शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
2
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
3
आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
4
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
5
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
6
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
7
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
8
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
9
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
10
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
11
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
12
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
13
३१४ लेखी तक्रारी, १२७ ई-मेल, ४१ जनहित याचिका; १३ वर्षांच्या उदासीनतेने ४७ अपघातांत ६८ बळी
14
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
15
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
16
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
17
IPL 2026 Player Trade Updates : टीम इंडियाच्या 'लाला'सोबत खेळताना दिसणार सचिन तेंडुलकरचा 'लाल'
18
उत्पत्ती एकादशी २०२५: नशिबात जे नाही तेही मिळवायचे असेल तर काय करावे? प्रेमानंद महाराजांनी दिले उत्तर
19
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
20
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ; वऱ्हाडात दर आठ तासांनी शेतकरी आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 16:33 IST

यंदाच्या १०० दिवसांत म्हणजेच १० एप्रिलपर्यंत अमरावती विभागासह वर्धा जिल्ह्यात २९० शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास जवळ केला.

ठळक मुद्दे शंभर दिवसांत २९० शेतकऱ्यांनी कवटाळले मृत्यूला

गजानन मोहोड।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सलग दुष्काळ, नापिकी, यामुळे वाढलेले सावकारांचे व बँकांचे कर्ज, यासह अन्य कारणांमुळे शेतकऱ्यांच्या संघर्षावर नैराश्य मात करीत आहे. मुला-मुलींचे विवाह, शिक्षणाचा खर्च या विवंचनेत जगाचा पोशिंदा मृत्यूला कवटाळत आहे. यंदाच्या १०० दिवसांत म्हणजेच १० एप्रिलपर्यंत अमरावती विभागासह वर्धा जिल्ह्यात २९० शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास जवळ केला. वऱ्हाडात दर आठ तासांनी शेतकरी आत्महत्या होत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.शासकीय योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थी असणाऱ्या शेतकऱ्याला मिळत नाही. योजना राबविणारी यंत्रणाच पारदर्शीपणे अंमलबजावणी करीत नसल्याने खरा शेतकरी लाभापासून वंचित राहत आहे व दरवर्षी कजार्चा डोंगर वाढताच आहे. शासनस्तरावर एक जानेवारी २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद स्वतंत्रपणे ठेवण्यात येते. त्यानुसार अमरावती विभागासह वर्धा जिल्ह्यात आतापर्यंत १४ हजार ९८९ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. यामध्ये ६ हजार ७१८ प्रकरणे पात्र, ८ हजार ११९ अपात्र तर १५२ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. यंदा २९० शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, यामध्ये जानेवारी महिन्यात ९७ फेब्रुवारी ८२, मार्च ९२, तर १० एप्रिलपर्यंत १९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याचे वास्तव आहे.महसूल विभागाच्या निरीक्षण नोंदीनुसार सर्वाधिक ४५ टक्के आत्महत्या ह्या ३० ते ४० या वयोगटातील तरूण शेतकऱ्यांच्या आहेत. यामध्येही सर्वाधिक प्रमाण अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांचे आहे. यात दोन हेक्टरच्या आतील शेतकऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. शासनाच्या उपाय तोकडे ठरत असल्याने शेतकरी आत्महत्यामुक्त होण्यासाठी वरवरची मलमपट्टी नव्हे, तर दीर्घकालीन उपाययोजनांची आवश्यकता आहे.२००१ पासून १४,९८९ शेतकरी आत्महत्याविभागात १ जानेवारी २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची स्वतंत्र नोंद ठेवण्यात येते. त्यानुसार आतापर्यंत १४ हजार ९८९ शेतकºयांच्या आत्महत्या झाल्या आहेत. यामध्ये २०१७ मध्ये सर्वाधिक १,१७६, सन २०१६ मध्ये १,२३५,सन २०१५ मध्ये १,३४८, सन २०१४ मध्ये ९६४, सन २०१३ मध्ये ८०५, सन २०१२ मध्ये े९५१, सन २०११ मध्ये ९९९, सन २,०१० मध्ये १,१७७ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे.कर्जमाफीच्या ३१५ दिवसांत ९५२ आत्महत्याजून २०१७ मध्ये शासनाने कर्जमाफी जाहीर केली. तेव्हापासून आतापर्यंत म्हणजेच ३१५ दिवसांत ९५२ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. किंबहुना या काळात आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये जून महिन्यात ८२, जुलै ८९, आॅगस्ट ११९, सप्टेंबर १२१, आॅक्टोबर ९६, नोव्हेंबर ८८, डिसेंबर ६५, जानेवारी २०१८ मध्ये, ९७, फेब्रुवारी ८२, मार्च ९२ व १० एप्रिलपर्यंत १९ शेतकरी आत्महत्या झाल्याचे वास्तव आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या