शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने कीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली, कॅबिनेट इमारतीतून धूर निघाला; हल्ल्यात दोघांचा मृत्यू
2
एस्ट्रोनॉमर कंपनीच्या एक्स एचआर प्रमुख कॅबोट यांनी घटस्फोटसाठी अर्ज केला; सीईओ सोबत डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला होता
3
"याच्यासाठी दादांनी आयपीएस ऑफिसरला झापलं"; अंजली कृष्णा यांना अडवणाऱ्याचा सुषमा अंधारेंनी पोस्ट केला व्हिडीओ
4
लालबागच्या राजाचं विसर्जन खोळंबलं, मूर्ती तराफ्यावर चढवताना आलं असं विघ्न, गिरगाव चौपाटीवर काय घडतंय?
5
VIRAL : भावाच्या लग्नासाठी कंपनीने सुट्टी नाकारली, त्यानं काय केलं बघाच! आता सगळेच कंपनीला ठेवतायत नावं 
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार का? कर तज्ज्ञ आणि सीए संघटनांनी काय केली मागणी?
7
रशियाच्या निशाण्यावर नक्की कोण? रहिवासी भागात डागले ड्रोन, पण झेलेन्स्कींशी आहे थेट कनेक्शन!
8
पितृपक्ष २०२५: अत्यंत प्रभावी ८ मंत्र, श्राद्ध विधी करताना म्हणा; पितरांच्या कृपेचे धनी व्हा!
9
मंदिरात फुलांच्या रांगोळीतून ऑपरेशन सिंदूर आणि भगवा ध्वज काढल्याने केरळमध्ये वाद, संघाच्या २७ स्वयंसेवकांवर गुन्हा दाखल
10
मृत्यू पंचकात पितृपक्ष २०२५: ‘या’ ७ तिथींना अधिक महत्त्व; पाहा, पितृ पंधरवड्याच्या मान्यता
11
अमोल मिटकरींचा यू-टर्न! ते ट्विट मागे घेतले, दिलगिरी व्यक्त केली; नेमकं प्रकरण काय?
12
खळबळजनक! ७ वर्षांच्या मुलाने चुकून घेतला ९ वर्षांच्या भावाचा जीव, खेळता खेळता काय घडलं?
13
साप्ताहिक राशीभविष्य: पितृपक्ष सुरुवात ७ राशींना तापदायी-संमिश्र; ५ राशींना लाभ-पैसा येईल!
14
धार्मिक विधीसाठी ठेवलेला १ कोटींचा सोन्याचा मंगल कलश चोरला! आधी धोती घालून रेकी, नंतर साधला डाव
15
पोस्ट ऑफिसच्या PPF योजनेत दरवर्षी ₹५०,००० जमा केल्यास मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?
16
वय हरलं अन् स्वप्नं जिंकली! ३ गिर्यारोहकांचा अनोखा आदर्श, एव्हरेस्टवर फडकावला तिरंगा
17
येणं आनंदाचं, जाणं आशीर्वादाचं! गणराया, तू जाताना वेड लावून जातोस रे...
18
लालबागचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीत दिसला जान्हवीचा बॉयफ्रेंड, गुलालाने माखला शिखर पहारीयाचा चेहरा, म्हणतो...
19
उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी एनडीए खासदारांची डिनर पार्टी रद्द; पंतप्रधानांच्या निवासस्थानी कार्यक्रम होणार होता; कारण आले समोर
20
एकाच पत्नीचे १५ पती! इंग्लंडला पाठवण्यासाठी लढवली शक्कल, ऐकून पोलिसही थक्क झाले

श्रीकृष्ण गवई मृत्युप्रकरणी डॉक्टरांवर गुन्हे दाखल करा

By admin | Updated: July 12, 2014 00:42 IST

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणाने स्थानिक बेलपुरा येथील रहिवासी श्रीकृष्ण नामदेवराव गवई यांच्या मृत्युप्रकरणी संबंधित डॉक्टरांविरुद्ध गुन्हे दाखल करावे,...

अमरावती : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणाने स्थानिक बेलपुरा येथील रहिवासी श्रीकृष्ण नामदेवराव गवई यांच्या मृत्युप्रकरणी संबंधित डॉक्टरांविरुद्ध गुन्हे दाखल करावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहे. त्यामुळे गवई कुटुंबीयांना तब्बल १७ वर्षांनंतर न्याय मिळाला असून या डॉक्टरांच्या व्यवसायावर बंदी आणावी, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.६ सप्टेंबर १९९७ रोजी श्रीकृष्ण गवई यांचा इर्विनमध्ये डॉ. अविनाश चौधरी व डॉ. जयश्री इंगोले यांच्या हलगर्जीपणाने मृत्यू झाला होता. याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी भादंविच्या ३०४ (अ) अन्वये या दोन्ही डॉक्टरांवर गुन्हे नोंदविण्यात आले होते. मात्र न्यायालयात या डॉक्टरांविरुध्द खटला चालविण्यासाठी पोलिसांनी शासनाला परवानगी मागितली. परंतु राज्य शासनाने सतत टाळाटाळ केल्याने त्यावेळी मृताचे बंधू श्रीधर गवई यांनी उच्च न्यायालयात रीट पिटीशन दाखल करुन चौधरी व इंगोले यांच्यावर खटला चालविण्याची परवानगी मागितली. त्यानुसार राजापेठ पोलिसांनी श्रीकृष्ण गवईचे मृत्यू प्रकरण विद्यमान न्यायालयात दाखल केले. मात्र हे दोन्ही डॉक्टर धनाढ्य असल्याने न्यायालयात अनेक दिवस हे प्रकरण ताटकळत ठेवले. दरम्यान, जयश्री इंगोले यांना २०१० मध्ये सीआरपीसी २३९ च्या अंतर्गत गुन्ह्यात समाविष्ट करण्यात आल्यानंतरही न्यायालयात खटला न चालविता दोषमुक्त करण्यासाठी त्यांनी अर्ज सादर केला. एखादा प्रकरणात गुन्ह्यात समाविष्ट झाल्यानंतर पुराव्याशिवाय आरोपीस दोषमुक्त करता येत नाही, असा नियम आहे. तरिदेखील याप्रकरणी २०१२ मध्ये विद्यमान न्यायालयाने जयश्री इंगोले यांच्याविरुध्द निकाल दिला. याप्रकरणी साक्ष पुराव्यांचे समन्स साक्षीदारांना पाठविले. हे प्रकरण लांबणीवर टाकण्यासाठी या दोन्ही डॉक्टरांनी उच्च न्यायालयात या निकालाविरुध्द दाद मागितली. दरम्यान २५ लाखांच्या दिवाणी दावा दाखल केला. मात्र दिवाणी दाव्यामुळे क्रिमीनल केसचे महत्त्व संपून जाते. परिणामी मृताच्या भावाने दाव्याचे प्रकरण मागे घेत या दोन्ही डॉक्टरांना आरोपी बनविण्याचा चंग बांधला. हे प्रकरण उच्च न्यायालयात पिटीशन क्र.३५४/२०१२ नुसार सुरु राहिले. अखेर सर्व बाबी तपासून े१८/०६/२०१४ रोजी न्यायालयाने दोन्ही डॉक्टरांविरुध्द भादंविच्या ३०४ (अ) नुसार पोलीस कारवाई करु शकतात, असे आदेश दिले आहे. याप्रकरणी मृत श्रीकृष्ण गवई यांची बाजू जेमीनी कासट तर जयश्री इंगोले यांच्यातर्फे अनिल मार्डीकर मांडली. (प्रतिनिधी)