्हास होत आहे. सरकारविरोधात बोलणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे संविधान जपणे आणि देशातील लोकशाही टिकविण्याची गरज आहे. २०२४ मध्ये जर भारतीय जनता पार्टी पुन्हा सत्तेत आली, तर यापुढे देशात पुन्हा निवडणुकाच होणार नसल्याचे भाकीत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रा. श्याम मानव यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

निर्भय बनो विचार मंचतर्फे रविवारी अमरावती शहरातील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे ‘भारतीय लोकशाहीसमोरील आव्हान’ या विषयावर श्याम मानव यांचे व्याख्यान होणार आहे. त्या अनुषंगाने त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, मागील आठ ते दहा वर्षांमध्ये देशभरात समाजामध्ये समाजविघातक वातावरण निर्माण करण्याचे षडयंत्र सातत्याने सुरू आहे. देशातील राष्ट्रीय एकात्मतेला तडा देण्याचे काम सुरू आहे. आज सरकारविरोधात बोलणाऱ्यांचा आवाज दाबण्याचाही प्रयत्न सुरू आहे. भारताचे उन्नतीचे एकमेव माध्यम हे भारतीय संविधान आहे.

परंतु, सध्या संविधानविरोधीच कारवाई होत आहे. संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय या चारही मूल्यांचा ऱ्हास होत आहे. देशात अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचे काम सुरू आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन मूल्य जपली जात नाहीत. देशातील न्याय व्यवस्थेवरही सरकारचा दबाव आहे. अशा परिस्थितीमध्ये भारताच्या उन्नतीचे एकमेव माध्यम असलेले भारतीय संविधान वाचविण्यासाठी आता एकत्र लढा देण्याची गरज आहे, अन्यथा दोन हजार वर्षांपूर्वीची चातुर्वर्ण्य व्यवस्था देशात निर्माण होईल. २०२४ मध्ये जर देशात पुन्हा भाजपा सत्तेत आली, तर मात्र देशात हुकूमशाही प्रस्थापित होऊन निवडणुकाच होणार नसल्याचे श्याम मानव म्हणाले.

 

टॅग्स :AmravatiअमरावतीBJPभाजपा