शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

 ...तर आगामी काळात निवडणुकाच होणार नाहीत; 'अंनिस'च्या श्याम मानव याचं भाकीत

By उज्वल भालेकर | Updated: December 2, 2023 19:29 IST

संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या सामाजिक मूल्यांचा ऱ्हास होत आहे.

अमरावती : संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या सामाजिक मूल्यांचा ऱ्हास होत आहे. सरकारविरोधात बोलणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे संविधान जपणे आणि देशातील लोकशाही टिकविण्याची गरज आहे. २०२४ मध्ये जर भारतीय जनता पार्टी पुन्हा सत्तेत आली, तर यापुढे देशात पुन्हा निवडणुकाच होणार नसल्याचे भाकीत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रा. श्याम मानव यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

निर्भय बनो विचार मंचतर्फे रविवारी अमरावती शहरातील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे ‘भारतीय लोकशाहीसमोरील आव्हान’ या विषयावर श्याम मानव यांचे व्याख्यान होणार आहे. त्या अनुषंगाने त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, मागील आठ ते दहा वर्षांमध्ये देशभरात समाजामध्ये समाजविघातक वातावरण निर्माण करण्याचे षडयंत्र सातत्याने सुरू आहे. देशातील राष्ट्रीय एकात्मतेला तडा देण्याचे काम सुरू आहे. आज सरकारविरोधात बोलणाऱ्यांचा आवाज दाबण्याचाही प्रयत्न सुरू आहे. भारताचे उन्नतीचे एकमेव माध्यम हे भारतीय संविधान आहे.

परंतु, सध्या संविधानविरोधीच कारवाई होत आहे. संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय या चारही मूल्यांचा ऱ्हास होत आहे. देशात अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचे काम सुरू आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन मूल्य जपली जात नाहीत. देशातील न्याय व्यवस्थेवरही सरकारचा दबाव आहे. अशा परिस्थितीमध्ये भारताच्या उन्नतीचे एकमेव माध्यम असलेले भारतीय संविधान वाचविण्यासाठी आता एकत्र लढा देण्याची गरज आहे, अन्यथा दोन हजार वर्षांपूर्वीची चातुर्वर्ण्य व्यवस्था देशात निर्माण होईल. २०२४ मध्ये जर देशात पुन्हा भाजपा सत्तेत आली, तर मात्र देशात हुकूमशाही प्रस्थापित होऊन निवडणुकाच होणार नसल्याचे श्याम मानव म्हणाले.

 

टॅग्स :AmravatiअमरावतीBJPभाजपा