शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

बीटीच्या ‘त्या’ वाणाचा यंदाही तुटवडा, विशिष्ठ वाणाच्या बियाण्यांची मागणी नकोच, कृषी विभागाचे आवाहन

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: May 22, 2024 21:39 IST

शेतकरी सध्या पेरणीपूर्व मशागतीत व्यस्त आहे. जिल्ह्यात क्वचित ठिकाणी हंगामपूर्व कपाशीची लागवड होण्याची शक्यता आहे.

अमरावती : सर्व बियाण्यांचे गुणधर्म व उत्पादकता सारखीच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बीटी कपाशीच्या विशिष्ठ वाणांच्या बियाण्यांचा आग्रह धरू नये, बियाणे विकत घेताना एमआरपीपेक्षा अधिक रक्कम देऊ नये, बियाणे खरेदीची पक्की पावती घ्यावी, शिवाय बियाणे उपलब्ध असताना विक्रेता देत नसल्यास जवळच्या कृषी कार्यालयात तक्रार करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

शेतकरी सध्या पेरणीपूर्व मशागतीत व्यस्त आहे. जिल्ह्यात क्वचित ठिकाणी हंगामपूर्व कपाशीची लागवड होण्याची शक्यता आहे. मात्र लगतच्या जिल्ह्यातील काही परिसरात हंगामपूर्व लागवड होत असल्याने विशिष्ठ वाणाच्या बीटी बियाण्यांची मागणी वाढली आहे. या जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून हे लोण जिल्ह्यात पसरण्याची शक्यता आहे. मागच्या हंगामातदेखील असाच प्रकार झाला होता. प्रत्यक्षात सर्व बीटी बियाण्यांचे गुणधर्म व उत्पादकता सारखीच असल्याचे कृषी उपसंचालक उज्ज्वल आगरकर यांनी सांगितले.

जमिनीत पुरेसा म्हणजेच ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये. १६ मेपासून बियाणे जरी उपलब्ध होत असले तरी १ जूननंतरच कपाशीची लागवड करावी. पूर्वहंगामी कपाशी लागवडीने बोंडअळीचे जीवनचक्र खंडित होत नाही. त्यामुळे प्रादुर्भाव वाढून कपाशीचे नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे. यंदा बियाण्यांचा तुटवडा नाही, कपाशीच्या सर्व वाणाचे पुरेसे बियाणे पाकिटे उपलब्ध असल्याची माहिती आगरकर यांनी दिली.------------------------‘त्या’ वाणाच्या बियाण्यांचा यंदाही तुटवडाशेतकऱ्यांद्वारा विशिष्ट वाणाच्या बीटी बियाण्यांची मागणी केली जाते. कृषी विभागाने या वाणाच्या अडीच लाख पाकिटांची मागणी कंपनीकडे नोंदविली होती. प्रत्यक्षात २५ हजार पाकिटेच उपलब्ध होणार असल्याचे कंपनीने कळविले आहे. त्यामुळे हा तुटवडा भरून काढण्याचे आव्हान कृषी विभागासमोर उभे ठाकले आहे. १ जूननंतर पाऊस पडल्यानंतर बियाणे बाजारात गर्दी वाढणार आहे------------------------...तर विक्रेत्याचा परवाना होणार रद्दशेतकऱ्यांनी मागणी केलेले बियाणे उपलब्ध व साठा असताना जर विक्रेता देत नसेल तर त्यावर कारवाई होणार आहे शिवाय एमएसपीपेक्षा जास्त दराने विक्री केल्या असेल, पक्की पावती देत नसेल तर शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केल्यास चौकशीअंती कारवाई करून संबंधित विक्रेत्याचा परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले.-----------------------कपाशी बियाण्यांचा मुबलक साठा उपलब्ध आहे. सर्व वाणांचे गुणधर्म व उत्पादकता सारखीच आहे. शेतकऱ्यांनी कपाशीची लागवडीची गडबड करू नये. बियाणे असताना विक्रेता देत नसल्यास किंवा एमआरपीपेक्षा जास्त दर आकारल्यास तक्रार करावी.उज्ज्वल आगरकरकृषी उपसंचालक

टॅग्स :Farmerशेतकरी