शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

‘शिवशाही’ केवळ वातानुकूलित, पण सुरक्षिततेचा अभाव; दुरुस्तीसाठी साहित्य मिळेना

By जितेंद्र दखने | Updated: April 18, 2023 18:17 IST

Amravati News एसटी महामंडळात दाखल झालेली वातानुकूलित शिवशाही बस सुविधांपेक्षा अपघात व आगीच्या घटनांमुळे जास्त चर्चेत आहे.

जितेंद्र दखने अमरावती : एसटी महामंडळात दाखल झालेली वातानुकूलित शिवशाही बस सुविधांपेक्षा अपघात व आगीच्या घटनांमुळे जास्त चर्चेत आहे. साडेचार वर्षांपूर्वी शिवशाही बससेवेत आल्यापासून होत असलेले अपघात, आगीचे सत्र थांबलेले नाही. गत काही दिवसांपूर्वीच अमरावती ते नागपूर मार्गावर प्रवासी घेऊन जाणारी शिवशाही बस जळून खाक झाली आहे, तर अमरावती विभागात गत दोन वर्षांत शिवशाही बसचे नऊ अपघात झाले आहेत.

या घटनेतील शिवशाही बसेस एसटी महामंडळाच्या मालकीच्या आहेत. असे असतानाही शिवशाही बसेसची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे. अनेक बसेसची वेळेवर मेंटेनन्सची कामे होत नाही. याशिवाय प्रशिक्षित मेकॅनिकलचा अभाव आहे. नादुरुस्त असलेल्या बसेसला वेळेवर आवश्यक साहित्य उलपब्ध होत नसल्याने आजही अमरावती विभागातील ४५ शिवशाही बसेसपैकी ३० गाड्यांचा रस्त्यावर धावत आहेत, तर १५ बसेस नादुरुस्त असल्याने आगारात उभ्या आहेत. महामंडळाला उपलब्ध असलेल्या शिवशाही बसगाड्यांमधील सुरक्षिततेच्या अभावामुळे गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

एसटी महामंडळाने जून २०१७ मध्ये शिवशाही या वातानुकूलित बस दाखल केल्या. यात स्वमालकीच्या बसचा समावेश आहे. प्रवाशांच्या सेवेत आल्यानंतर शिवशाहीला प्रथम अपघातांनी गालबोट लागले. आजघडीला अपघात घटले तरी त्याला पूर्णपणे आळा बसला नाही. सुरुवातील बसेसमध्ये प्रवाशांच्या सोईसाठी एसी, सीसीटीव्ही कॅमेरे, सुसज्ज आसनव्यवस्था, सुरक्षिततेसाठी अग्निरोधक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्या होत्या. मात्र या बसेसमधील सोयी-सुविधांचा अल्पावधीत बोजवारा उडाला आहे. शिवशाही बसेस नादुरुस्त असल्यास या बसेसला आवश्यक असलेले साहित्य वेळेवर उपलब्ध होत नाही. याशिवाय शिवशाही वातानुकूलित असल्याने मेन्टेनन्स जास्त ठेवावे लागते. यासोबतच वायरिंग मोठ्या प्रमाणात केलेली असते. परिणामी वेळेवर मेन्टेनन्स केले नाही तर बसेस जळण्याची जास्त शक्यता असते. असे असताना तज्ज्ञ मेकॅनिकल व आवश्यक देखभाल दुरुस्तीचे साहित्य उपलब्ध होत नसल्याने शिवशाहीचा गारेगार प्रवास हा डोकेदुखी ठरू लागला आहे.स्वमालकीच्या बसेस त्यातही नादुरुस्तअमरावती विभागात ४५ शिवशाही बसेस स्वमालकीच्या आहेत. मात्र ४५ पैकी १५ बसेस आजही नादुरुस्त आहेत. या बसेसला दुरुस्तीसाठी लागणारे मटेरियल वेळेवर उपलब्ध होत नाही. त्यामुळे शिवशाही बसेसची चाके थांबलेली आहेत.मेकॅनिक आहेत, पण साहित्य नाहीशिवशाही बस ही १२ टन एवढ्या वजनाची आहे. या गाड्यांची सर्व यंत्रणा ही अत्याधुनिक असल्याने गाड्यांमध्ये तांत्रिक बिघाड झाला तर यासाठी महामंडळाच्या वर्कशॉपमधील मेकॅनिकला प्रशिक्षण देऊन गाड्या दुरुस्त केल्या जातात. मात्र गाड्या दुरुस्त करताना लागणारे आवश्यक साहित्य हे वेळेवर उपलब्ध होत नाही. यामुळे बसेस दुरुस्त करताना अडचणी आहेत.

विभागात ४५ शिवशाही बसेस पैकी ३० बसेस प्रवासी सेवेत आहेत. १५ बसेस विविध कारणांमुळे बंद आहेत. त्या दुरुस्तीसाठी आवश्यक साहित्याकरिता पाठपुरावा सुरू आहे. दुरुस्तीसाठी प्रशिक्षित मेकॅनिकलची चमू आहे. विभागातील ३० शिवशाही आज चांगल्या स्थितीत आहे. उर्वरित बसेस सुस्थितीत करण्याचे काम सुरू आहे. नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक

टॅग्स :Shivshahiशिवशाही