शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

धुक्याची चादर... पाऊस अन्‌ गारपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2021 05:00 IST

जिल्ह्यात सकाळपासून धुके अन्  ढगाळ वातावरण होते. दुपारी मात्र, काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला यामध्ये अचलपूर्- परतवाडा व मोर्शी तालुक्यात अंबाडा येथे हरभऱ्याएवढी गार पडली. यामुळे संत्र्याचे फळाला मार लागल्याने फळगळ होण्याची शक्यता आहे. याशिवाय भाजीपाला पिकाचेही नुकसान झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभर धुके, हलका पाऊस व काही ठिकाणी गारपीट झाली. सायंकाळनंतर पुन्हा रात्री पावसाने हजेरी लावली. ढगाळ वातावरण तुरीसह, हरभऱ्याला बाधक आहे याशिवाय गारपीटमुळे भाजीपाला व फळपिकांचे नुकसान होत आहे. ३० डिसेंबरपर्यत ही स्थिती कायम राहणार आहे. जिल्ह्यात सकाळपासून धुके अन्  ढगाळ वातावरण होते. दुपारी मात्र, काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला यामध्ये अचलपूर्- परतवाडा व मोर्शी तालुक्यात अंबाडा येथे हरभऱ्याएवढी गार पडली. यामुळे संत्र्याचे फळाला मार लागल्याने फळगळ होण्याची शक्यता आहे. याशिवाय भाजीपाला पिकाचेही नुकसान झाले आहे.धामणगाव तालुक्यात सकाळपासून ढगाळ वातवरण होते. अंजनसिंगी येथे दुपारनंतर विजेच्या कडकडाटात हलक्या पावसाची नोंद झाली. बडनेरात दुपारनंतर रिमझिम पाऊस पडला. अंजनगाव सुर्जी तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. मोर्शी तालुक्यात हिवरखेडलाही पाऊस झाला. जरुड, आसेगाव पूर्णा येथे सकाळपासून ढगाळ वातावरण होते. चिखलदरा, धारणी तालुक्यासह मुक्तागिरी व बहिरम येथेही पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सर्वत्रच धुके व ढगाळ वातावरण असल्याने तूर व हरभरा पिकावर शेंगा व घाटे पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.

तळेगाव दशासरला वीज पडून मृत्यूधामणगाव रेल्वे तालुक्यात मंगळवारी वीज पडून ४२ वर्षीय गजानन बापूराव मेंढे या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. निमगव्हान मार्गावरील शेतातून ते दुचाकीने शेतातून घरी येत असतांना वीजेच्या कडकडाटात पावसाला सुरुवात झाली. याचवेली गुटकी नाल्याजवळ अंगावर वीज पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यापश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी आहे. 

नांदगाव तालुक्यात पावसासह गारपीटतालुक्यात मंगळवारी दुपारी ३ च्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. पहूर, कणी मिर्झापूर परिसरात तुरीच्या आकाराची गारपीट झाल्याने कांदा, फुलोरा अवस्थेत असलेल्या हरभरा पिकाचे नुकसान झाल्याचे पहूर येथील शेतकरी पद्माकर भेंडे यांनी सांगितले. शिवणी रसुलापूर, शिंगणापूर, चिखली परिसरात विजेच्या कडकडाटासह बोराच्या आकाराची गारपीट झाल्याचे शिवणी येथील चंद्रशेखर वैद्य महाराज यांनी सांगितले. 

गाडेगाव-टेमणी शिवारात पाऊस, गारवरूड तालुक्यातील गाडेगाव-टेमणी शिवारात सकाळी ११ च्या सुमारास काळेकुट्ट ढग दाटून पावसाला सुरुवात झाली. पाऊस सुरू असतानाच हलकीशी गार पडली. पावसाने रस्ते ओलेचिम्ब झाले आहेत. रब्बी हंगामातील पिकांना या पावसाचा फायदा होत असला तरी वेचणीस आलेला कापूस पाण्यात भिजला.  

सकाळी नऊपर्यत वाहनांचे लाईट सुरुशहरात पहाटेपासून धुके नागरिकांनी अनुभवले. सकाळी ९ -१० पर्यत रस्त्यावरील वाहनांचे दिवे सुरू होते. एवढे दाट धुळे असण्याची ही यंदाची पहिलीच वेळ आहे. वातावरणात गारवाही असल्याने नागरिक उबदार कपड्यांनीच बाहेर पडले. दुपारी चारच्या सुमारास १५ मिनिटांपर्यत हलक्या पावसाची नोंद झाली. त्यामुळे नागरिकांची तारांबळ झाली तरी बच्चेकंपनीने मात्र पावसाचा आनंद घेतला

चिखलदऱ्यात क्षणातच पसरतात पांढरे शुभ्र धुके

विदर्भाची काश्मीर म्हणून ओळख असलेल्या चिखलदऱ्यात वातावरणात क्षणात बदल होतात. पावसाच्या सरी आणि पांढरे शुभ्र धुके पसरते. येणाऱ्या पर्यटकांसाठी हे आकर्षणाचे केंद्र ठरते. विविध पॉईंटवरील रस्ते दाट धुक्यात हरवल्याने वाहनांच्या दिव्यांच्या प्रकाशात प्रवास करताना वेगळा अनुभव पर्यटकांना येथे येत आहे. थर्टी फर्स्टसाठी योग्य माहोल तयार झाल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. 

कुठे मुसळधार कुठे रिमझिम, 

- चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा, आसेगाव पूर्णा घाटलाडकी, ब्राह्मणवाडा थडी, देऊरवाडा, करजगाव, गोविंदपूर, कुऱ्हा देशमुख परिसरात तुफान पाऊस व  गारपीट झाली. यामुळे संत्रा, कापूस, मिरची, हरभरा, गहू उत्पादकांना नुकसानाची चिंता भेडसावत आहे. अंजनगाव सुर्जी येथे सायंकाळी ५ वाजता गडगडाटासह रिमझिम पावसाला सुरुवात झाली. पुसला परिसरात कमी जाडीची गार कोसळली. - तिवसा तालुक्यातील शेंदोळा खुर्द परिसरात रिमझिम पावसाने हजेरी लावली. जरूडमध्ये ढगाळ वातावणामुळे वातावरणातील आर्द्रता वाढली. - भातकुली शहरासह तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर, टाकरखेडा संभू येथे पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.- चांदूर रेल्वे येथे पावसाच्या सरी बरसल्या. पावसाळी वातावरण तयार झाल्याने शेतकऱ्यांनी शेतातून काढता पाय घेतला. तूर सोंगण्याच्या कामवरील मजुरांना तसेच शेतकऱ्यांना मोदी हाल-अपेष्टा सहन कराव्या लागल्या.

नुकसान झाल्यास ७२ तासात विमा कंपनीला कळवानैसर्गिक आपत्ती या सदरात गारपिटीने पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी नुकसान झाल्याचे ७२ तासांच्या आत विमा कंपनी किंवा प्रशासनाने सुचविलेल्या पर्यायाच्या ठिकाणी पूर्वसूचना देणे आवश्यक आहे. या नुकसानीची विमा कंपनीच्या समितीद्वारा पाहणी करण्यात येणार आहे. कापणीपश्चात नुकसान झाल्यास कंपनीला तसे कळवावे लागेल.

 

टॅग्स :Rainपाऊस