शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

आश्रमाने का लपविले सत्य ?

By admin | Updated: August 26, 2016 00:14 IST

प्रथमेश सगणे आणि अजय वणवे या आश्रम हद्दीतील वसतिगृहात वास्तव्याला असलेल्या विद्यार्थ्यांवर झालेल्या नरबळीसाठीच्या

संशय बळावणारी चुप्पी : व्यवस्थापन, शंकर महाराजांनी का दिली नाही पोलीस तक्रार ?अमरावती : प्रथमेश सगणे आणि अजय वणवे या आश्रम हद्दीतील वसतिगृहात वास्तव्याला असलेल्या विद्यार्थ्यांवर झालेल्या नरबळीसाठीच्या हल्ल्यानंतर आश्रमाने प्रशासन आणि पालकांना खोटी माहिती का दिली? आश्रम पदाधिकाऱ्यांचा त्यामागील उद्देश काय, हे रहस्य उलगडणे महत्त्वपूर्ण आहे. प्रथमेशवर जीवघेणा हल्ला झाला. आश्रमातच त्याचा गळा कापला गेला. घडलेला प्रकार कोणीतरी मुद्दामच केलेला असल्याची पूर्ण जाणीव असतानाही आश्रमातील पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिशाभूल करणारी माहिती दिली. प्रथमेशला अमरावती येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले त्यावेळी प्रथमेशच्या गळ्यावर असलेले वार हे अपघाताच्या जखमा असल्याचा बनाव आश्रम पदाधिकाऱ्यांनी केला. येथे दोन मुद्दे उपस्थित होतात- आश्रमाला घटनेबाबत कल्पना असतानाही ती लपविण्याचा उद्देश काय? आश्रमाला घटनेबाबत कल्पना नसल्याचे, गळ्यावर दिसणारी जखम कशाची आहे याबाबतची नेमकी माहिती नसल्याचे गृहीत धरले तर - जखम कशाने झाली याबाबत आम्ही अनभिज्ञ आहोत, अशी माहिती आश्रमाच्यावतीने वैद्यकीय अधिकारी आणि पोलीस प्रशासनाला देता आली असती. त्याही पुढे जाऊन जखमा कशामुळे झाल्यात हे समजवून घेऊन प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्नदेखील आश्रमाला करता आला असता. डॉक्टरांच्या ‘त्या’ निरीक्षणांच्या उल्लेखासह पोलीस तक्रारही नोंदविता आली असती. आश्रमाने असे काहीच केले नाही. ३० जुलैच्या मध्यरात्रीनंतर अजय वणवे या पाचवीतील मुलाचा वसतिगृहात चेहरा आणि डोके ठेचण्यात आले. त्याला पहाटे इलाजासाठी हलविले गेले. अजयसोबत घडलेली घटना वसतिगृहात घडली असल्याचे आश्रम पदाधिकाऱ्यांना पूर्णपणे ठाऊक होते. अजयला त्यांनी वसतिगृहातच रक्तबंबाळ आणि बेशुद्धावस्थेत बघितले होते. तथापि घटनेची सत्यस्थिती लपवून अजयच्या आईला आश्रमातील पदाधिकाऱ्यांनी खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती स्वत:हून दिली. अजय स्वच्छतागृहात पडल्याचे त्यांनी किरण वणवे यांना सांगितले. नवऱ्यापासून विभक्त झाल्यावर ज्या माऊलीने काळजाचा तुकडा अतिव विश्वासाने शंकर महाराज आश्रम ट्रस्टद्वारा संचालित शाळा-वसतिगृहात ठेवला, त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न तर होतोच; शिवाय त्या माऊलीशी बोलताना आश्रमातीलच लोक धादांत खोटे बोलतात. लोककल्याणासाठी, विश्वशांतीसाठी कार्य करणाऱ्या कुण्याही धर्म संस्थेला शोभावे, असे हे वर्तन आणि कृत्य नाहीच. शासकीय वसतिगृहाच्या अखत्यारित कुण्या विद्यार्थ्यावर असा जीवघेणा हल्ला झाल्यानंतर ती माहिती शासनापासून, प्रशासनापासून जाणीवपूर्वक लपवून ठेवणे हा गंभीर गुन्हा ठरतो. आश्रमातील पदाधिकाऱ्यांनी हा गुन्हा केला आहे. द्या ना लोकांना माहिती !पिंपळखुटा आश्रमात दोन विद्यार्थ्यांवर नरबळीचा प्रयत्न झाला. या आश्रमात लोककल्याणाची कामे चालतात, असा लोकांचा दृष्टिकोन आहे. संगणक युगात नरबळीच्या प्रयत्नाच्या घटना आश्रमात घडतात. तेथे सुशिक्षित लोकांचा भक्त, पदाधिकारी या नात्याने वावर असतो. स्वत: शंकर महाराज यांचेही तेथे वास्तव्य असते. भयंकर घटनेनंतर आश्रमाची भूमिका लोकांसमोर मांडण्यात का आली नाही ? काय घडले, हे जाणून घेणे, लोकांचा अधिकार आहे. पत्रपरिषद घेऊन आश्रमाने सत्य का सांगितले नाही ? शंकर महाराज हे आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांची भूमिका का जाहीर करण्यात आली नाही ? मीडियाला आश्रमाची बाजू कळविण्यासाठी प्रवक्त्याची नियुक्ती करणे हे आश्रमाचे कर्तव्य ठरते. परंतु त्याऐवजी मीडियाविरुद्ध रोष व्यक्त करण्यात आला. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात अशा संशयास्पद गोपनियतेचा अट्टाहास का ?बोलू लागले लोकआश्रमात घडलेल्या नरबळी प्रकरणाबाबत लोक उत्स्फूर्तपणे व्यक्त होऊ लागले आहेत. नाना प्रतिक्रिया पत्रांद्वारे प्राप्त झाल्या आहेत. आश्रमाबाबतचे अनेक आश्चर्यकारक अनुभव लोकांनी ‘लोकमत’ला लिहून पाठविले आहेत. तुम्हीही लिहू शकता. पत्ता आहे : ‘लोकमत’, विभागीय क्रीडा संकुल, मोर्शी रोड, शिवाजीनगर, अमरावती - ४४४६०३