शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

४६ हजार सिंचन विहिरींद्वारे शिवार समृद्ध! चार लाखांचे अनुदान

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: October 7, 2023 17:18 IST

जिल्हाधिकारी, सीईओंद्वारा जिल्ह्यासाठी टार्गेट निश्चित

अमरावती : पाऊस आता लहरी झाल्याने पावसाअभावी पीक हातचे जाऊ नये, याकरिता संरक्षित सिंचनाची उपलब्धी महत्वाची आहे. यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेचे स्वरूप व काही निकष बदलले आहे. या योजनेद्वारे जिल्ह्यात यंदा ४६,१५१ सिंचन विहिरी तयार करण्यात येणार आहे. यामध्ये एका विहिरीसाठी किमान चार लाखांचा खर्च मिळणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी व जि.प.चे सीईओ यांनी शुक्रवारी ग्रामपंचायतनिहाय उद्दिष्ट निश्चित केलेले आहे.

योजनेअंतर्गत एक सिंचन विहीर तयार करण्यासाठी ९०० अकुशल रोजगार लागतो. ग्रामीण भागातील जॉबकार्डधारक शेतकरी व शेतमजूर यांचा विकास व याद्वारे गुणवत्तापूर्वक मालमत्ता निर्माण करण्यासाठी मिशन महासंचालक मनरेगा यांच्याद्वारे उपजिल्हाधिकारी (रोहयो), उपमुख्य कार्यकारी अधिकारी (नरेगा) यांना दोन दिवसांचे प्रशिक्षण वनामती नागपूर १५ व १६ सप्टेंबरला घेण्यात आले व या संकल्पनेनुसार जिल्ह्यात सिंचन विहिरींचा आराखडा निश्चित करण्यात आलेला आहे.

प्रारूप अंदाजपत्रकानुसार एका सिंचन विहिरींसाठी चार लाखांचा खर्च येत आहे व यामध्ये कुशल व अकुशल खर्चाचे प्रमाण ६०:४० असे निर्धारित करण्यात आलेले आहे. त्यामुळे दरवर्षीच जिल्ह्यात हजारो सिंचन विहिरींची भर पडणार आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प