शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
3
पाकिस्तानशी मोठी डील करून डोनाल्ड ट्रम्प यांचा दुहेरी निशाणा; भारतासह चीनलाही दिला संदेश?
4
बाजारात मोठी घसरण! निफ्टी अडीच टक्क्यांहून अधिक खाली, अदानी-टाटांना सर्वाधिक फटका
5
२५% टॅरिफवर भडकले भारतीय व्यावसायिक; कोणी दिला ट्रम्प यांना अमेरिकन सामानावर बहिष्काराचा इशारा?
6
IPL 2026: केएल राहुल बनणार कर्णधार, २५ कोटीही मिळणार? 'या' संघाबद्दल रंगलीये चर्चा
7
व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील
8
अंतराळ क्षेत्रात एन्ट्री करण्याच्या तयारीत मुकेश अंबानींची रिलायन्स; 'या' कंपनीत मोठी गुंतवणूक करणार
9
आमिर-जुनैदनं रिक्रिएट केला 'अंदाज अपना अपना' मधील आयकॉनिक सीन, पाहा मजेशीर VIDEO
10
आज शितला सप्तमीच्या मुहूर्तावर सुरु करा रोज ५ मिनिटं शेगडी पूजन; अन्नपूर्णा होईल प्रसन्न!
11
"भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी’’, एकनाथ शिंदेंची काँग्रेसवर टीका   
12
Video: विचित्र घटना; 'मौत का कुआं'मध्ये तरुण कोसळला; बाईक रायडरशिवाय तासभर धावत राहिली
13
चमत्कार! "मी वर तरंगत होते अन् माझं शरीर..."; १७ मिनिटांचा 'मृत्यू', महिलेसोबत काय घडलं?
14
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
15
तूर्त अभय! माणिकराव कोकाटेंना शनिदेवच पावला; अजित पवारांनी सुनावले, पण मंत्रीपद कायम ठेवले
16
IND vs ENG 5th Test India Playing XI : करुण नायरला 'वन मोअर चान्स'; टीम इंडियात ४ बदल
17
"काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी..."; मालेगाव निकालावर CM फडणवीसांचं रोखठोक मत
18
हवेतच हेलकावे खाऊ लागले विमान, प्रवाशांचे प्राण संकटात, कर्मचाऱ्यांचा उडाला थरकाप, अखेर...
19
रतन टाटांच्या काळात जे घडलं नाही, ते आता घडणार; 'हा' मोठा ग्रुप टाटा सन्स सोडणार?
20
Gold Silver Price 31 July 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर

‘शिवाजी’त रंगणार ‘विकास’ विरुद्ध ‘प्रगती’मध्ये सामना; ‘देशमुख राज’ की ‘ठाकरे शाही’? सप्टेंबरमध्ये होणार निर्णय

By गणेश वासनिक | Updated: July 22, 2022 10:38 IST

गत पाच वर्षांत मांडीला मांडी लावून बसणारे संस्थेचे विद्यमान अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख आणि उपाध्यक्ष नरेशचंद्र ठाकरे दाेघेही परममित्र आता अध्यक्षपदाच्या खुर्चीसाठी राजकीय वैरी झाल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देआजीवन सदस्यांची आतापासून मनधरणी सुरू

गणेश वासनिक

अमरावती : राज्यात ‘रयत’नंतर दुसऱ्या क्रमांकाची शिक्षण संस्था म्हणून नावारूपास आलेल्या अमरावती येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेची पंचवार्षिक निवडणूक येत्या सप्टेंबर महिन्यात होण्याची चिन्हे आहेत. या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असते. त्या अनुषंगाने विकास आणि प्रगती अशा दोन पॅनलची घोषणा झाली आहे. मात्र, गत पाच वर्षांत मांडीला मांडी लावून बसणारे संस्थेचे विद्यमान अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख आणि उपाध्यक्ष नरेशचंद्र ठाकरे दाेघेही परममित्र आता अध्यक्षपदाच्या खुर्चीसाठी राजकीय वैरी झाल्याचे चित्र आहे. ‘विकास’ची धुरा नरेशचंद्र ठाकरे यांच्याकडे, तर ‘प्रगती’चे नेतृत्व हर्षवर्धन देशमुख हे करणार आहेत.

देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्याद्वारा स्थापित ‘शिवाजी’ संस्थेचे कालांतराने शिवपरिवारात रूपांतर झाले. अमरावती, अकोला, बुलडाणा, वर्धा, वाशिम, नागपूर, आदी जिल्ह्यांमध्ये या संस्थेने शाळा, महाविद्यालयांच्या रूपात जाळे विणले आहे. ‘शिवाजी’ची संस्थापक घटनादेखील वेगळी आहे. आजीवन सभासदांमधूनच पंचवार्षिक कार्यभारासाठी अध्यक्ष, तीन उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष, तर चार कार्यकारिणी सदस्यांसाठी निवडणूक घेण्यात येते. खरे तर ‘शिवाजी’चे आजीवन सभासद हे एकमेकांचे स्नेही, नातेवाईक असल्याचे बोलले जाते.

मात्र, यावेळी निवडणूक वेगळ्या वळणावर जाणार असल्याचे संकेत आहेत. ठाकरे विरुद्ध देशमुख? असा हा सामना रंगणार असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते; परंतु, दोन्ही पॅनलचे राजकीय अस्तित्व हे अमरावती येथे सर्वाधिक मतदार असलेल्या आजीवन सभासदांवर अवलंबून राहणार आहे. त्यामुळे ‘शिवाजी’त सप्टेंबर महिन्यात ‘ठाकरे शाही’ की ‘देशमुख राज’? कोण सत्तास्थानी असेल, हे निश्चित होईल.

नरेशचंद्र ठाकरे का वेगळे झाले?

श्री शिवाजी शिक्षण संस्थेत उपाध्यक्ष असलेले माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे हे हर्षवर्धन देशमुख यांच्यापासून का वेगळे झाले? हाच चर्चेचा विषय सध्या आजीवन सभासदांमध्ये रंगत आहे. नेमकी कुठे माशी शिंकली? याचाही शोध आता आजीवन सभासद घेत आहेत. देशमुख आणि ठाकरे यांच्यात राजकीय, वैचारिक मतभेद असू शकतात; पण गत पाच वर्षे दोघेही सोबत होते. अचानक शेवटच्या क्षणी ठाकरे यांनी वेगळी चूल का मांडण्याचा विचार केला, यात बरेच काही दडले आहे. त्यामुळे ‘शिवाजी’त ‘देखो आगे-आगे होता है क्या?’ असे बोलले जात आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणAmravatiअमरावती