शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

बीटीच्या ‘त्या’ वाणाचा यंदाही तुटवडा, विशिष्ठ वाणाच्या बियाण्यांची मागणी नकोच, कृषी विभागाचे आवाहन

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: May 22, 2024 21:39 IST

शेतकरी सध्या पेरणीपूर्व मशागतीत व्यस्त आहे. जिल्ह्यात क्वचित ठिकाणी हंगामपूर्व कपाशीची लागवड होण्याची शक्यता आहे.

अमरावती : सर्व बियाण्यांचे गुणधर्म व उत्पादकता सारखीच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बीटी कपाशीच्या विशिष्ठ वाणांच्या बियाण्यांचा आग्रह धरू नये, बियाणे विकत घेताना एमआरपीपेक्षा अधिक रक्कम देऊ नये, बियाणे खरेदीची पक्की पावती घ्यावी, शिवाय बियाणे उपलब्ध असताना विक्रेता देत नसल्यास जवळच्या कृषी कार्यालयात तक्रार करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

शेतकरी सध्या पेरणीपूर्व मशागतीत व्यस्त आहे. जिल्ह्यात क्वचित ठिकाणी हंगामपूर्व कपाशीची लागवड होण्याची शक्यता आहे. मात्र लगतच्या जिल्ह्यातील काही परिसरात हंगामपूर्व लागवड होत असल्याने विशिष्ठ वाणाच्या बीटी बियाण्यांची मागणी वाढली आहे. या जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून हे लोण जिल्ह्यात पसरण्याची शक्यता आहे. मागच्या हंगामातदेखील असाच प्रकार झाला होता. प्रत्यक्षात सर्व बीटी बियाण्यांचे गुणधर्म व उत्पादकता सारखीच असल्याचे कृषी उपसंचालक उज्ज्वल आगरकर यांनी सांगितले.

जमिनीत पुरेसा म्हणजेच ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये. १६ मेपासून बियाणे जरी उपलब्ध होत असले तरी १ जूननंतरच कपाशीची लागवड करावी. पूर्वहंगामी कपाशी लागवडीने बोंडअळीचे जीवनचक्र खंडित होत नाही. त्यामुळे प्रादुर्भाव वाढून कपाशीचे नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे. यंदा बियाण्यांचा तुटवडा नाही, कपाशीच्या सर्व वाणाचे पुरेसे बियाणे पाकिटे उपलब्ध असल्याची माहिती आगरकर यांनी दिली.------------------------‘त्या’ वाणाच्या बियाण्यांचा यंदाही तुटवडाशेतकऱ्यांद्वारा विशिष्ट वाणाच्या बीटी बियाण्यांची मागणी केली जाते. कृषी विभागाने या वाणाच्या अडीच लाख पाकिटांची मागणी कंपनीकडे नोंदविली होती. प्रत्यक्षात २५ हजार पाकिटेच उपलब्ध होणार असल्याचे कंपनीने कळविले आहे. त्यामुळे हा तुटवडा भरून काढण्याचे आव्हान कृषी विभागासमोर उभे ठाकले आहे. १ जूननंतर पाऊस पडल्यानंतर बियाणे बाजारात गर्दी वाढणार आहे------------------------...तर विक्रेत्याचा परवाना होणार रद्दशेतकऱ्यांनी मागणी केलेले बियाणे उपलब्ध व साठा असताना जर विक्रेता देत नसेल तर त्यावर कारवाई होणार आहे शिवाय एमएसपीपेक्षा जास्त दराने विक्री केल्या असेल, पक्की पावती देत नसेल तर शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केल्यास चौकशीअंती कारवाई करून संबंधित विक्रेत्याचा परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले.-----------------------कपाशी बियाण्यांचा मुबलक साठा उपलब्ध आहे. सर्व वाणांचे गुणधर्म व उत्पादकता सारखीच आहे. शेतकऱ्यांनी कपाशीची लागवडीची गडबड करू नये. बियाणे असताना विक्रेता देत नसल्यास किंवा एमआरपीपेक्षा जास्त दर आकारल्यास तक्रार करावी.उज्ज्वल आगरकरकृषी उपसंचालक

टॅग्स :Farmerशेतकरी