शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

बळीराजाला प्रतीक्षा एकाधिकार कापूस खरेदीची

By admin | Updated: November 4, 2014 22:33 IST

राज्य शासनाच्या कापूस एकाधिकार योजनेनुसार कापूस खरेदीला मुहूर्त गवसला नाही. मात्र ग्रामीण भागात काही ठिकाणी खासगी व्यापाऱ्यांनी कापसाच्या खरेदीस सुरूवात केली आहे.

अमरावती : राज्य शासनाच्या कापूस एकाधिकार योजनेनुसार कापूस खरेदीला मुहूर्त गवसला नाही. मात्र ग्रामीण भागात काही ठिकाणी खासगी व्यापाऱ्यांनी कापसाच्या खरेदीस सुरूवात केली आहे. यासाठी शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३६०० ते ३८०० रूपये दिले जात आहेत. शासनाने लांब स्टेपलच्या कापसाला चार हजार रूपये हमी भाव जाहीर केला आहे. मात्र प्रत्यक्ष खरेदी कशी सुरू होणार याची बळीराजाला प्रतीक्षा आहे. शहरातील खासगी जिनिंगवर अद्यापही कापसाची आवक सुरू झालेली नाही. शहरात असलेल्या विविध जिनिंगवर मागील वर्षी ५ हजार कापसाच्या गाठीचे उत्पादन करण्यात आले होते. कापसाला चांगला भाव मिळावा यासाठी राज्य शासनाकडून कापूस खरेदी योजना सुरू आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी केली जाते. मात्र या खरेदीचा मुहूर्त अद्याप निघाला नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पैश्याची गरज असलेल्या शेतकऱ्यांकडून निघालेला कापूस खासगी व्यापाऱ्यांना विकला जात आहे. कापसाची अद्याप वेचणी सुरूच आहे. अनेक शेतकऱ्यांनी कापसाची पेरणी उशीरानेच सुरू केली त्यामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पेरणी उशिरा झाली. कापसाचे पीक शेतकऱ्यांच्या घरात येऊ शकले नाही. तसेच मागील वर्षी दिवाळीही नोव्हेंबर महिन्यात आल्याने कापूस खरेदीचा शुभारंभ दिवाळीलाच करण्यात आला होता. परंतु यावर्षी दिवाळी आॅक्टोबरमध्ये आल्याने कापसाची खरेदी खासगी व्यापाऱ्यांकडून सुरू झाली आहे. तर काही भागात कापूस काढून झाला आहे. तरी कापसाचा भाव वाढण्याची अपेक्षा शेतकरी करत आहे. अमरावती जिल्ह्यात अद्याप तरी कॉटन कॉर्पोरेशन आॅफ इंडीया अर्थात सीसीआयतर्फे कापूस खरेदी सुरू झाली नसल्याची माहिती आहे. यावर्षी कापसाला प्रति क्विंटल ४५०० रूपये हमी भाव देण्यात येणार आहे.शासनाचे कापूस खरेदीबाबतचे धोरण अद्यापही स्पष्ट झाले नसल्यामुळे शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी शासकीय विक्री केंद्रे उपलब्ध झाली नाहीत. परिणामी आर्थिक अडचण दूर करण्यासाठी नाईलाजाने कापूस व्यापाऱ्यांना विकून आपले आर्थिक व्यवहार शेतकऱ्यांना भागवावे लागत आहे. (प्रतिनिधी)