शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

धक्कादायक ; वऱ्हाडात दर आठ तासांनी शेतकरी आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 16:33 IST

यंदाच्या १०० दिवसांत म्हणजेच १० एप्रिलपर्यंत अमरावती विभागासह वर्धा जिल्ह्यात २९० शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास जवळ केला.

ठळक मुद्दे शंभर दिवसांत २९० शेतकऱ्यांनी कवटाळले मृत्यूला

गजानन मोहोड।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सलग दुष्काळ, नापिकी, यामुळे वाढलेले सावकारांचे व बँकांचे कर्ज, यासह अन्य कारणांमुळे शेतकऱ्यांच्या संघर्षावर नैराश्य मात करीत आहे. मुला-मुलींचे विवाह, शिक्षणाचा खर्च या विवंचनेत जगाचा पोशिंदा मृत्यूला कवटाळत आहे. यंदाच्या १०० दिवसांत म्हणजेच १० एप्रिलपर्यंत अमरावती विभागासह वर्धा जिल्ह्यात २९० शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास जवळ केला. वऱ्हाडात दर आठ तासांनी शेतकरी आत्महत्या होत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.शासकीय योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थी असणाऱ्या शेतकऱ्याला मिळत नाही. योजना राबविणारी यंत्रणाच पारदर्शीपणे अंमलबजावणी करीत नसल्याने खरा शेतकरी लाभापासून वंचित राहत आहे व दरवर्षी कजार्चा डोंगर वाढताच आहे. शासनस्तरावर एक जानेवारी २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद स्वतंत्रपणे ठेवण्यात येते. त्यानुसार अमरावती विभागासह वर्धा जिल्ह्यात आतापर्यंत १४ हजार ९८९ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. यामध्ये ६ हजार ७१८ प्रकरणे पात्र, ८ हजार ११९ अपात्र तर १५२ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. यंदा २९० शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, यामध्ये जानेवारी महिन्यात ९७ फेब्रुवारी ८२, मार्च ९२, तर १० एप्रिलपर्यंत १९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याचे वास्तव आहे.महसूल विभागाच्या निरीक्षण नोंदीनुसार सर्वाधिक ४५ टक्के आत्महत्या ह्या ३० ते ४० या वयोगटातील तरूण शेतकऱ्यांच्या आहेत. यामध्येही सर्वाधिक प्रमाण अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांचे आहे. यात दोन हेक्टरच्या आतील शेतकऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. शासनाच्या उपाय तोकडे ठरत असल्याने शेतकरी आत्महत्यामुक्त होण्यासाठी वरवरची मलमपट्टी नव्हे, तर दीर्घकालीन उपाययोजनांची आवश्यकता आहे.२००१ पासून १४,९८९ शेतकरी आत्महत्याविभागात १ जानेवारी २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची स्वतंत्र नोंद ठेवण्यात येते. त्यानुसार आतापर्यंत १४ हजार ९८९ शेतकºयांच्या आत्महत्या झाल्या आहेत. यामध्ये २०१७ मध्ये सर्वाधिक १,१७६, सन २०१६ मध्ये १,२३५,सन २०१५ मध्ये १,३४८, सन २०१४ मध्ये ९६४, सन २०१३ मध्ये ८०५, सन २०१२ मध्ये े९५१, सन २०११ मध्ये ९९९, सन २,०१० मध्ये १,१७७ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे.कर्जमाफीच्या ३१५ दिवसांत ९५२ आत्महत्याजून २०१७ मध्ये शासनाने कर्जमाफी जाहीर केली. तेव्हापासून आतापर्यंत म्हणजेच ३१५ दिवसांत ९५२ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. किंबहुना या काळात आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये जून महिन्यात ८२, जुलै ८९, आॅगस्ट ११९, सप्टेंबर १२१, आॅक्टोबर ९६, नोव्हेंबर ८८, डिसेंबर ६५, जानेवारी २०१८ मध्ये, ९७, फेब्रुवारी ८२, मार्च ९२ व १० एप्रिलपर्यंत १९ शेतकरी आत्महत्या झाल्याचे वास्तव आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या