शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

‘शिवाजी’त रंगणार ‘विकास’ विरुद्ध ‘प्रगती’मध्ये सामना; ‘देशमुख राज’ की ‘ठाकरे शाही’? सप्टेंबरमध्ये होणार निर्णय

By गणेश वासनिक | Updated: July 22, 2022 10:38 IST

गत पाच वर्षांत मांडीला मांडी लावून बसणारे संस्थेचे विद्यमान अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख आणि उपाध्यक्ष नरेशचंद्र ठाकरे दाेघेही परममित्र आता अध्यक्षपदाच्या खुर्चीसाठी राजकीय वैरी झाल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देआजीवन सदस्यांची आतापासून मनधरणी सुरू

गणेश वासनिक

अमरावती : राज्यात ‘रयत’नंतर दुसऱ्या क्रमांकाची शिक्षण संस्था म्हणून नावारूपास आलेल्या अमरावती येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेची पंचवार्षिक निवडणूक येत्या सप्टेंबर महिन्यात होण्याची चिन्हे आहेत. या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असते. त्या अनुषंगाने विकास आणि प्रगती अशा दोन पॅनलची घोषणा झाली आहे. मात्र, गत पाच वर्षांत मांडीला मांडी लावून बसणारे संस्थेचे विद्यमान अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख आणि उपाध्यक्ष नरेशचंद्र ठाकरे दाेघेही परममित्र आता अध्यक्षपदाच्या खुर्चीसाठी राजकीय वैरी झाल्याचे चित्र आहे. ‘विकास’ची धुरा नरेशचंद्र ठाकरे यांच्याकडे, तर ‘प्रगती’चे नेतृत्व हर्षवर्धन देशमुख हे करणार आहेत.

देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्याद्वारा स्थापित ‘शिवाजी’ संस्थेचे कालांतराने शिवपरिवारात रूपांतर झाले. अमरावती, अकोला, बुलडाणा, वर्धा, वाशिम, नागपूर, आदी जिल्ह्यांमध्ये या संस्थेने शाळा, महाविद्यालयांच्या रूपात जाळे विणले आहे. ‘शिवाजी’ची संस्थापक घटनादेखील वेगळी आहे. आजीवन सभासदांमधूनच पंचवार्षिक कार्यभारासाठी अध्यक्ष, तीन उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष, तर चार कार्यकारिणी सदस्यांसाठी निवडणूक घेण्यात येते. खरे तर ‘शिवाजी’चे आजीवन सभासद हे एकमेकांचे स्नेही, नातेवाईक असल्याचे बोलले जाते.

मात्र, यावेळी निवडणूक वेगळ्या वळणावर जाणार असल्याचे संकेत आहेत. ठाकरे विरुद्ध देशमुख? असा हा सामना रंगणार असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते; परंतु, दोन्ही पॅनलचे राजकीय अस्तित्व हे अमरावती येथे सर्वाधिक मतदार असलेल्या आजीवन सभासदांवर अवलंबून राहणार आहे. त्यामुळे ‘शिवाजी’त सप्टेंबर महिन्यात ‘ठाकरे शाही’ की ‘देशमुख राज’? कोण सत्तास्थानी असेल, हे निश्चित होईल.

नरेशचंद्र ठाकरे का वेगळे झाले?

श्री शिवाजी शिक्षण संस्थेत उपाध्यक्ष असलेले माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे हे हर्षवर्धन देशमुख यांच्यापासून का वेगळे झाले? हाच चर्चेचा विषय सध्या आजीवन सभासदांमध्ये रंगत आहे. नेमकी कुठे माशी शिंकली? याचाही शोध आता आजीवन सभासद घेत आहेत. देशमुख आणि ठाकरे यांच्यात राजकीय, वैचारिक मतभेद असू शकतात; पण गत पाच वर्षे दोघेही सोबत होते. अचानक शेवटच्या क्षणी ठाकरे यांनी वेगळी चूल का मांडण्याचा विचार केला, यात बरेच काही दडले आहे. त्यामुळे ‘शिवाजी’त ‘देखो आगे-आगे होता है क्या?’ असे बोलले जात आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणAmravatiअमरावती