शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

जलसंधारणाकरिता वाठोडावासीयांचे श्रमदान

By admin | Updated: May 23, 2016 00:19 IST

तालुक्यात पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली. भूजल पातळी कमालीची खालावल्याने सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला.

वरूड : तालुक्यात पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली. भूजल पातळी कमालीची खालावल्याने सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. याकरिता पाणी फाउंडेशनच्यावतीने 'वॉटर कप' स्पर्धेकरिता विदर्भातून एकमेव वरूड तालुक्याची निवड करण्यात आली. यामध्ये ६६ पैकी ५३ ग्रामपंचायतींनी सक्रिय सहभाग नोंदविला. अभिनेता आमिर खान यांनी १५ दिवसांपूर्वी वाठोडा गावाला भेट देऊन श्रमदान केले. यामुळे ेनागरिकांमध्ये उत्साह संचारला आहे. आता १०० नागरीक नियमित श्रमदान करून बंधाऱ्यांची निर्मिती करीत आहेत. लोकसहभागातून जलसंधारणाची कामे करण्याकरिता २ लाख ५२ हजार रुपयांची लोकवर्गणी ग्रामपंचायतींकडे गोळा झाली. यातून जलसंधारणाची कामे ेकरण्यात येत आहेत. तालुक्यातील भूजल पातळी वाढविण्याकरिता श्रमदान आणि लोकसहभागातून जलसंधारणाच्या योजना राबविण्यात येत आहेत. पाणी फाऊंडेशनच्यावतीने सत्यजित भटकळ यांनी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेकरिता विदर्भातून वरूड तालुक्याची निवड केली. यामध्ये ६६ पैकी ५३ ग्रामपंचायतींनी सक्रिय सहभाग नोंदविला. नियमित १०० लोकांचा सहभाग याला मिळत आहे. गावातील नागरिकांचा उत्साह पाहून अभिनेता आमिर खान, जिल्हाधिकारी किरण गित्ते, उपविभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी, ठाणेदार अर्जुन ठोसरे यांनी श्रमदान करून लोकांना श्रमदानाचे महत्त्व पटवून दिले. श्रमदानाकरिता ग्रामपंचायत कार्यालयाचे पदाधिकारी, विदर्भ पटवारी संघ, महिला बचतगट, बजरंग दल, शिवछत्रपती क्रीडा प्रबोधिनी, समाजप्रबोधन मंच, जायन्टस ग्रुप, इंडियन मेडिकल असोसिएशन, पत्रकार संघ युवा जागर, युवक मंडळ, भजनी मंडळ, व्हॉलीबॉल संघ आदी सेवाभावी संघटना पुढे सरसावल्या असून गावांमध्ये जाऊन श्रमदान करीत आहेत. आर्थिक पाठबळ असावे म्हणून जलसंधारणाच्या कामाकरिता वाठोडा ग्रामस्थांनी २ लाख रुपये लोकवर्गणी जमा केली आहे. जसंधारणाची कामे पूर्ण करून गावातील भूजल पातळी वाढविण्याकरिता अभिनेता आमिरखान यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन श्रमदान निरंतर सुरू ठेवले आहे. नागरिकांंचा उत्साह पाहता नियमित १०० महिला-पुरुष श्रमदानाला जात असतात. गाडगेबाबा मंडळाने बांधले जनावरांसाठी पाणी टाके येथील गाडगेबाबा मंडळाचे अध्यक्ष गजानन भारसाकळे यांनी माहुली फाटयानजीक असलेल्या हॉटेल पारिजातजवळ मुक्या जनावरांसाठी पाण्याची सोय व्हावी, या दृष्टिकोनातून येथे मोठे टाके मागील अनेक वर्षांपासून तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी जंगलात गाई-म्हशी व इतर प्राण्यांना पाणी पिण्यासाठी कुठलीही सुविधा नाही. हे आ. प्रकाश भारसाकळे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी येथे शहानूर योजनेचे नळ कनेक्शन घऊन तो नळ टाक्यात सोडण्यात आले. या रस्त्याने ये-जा करणाऱ्या जनावरांची तहान या पाण्यामुळे भागविली जाते. त्यामुळे यातून बरीच सोय झाली आहे.