शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

‘शिवाजी’त रंगणार ‘विकास’ विरुद्ध ‘प्रगती’मध्ये सामना; ‘देशमुख राज’ की ‘ठाकरे शाही’? सप्टेंबरमध्ये होणार निर्णय

By गणेश वासनिक | Updated: July 22, 2022 10:38 IST

गत पाच वर्षांत मांडीला मांडी लावून बसणारे संस्थेचे विद्यमान अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख आणि उपाध्यक्ष नरेशचंद्र ठाकरे दाेघेही परममित्र आता अध्यक्षपदाच्या खुर्चीसाठी राजकीय वैरी झाल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देआजीवन सदस्यांची आतापासून मनधरणी सुरू

गणेश वासनिक

अमरावती : राज्यात ‘रयत’नंतर दुसऱ्या क्रमांकाची शिक्षण संस्था म्हणून नावारूपास आलेल्या अमरावती येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेची पंचवार्षिक निवडणूक येत्या सप्टेंबर महिन्यात होण्याची चिन्हे आहेत. या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असते. त्या अनुषंगाने विकास आणि प्रगती अशा दोन पॅनलची घोषणा झाली आहे. मात्र, गत पाच वर्षांत मांडीला मांडी लावून बसणारे संस्थेचे विद्यमान अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख आणि उपाध्यक्ष नरेशचंद्र ठाकरे दाेघेही परममित्र आता अध्यक्षपदाच्या खुर्चीसाठी राजकीय वैरी झाल्याचे चित्र आहे. ‘विकास’ची धुरा नरेशचंद्र ठाकरे यांच्याकडे, तर ‘प्रगती’चे नेतृत्व हर्षवर्धन देशमुख हे करणार आहेत.

देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्याद्वारा स्थापित ‘शिवाजी’ संस्थेचे कालांतराने शिवपरिवारात रूपांतर झाले. अमरावती, अकोला, बुलडाणा, वर्धा, वाशिम, नागपूर, आदी जिल्ह्यांमध्ये या संस्थेने शाळा, महाविद्यालयांच्या रूपात जाळे विणले आहे. ‘शिवाजी’ची संस्थापक घटनादेखील वेगळी आहे. आजीवन सभासदांमधूनच पंचवार्षिक कार्यभारासाठी अध्यक्ष, तीन उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष, तर चार कार्यकारिणी सदस्यांसाठी निवडणूक घेण्यात येते. खरे तर ‘शिवाजी’चे आजीवन सभासद हे एकमेकांचे स्नेही, नातेवाईक असल्याचे बोलले जाते.

मात्र, यावेळी निवडणूक वेगळ्या वळणावर जाणार असल्याचे संकेत आहेत. ठाकरे विरुद्ध देशमुख? असा हा सामना रंगणार असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते; परंतु, दोन्ही पॅनलचे राजकीय अस्तित्व हे अमरावती येथे सर्वाधिक मतदार असलेल्या आजीवन सभासदांवर अवलंबून राहणार आहे. त्यामुळे ‘शिवाजी’त सप्टेंबर महिन्यात ‘ठाकरे शाही’ की ‘देशमुख राज’? कोण सत्तास्थानी असेल, हे निश्चित होईल.

नरेशचंद्र ठाकरे का वेगळे झाले?

श्री शिवाजी शिक्षण संस्थेत उपाध्यक्ष असलेले माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे हे हर्षवर्धन देशमुख यांच्यापासून का वेगळे झाले? हाच चर्चेचा विषय सध्या आजीवन सभासदांमध्ये रंगत आहे. नेमकी कुठे माशी शिंकली? याचाही शोध आता आजीवन सभासद घेत आहेत. देशमुख आणि ठाकरे यांच्यात राजकीय, वैचारिक मतभेद असू शकतात; पण गत पाच वर्षे दोघेही सोबत होते. अचानक शेवटच्या क्षणी ठाकरे यांनी वेगळी चूल का मांडण्याचा विचार केला, यात बरेच काही दडले आहे. त्यामुळे ‘शिवाजी’त ‘देखो आगे-आगे होता है क्या?’ असे बोलले जात आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणAmravatiअमरावती