शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
4
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
6
रामललाच्या अयोध्येत दिसणार रामायणातील आणखी २ व्यक्तिरेखा; ऑक्टोबर अखेरपर्यंत काम पूर्ण!
7
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
8
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
9
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
10
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
11
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
12
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
13
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
14
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
15
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
16
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
17
"ज्यांना नरकात जायचंय, त्यांनी 'गजवा-ए-हिंद'च्या नावावर..."; योगी आदित्यनाथांचा दंगेखोरांना इशारा
18
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
19
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
20
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."

धक्कादायक ; वऱ्हाडात दर आठ तासांनी शेतकरी आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 16:33 IST

यंदाच्या १०० दिवसांत म्हणजेच १० एप्रिलपर्यंत अमरावती विभागासह वर्धा जिल्ह्यात २९० शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास जवळ केला.

ठळक मुद्दे शंभर दिवसांत २९० शेतकऱ्यांनी कवटाळले मृत्यूला

गजानन मोहोड।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सलग दुष्काळ, नापिकी, यामुळे वाढलेले सावकारांचे व बँकांचे कर्ज, यासह अन्य कारणांमुळे शेतकऱ्यांच्या संघर्षावर नैराश्य मात करीत आहे. मुला-मुलींचे विवाह, शिक्षणाचा खर्च या विवंचनेत जगाचा पोशिंदा मृत्यूला कवटाळत आहे. यंदाच्या १०० दिवसांत म्हणजेच १० एप्रिलपर्यंत अमरावती विभागासह वर्धा जिल्ह्यात २९० शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास जवळ केला. वऱ्हाडात दर आठ तासांनी शेतकरी आत्महत्या होत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.शासकीय योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थी असणाऱ्या शेतकऱ्याला मिळत नाही. योजना राबविणारी यंत्रणाच पारदर्शीपणे अंमलबजावणी करीत नसल्याने खरा शेतकरी लाभापासून वंचित राहत आहे व दरवर्षी कजार्चा डोंगर वाढताच आहे. शासनस्तरावर एक जानेवारी २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद स्वतंत्रपणे ठेवण्यात येते. त्यानुसार अमरावती विभागासह वर्धा जिल्ह्यात आतापर्यंत १४ हजार ९८९ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. यामध्ये ६ हजार ७१८ प्रकरणे पात्र, ८ हजार ११९ अपात्र तर १५२ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. यंदा २९० शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, यामध्ये जानेवारी महिन्यात ९७ फेब्रुवारी ८२, मार्च ९२, तर १० एप्रिलपर्यंत १९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याचे वास्तव आहे.महसूल विभागाच्या निरीक्षण नोंदीनुसार सर्वाधिक ४५ टक्के आत्महत्या ह्या ३० ते ४० या वयोगटातील तरूण शेतकऱ्यांच्या आहेत. यामध्येही सर्वाधिक प्रमाण अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांचे आहे. यात दोन हेक्टरच्या आतील शेतकऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. शासनाच्या उपाय तोकडे ठरत असल्याने शेतकरी आत्महत्यामुक्त होण्यासाठी वरवरची मलमपट्टी नव्हे, तर दीर्घकालीन उपाययोजनांची आवश्यकता आहे.२००१ पासून १४,९८९ शेतकरी आत्महत्याविभागात १ जानेवारी २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची स्वतंत्र नोंद ठेवण्यात येते. त्यानुसार आतापर्यंत १४ हजार ९८९ शेतकºयांच्या आत्महत्या झाल्या आहेत. यामध्ये २०१७ मध्ये सर्वाधिक १,१७६, सन २०१६ मध्ये १,२३५,सन २०१५ मध्ये १,३४८, सन २०१४ मध्ये ९६४, सन २०१३ मध्ये ८०५, सन २०१२ मध्ये े९५१, सन २०११ मध्ये ९९९, सन २,०१० मध्ये १,१७७ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे.कर्जमाफीच्या ३१५ दिवसांत ९५२ आत्महत्याजून २०१७ मध्ये शासनाने कर्जमाफी जाहीर केली. तेव्हापासून आतापर्यंत म्हणजेच ३१५ दिवसांत ९५२ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. किंबहुना या काळात आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये जून महिन्यात ८२, जुलै ८९, आॅगस्ट ११९, सप्टेंबर १२१, आॅक्टोबर ९६, नोव्हेंबर ८८, डिसेंबर ६५, जानेवारी २०१८ मध्ये, ९७, फेब्रुवारी ८२, मार्च ९२ व १० एप्रिलपर्यंत १९ शेतकरी आत्महत्या झाल्याचे वास्तव आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या